पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्य विधानसभा विसर्जित केली आहे. या निर्णयामुळे नवीन सरकार स्थापन करण्याचा घटनात्मक मार्ग मोकळा झाला आहे. 7 मे 2026 पासून प्रभावी असलेल्या या आदेशामुळे 17 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला असून 18 व्या विधानसभेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीतील पराभवानंतरही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं घटनात्मक पेच निर्माण झाला. अखेर या पेच …
Read More »बॅक स्टोरी
बच्चू कडू यांची ‘प्रहार’ इतिहासजमा
विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेसेनेत विलीनीकरण करण्यास सहमती दिली आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याशिवाय विलीनीकरण शक्य नाही. मात्र शिवसेना ही आपल्या मातीतील संघटना आहे. भविष्यात प्रहारचे विलीनीकरण झाले तरी हरकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले. एक लढाऊ संघटनेची निर्मिती सत्तेसाठी करण्यात आली होती आणि ती संघटना …
Read More »1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक … आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल 2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची चौदावी बैठक झाली. या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तथा …
Read More »पराभव… तरीही महिलांना आरक्षण
दक्षिणेकडील राज्यांमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेबाबत नाराजी आहे, तर महिलांच्या अर्धवट राजकीय आरक्षणालाही विरोध आहे. त्यानंतरही गुरुवारी संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करण्यात आले. लोकसभा आणि राज्य विधानसभांमधील जागा वाढवण्यासाठीच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रस्तावामुळे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संघर्ष अटळ होता. तीन दिवसांच्या चर्चेनंतर, विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विजय झाला. सरकार एकतृतीयांश बहुमत निर्माण करू शकले. …
Read More »युद्धविरामानंतरही हल्ले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होऊ शकणारे संभाव्य हल्ले आणि बॉम्बहल्ले सध्या दोन आठवड्यांंसाठी स्थगित करण्यात आले असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हा दोन्ही बाजूंनी लागू होणारा युद्धविराम (सीजफायर) असेल. म्हणजेच या कालावधीत ना अमेरिका हल्ला करेल, ना इराण कोणतीही आक्रमक कारवाई करेल. असले तरीही बुधवारी इराणच्या लवना बेटावरील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर आणि इराणने कुवेतमध्ये …
Read More »इराणचा ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगलवर हल्ला
जोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी जागतिक जहाजांच्या वाहतुकीसाठी पुन्हा उघडली जात नाही आणि ती ‘मुक्त आणि सुरक्षित’ राहत नाही, तोपर्यंत अमेरिका युद्धविरामाचा विचार करणार नाही, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले असताना इराणने बुधवारी रात्री बहरीनमधील अमेरिकन कंपनी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या डेटा सेंटरवर हल्ला केला. फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर त्या ठिकाणी आग लागली. यापूर्वी, बहरीनच्या गृह मंत्रालयानेही कंपनीच्या …
Read More »पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत
पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. सुमारे 1 तास 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत सरकारने विरोधी पक्षांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना देशात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले. घाबरण्याचे कारण नाही. तसेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील परिस्थितीबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली. या बैठकीला सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीचे मंत्री अमित शाह, एस. जयशंकर आणि निर्मला सीतारामन …
Read More »पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांची आणि पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचीदेखील घोषणा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचादेखील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी …
Read More »भारताकडे येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
इराण आणि अमेरिकेतील युद्ध भडकलेले असतानाच, बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थायलंडच्या एका मालवाहू जहाजासह तीन जहाजांवर पुन्हा हल्ले झाले. या हल्ल्यामुळे एका जहाजाला भीषण आग लागली असून, जहाजावरील खलाशांना वाचवण्यासाठी तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली आहे, असे वृत्त ‘एएफपी’ने दिले. या व्यापारी जहाजावरील दोन भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक भारतीय बेपत्ता आहे. हा हल्ला इराणने केला असल्याचे मानले …
Read More »भारताच्या सीमेजवळ अमेरिकेचा हल्ला!
भारताच्या सागरी सीमेजवळ आणि हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी सकाळी एका इराणी युद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान 87 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 101 कर्मचारी बेपत्ता आहेत. या संदर्भात श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली. त्यानंतर, अमेरिकेनेच हा हल्ला करून युद्धनौका बुडवली असल्याचे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र