तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सूर्या याच्या आगामी चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून असलेली उत्सुकता आता संपली आहे. ‘सूर्या 46’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे अधिकृत नाव आणि पहिले पोस्टर निर्मात्यांनी प्रसिद्ध केले आहे. ‘विश्वनाथ अँड सन्स’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून, हा एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सूर्या एका लहान मुलाला कडेवर घेऊन दिसतोय. त्याच्या …
Read More »मनोरंजन
पुन्हा उजळली चंदेरी दुनिया
कोरोना महामारीच्या काळात वेगाने लोकप्रिय झालेल्या ओटीटी कल्चरमुळे बॉलीवूड संकटात सापडल्याची चर्चा सातत्याने होत होती. विशेषतः चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांनी सिनेमे पाहण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा सर्रास केला जात होता. पण 2025 मध्ये भारतीय चित्रपटांच्या एकूण बॉक्स ऑफिस संकलनाने 13,395 कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीपूर्व काळातील सरासरीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक असून ती प्रेक्षकांच्या बदललेल्या मानसिकतेचे …
Read More »अनुराग विरुद्ध विपुल
हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्भीड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. हा चित्रपट केवळ एक भंपक प्रचारकी थाटाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका विशिष्ट दृश्याचा संदर्भ देत कश्यप यांनी या चित्रिकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दृश्यात एका महिलेला बळजबरीने गोमांस खाऊ घालताना दाखवण्यात आले आहे, ज्यावर कश्यप यांनी उपरोधिक टीका केली. …
Read More »चर्चा नायकांच्या वयाची
बॉलीवूड अभिनेता इमरान खान याने अलीकडेच लोकमनातील एका विषयाची तार छेडली आहे. हा विषय म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान या खानावळींनी वयाची साठी ओलांडत आली तरी किती दिवस नायकाची व्यक्तिरेखा साकारायची? आणखी किती दिवस त्यांना प्रेक्षकांनी पडद्यावर नायकाच्या रुपात पाहायचे? या तिन्ही स्टार्सनी आता आता आपल्या वयाला साजेसा आणि वास्तववादी अभिनय करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही …
Read More »रणवीरची एक्झिट आणि 40 कोटींचा वाद
‘धुरंधर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंग याने ‘डॉन 3’ मधून अधिकृतपणे माघार घेतल्याचे वृत्त आहे. रणवीरने तांत्रिक मतभेदांचे कारण देत हा चित्रपट सोडला आहे. मात्र, यामुळे निर्मात्यांचे (एक्सेल एंटरटेन्मेंट) मोठे नुकसान झाले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीरकडे 40 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. प्री-प्रॉडक्शनवर झालेला खर्च रणवीरने भरून द्यावा, असा निर्मात्यांचा दावा आहे. रणवीर …
Read More »नवोदित चेहऱ्यांच्या प्रेमकथा आणि यशाचे समीकरण
चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत प्रेमकथा हा असा एक विषय आहे, ज्याला काळाचे बंधन नसते. एखाद्या भव्य प्रेमकाव्यावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी पडद्यावर नेहमीच बड्या महानायकांची गरज भासते असे नाही, तर नवोदित कलाकारांच्या फ्रेश जोड्याही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात. गेल्या वर्षातील ‘सैयारा’ या चित्रपटाचे अभूतपूर्व यश हे याचेच जिवंत उदाहरण मानले पाहिजे. चित्रपटसृष्टीचा इतिहास चाळला तर आपल्या असे लक्षात येते की, नामचीन …
Read More »विशाल झळकणार नव्या रुपात
मॅडॉक फिल्म्सच्या थरारक आणि विनोदी विश्वात आता एका नव्या अध्यायाची नांदी झाली असून, ‘मर्दानी 2’ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा अभिनेता विशाल जेठवा एका नव्या रूपात समोर येण्यास सज्ज झाला आहे. विशालने ‘शक्ती शालिनी’ हा बिग बजेट चित्रपट स्वीकारला असून, यात तो अभिनेत्री अनीत पड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. दिनेश विजन यांच्या या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सने आजवर ‘स्त्री’ आणि …
Read More »मौनातून गजर करणारा ‘गांधी टॉक्स’
आजच्या डिजिटल युगात, जिथे रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंची सरबत्ती सतत सुरू असते, तिथे दोन तासांहून अधिक काळ मूक चित्रपट पाहणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. किशोर पांडुरंग बेळेकर दिग्दर्शित ‘गांधी टॉक्स’ हा असाच एक धाडसी प्रयोग आहे, जो मौनालाच आपली भाषा बनवतो आणि संवादहीनतेला शक्तिशाली कथनाचे साधन म्हणून वापरतो. हा चित्रपट केवळ निव्वळ मनोरंजन नाही, तर तो एक असा अनुभव …
Read More »रिमी सेनचा अभिनयाला रामराम
दोन दशकांपूर्वी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली रिमी आता चंदेरी दुनियेपासून दूर असून तिने दुबईमध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून आपल्या नवीन करिअरची सुरुवात केली आहे. रिमीच्या प्रवासाची सुरुवात सुपरस्टार आमिर खान याच्यासोबतच्या एका गाजलेल्या जाहिरातीतून झाली होती. या जाहिरातीने तिला रातोरात घराघरांत …
Read More »छोटी गावे, मोठे चित्रपट
बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेरसिकांना देश-विदेशातील नितांतसुंदर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवले. स्वित्झर्लंड, मॉरीशस, लंडन, ऑस्ट्रेलिया यांसह जगभराची सफर रुपेरी पडद्यामधील दृश्यांमधून प्रेक्षकांना घडवून आणली आणि ती पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही छोट्या गावांमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले. ‘स्वदेस’, ‘पीके,’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गंगाजल’, ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा आपला गाव पाहून या गावच्या मातीशी नाळ …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र