महाराष्ट्र हा संतांचा, समाजसुधारकांचा आणि क्रांतीकारकांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या मातीने देशाला विज्ञानाची कास धरायला शिकवली आणि अंधश्र्द्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र कायदा केला त्याच मातीत आज तंत्र-मंत्र, अघोरी विद्या आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणारी ‘कॅप्टन’ अशोक खरातसारखी प्रवृत्ती फोफावते, ही बाब राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्राने नेहमीच प्रबोधनाची मशाल हातात धरली आहे, पण खरातच्या …
Read More »विशेष
कौटुंबिक जबाबदारीचे सामायिकीकरण
सृजन आणि संगोपन या मानवी जीवनातील दोन सर्वात महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. आजवर केवळ मातेच्या खांद्यावर सोपवलेली संगोपनाची जबाबदारी ही आधुनिक समाजात आता पित्याच्या सहभागाशिवाय अपूर्ण मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे पितृत्व रजेच्या (पॅटर्निटी लीव्ह) संदर्भात एका नव्या सामाजिक क्रांतीची नांदी झाली आहे. केवळ आर्थिक तरतूद करणारा घटक म्हणून पुरुषाकडे पाहण्याची पारंपरिक मानसिकता बदलून, त्याला बालकाच्या भावनिक आणि …
Read More »पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांची आणि पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचीदेखील घोषणा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचादेखील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी …
Read More »ऊर्जा राजनयाचे यश
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जगाची तेलजहाजे अडकून पडलेली असताना भारताने आपली जहाजे सोडवून आणण्यात यश मिळवले आहे. हा भारताचा राजनैतिक आणि कूटनीतीक विजय आहे. भारताची ही मुत्सद्देगिरी केवळ तेलापुरती मर्यादित नाही, तर ती प्रादेशिक स्थिरतेसाठीही आहे. पश्चिम आशियात लाखो भारतीय कामगार वास्तव्यास आहेत, ज्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही भारत सरकारवर आहे. कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष या भारतीयांच्या आयुष्याला धोक्यात टाकू शकतो. त्यामुळेच भारताने लष्करी …
Read More »कसोटी सामूहिक संयमाची
आपण सर्वजण कधी ना कधी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटांतून जातो, त्यांचा सामना करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. समाजाकडूनही हीच अपेक्षा असते. परंतु काय ही अपेक्षा बहुतेकदा पूर्ण होत नाही. याचे कारण सामूहिक परिणाम करणारी एखादी गोष्ट घडते किंवा संकट येते तेव्हा अविश्वासाचे, भीतीचे आणि लोभाचे चित्र सर्वदूर दिसते. त्यामुळेच एखादी अफवा पसरते आणि आपण विचार न करता तिच्या मागे …
Read More »भारताकडे येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
इराण आणि अमेरिकेतील युद्ध भडकलेले असतानाच, बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थायलंडच्या एका मालवाहू जहाजासह तीन जहाजांवर पुन्हा हल्ले झाले. या हल्ल्यामुळे एका जहाजाला भीषण आग लागली असून, जहाजावरील खलाशांना वाचवण्यासाठी तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली आहे, असे वृत्त ‘एएफपी’ने दिले. या व्यापारी जहाजावरील दोन भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक भारतीय बेपत्ता आहे. हा हल्ला इराणने केला असल्याचे मानले …
Read More »धास्ती ‘सुपर अल निनो’ ची
जागतिक तापमानवाढीच्या भीषण काळात आता निसर्गाचे एक असे रूप समोर येत आहे, ज्याने जगभरातील हवामान शास्त्रज्ञांची आणि धोरणकर्त्यांची झोप उडवली आहे. युरोपीय हवामान केंद्राच्या (ईसीएमडब्ल्यूएफ) ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘सुपर अल नीनो’चा प्रभाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ही घटना इतकी दुर्मिळ आणि शक्तिशाली आहे की, ती साधारणपणे दर 10 ते 15 वर्षांनी एकदाच येते आणि संपूर्ण जगाच्या हवामान …
Read More »भारतासाठी धोक्याची घंटा
जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींनी एक अत्यंत स्फोटक वळण घेतले आहे. विशेषतः 28 फेब्रुवारी 2026 च्या रात्री इराण आणि अमेरिका यांच्यात जो अभूतपूर्व क्षेपणास्त्र संघर्ष झाला, तो आधुनिक युद्धतंत्राच्या भविष्यातील दिशेचा एक संकेत होता. इराणने अमेरिकेच्या सागरी सामर्थ्याचे केंद्र असलेल्या अब्राहम लिंकन या महाकाय विमानवाहू जहाजाला लक्ष्य करण्याचा जो धाडसी प्रयत्न केला, त्याने संपूर्ण जगाचे सामरिक लक्ष वेधून घेतले. …
Read More »भारताच्या सीमेजवळ अमेरिकेचा हल्ला!
भारताच्या सागरी सीमेजवळ आणि हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी सकाळी एका इराणी युद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान 87 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 101 कर्मचारी बेपत्ता आहेत. या संदर्भात श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली. त्यानंतर, अमेरिकेनेच हा हल्ला करून युद्धनौका बुडवली असल्याचे …
Read More »अन्नदात्याला चटके युद्धझळांचे
अस्मानी असो वा सुलतानी, कोणत्याही संकटामध्ये अंतिमतः भरडला जातो तो अन्नदाता शेतकरीच ! इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धसंघर्षाचीही झळ देशातील शेतीक्षेत्राला बसू लागली आहे. महाराष्ट्रातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक, तसेच पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील बासमती तांदूळ पिकवणारे शेतकरी या युद्धाच्या छायेखाली आले आहेत. आखाती देशांतील अस्थिरतेमुळे केवळ नवीन ऑर्डर येणेच थांबले नाही, तर जुन्या पेमेंटची वसुली देखील कठीण झाली …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र