विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधान परिषद सभागृहात दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यात हा वाद झाला. कर्जमाफीच्या मुद्यावर मंत्री बोलत असताना आ. कडू यांनी त्यांना प्रश्न केला. त्यावरून आ. दरेकर यांनी आक्षेप घेत आ. कडू यांना चागलेच सुनावले. त्यावर आ. कडू यांनी कर्जमाफीतील प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याचे सांगून घरचा …
Read More »विशेष
द्विपक्षीय लोकशाहीकडे?
वर्तमान राजकारणात देशातील प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे फुटून विखुरत चालले आहेत, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशाच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय जाणिवांमध्ये झालेला आमूलाग्र बदल. आर्थिक आघाडीवर संपूर्ण भारत एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याने प्रादेशिक पक्षांचे राजकारण हळूहळू अप्रस्तुत ठरत चालले आहे. ही परिस्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. प्रादेशिक पक्षांचे प्रस्थापित नेतृत्व आता जनतेकडून नाकारले जात आहे. लोकशाहीत विरोधी …
Read More »संकट गोड्या पाण्याचे
जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 324 ट्रिलियन लिटर म्हणजेच 85.6 ट्रिलियन गॅलन गोड्या पाण्याचा ऱ्हास होत आहे. हे प्रमाण तब्बल 28 कोटी लोकांची वार्षिक गरज भागवण्यासाठी पुरेसे आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे आणि भूगर्भातील पाण्याच्या अनिर्बंध उपशामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला वाळवंटीकरण म्हणजेच जमिनीचे वेगाने वाळवंटात होणारे रूपांतर असे संबोधले जाते. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 324 …
Read More »शिवसेनेत तिसरी फूट
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात षडयंत्र पूर्णत्वास नेण्यात आले, त्याला आठवडाही होत नाही, तोच महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी करण्यात आले. पॅटर्न तोच होता. आधी पक्षातून फुटायचे, मग बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी करायची आणि लोकसभा …
Read More »अन्वयार्थ फुटीचा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ’ऑपरेशन टायगर’ची चर्चा ही अफवा नव्हती तर, एक वास्तव होते हे बुधवारी सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेमध्ये स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसांच्या कालावधीत म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी होतील …
Read More »चिरंतन सौंदर्याचा ध्यास
मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच कायम तरुण आणि देखणे दिसण्याची इच्छा माणसाच्या मनात राहिली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राचीन काळातील नैसर्गिक उपचारांपासून ते आधुनिक काळातील विज्ञान, औषधोपचार आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता सौंदर्याचा एखादा कायमस्वरूपी तोडगा लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 19 व्या शतकापासूनच विज्ञान या प्रश्नाचे …
Read More »तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. राज्यात आमदार फुटल्यानंतर आता टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी केली. या बंडखोर खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणाही केली आहे, ज्यामुळे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर हा …
Read More »आघाडीची धडपड
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि त्या पक्षावर अजूनही गांधी परिवाराचीच हुकूमत असल्याने हा पक्ष क्षीण झाला असला तरी, संपलेला नाही किंवा तो फुटीच्या उंबरठ्यावरही उभा नाही. त्यामुळे काँग्रेसच्या झेंड्याखाली निःसंशयपणे एकत्र येऊन भाजपाला समर्थ पर्याय देण्याची क्षमता इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये नक्कीच आहे, प्रश्न फक्त संघर्षाचा खडतर मार्ग पत्करण्यापुरता मर्यादित आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, ही वस्तुस्थितीच …
Read More »आता खरी परीक्षा
दिल्लीत सन 2014 पूर्वी झालेल्या अण्णा आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारण, अण्णा आंदोलनाला संघ परिवाराचा पाठिंबा होता तसाच हा काहीसा प्रकार त्यापैकी अनेकांना वाटतो आहे. संघ परिवार, सरकार किंवा भाजप पक्ष यांच्याशी हातमिळवणी करूनच अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाचे नाटक सुरू केले गेले असावे, असे त्यांच्यापैकी अनेकांनी थेट स्वरूपात नमूद केले आहे. अण्णा हजारे यांनी काँग्रेस …
Read More »देशाची राजधानी दिल्लीत आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू
देशाची राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात हौज रानी भागात आज बुधवारी सकाळी एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे 21 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 37 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये बहुसंख्य परदेशी नागरिक आहेत. या आगीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. आग एवढी भयानक होती की, काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र