शिवसेना कुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच नेता म्हणून नियुक्त केले होते. शिंदे यांना ठाकरेंनीच आपल्या कॅबिनेटमध्ये मंत्री केले होते. ठाकरेंनीच शिंदेंना निवडणूक लढवण्यासाठी एबी फॉर्म दिले होते, मग उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष नाहीत, …
Read More »बॅक स्टोरी
भाजप, संघाची माफी न मागण्याचा निर्धार
प्रचंड गदारोळानंतर बुधवारी लोकसभेत ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ मंजूर करण्यात आले. त्यावर चर्चा करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. खा. राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला.ते म्हणाले की, मी स्वत: अमित शाह यांना पोलिस अधिकाऱ्यांना फोन करताना …
Read More »जंतरमंतरवर पुन्हा लाठीचार्ज
कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्त्वात संसद भवनावर 20 जुलैला काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच आंदोलनकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी झालेल्या दगडफफेकीत काही आंदोलक आणि पोलीस जखमी झाले. या आंदोलकांनी जंतरमंतरवरून संसद भवनाकडे कूच करताना जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनात पुन्हा एकदा 22 तारखेला मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिस आणि …
Read More »48 हजार कोटींचे वीजबिल माफ
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमुक्ती देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सरकारने जाहीर केली आहे. 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी थकीत …
Read More »इंडोनेशियातील हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी बुधवारी इंडोनेशियातील योग्याकार्ता येथे असलेल्या जगप्रसिद्ध प्रम्बानन मंदिर परिसराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचा संयुक्तपणे शुभारंभ केला. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले हे मंदिर परिसर इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. भगवान शिवाला समर्पित असलेले हे 10व्या शतकातील ऐतिहासिक वारसा स्थळ भारत-इंडोनेशियाच्या सामायिक सांस्कृतिक संबंधांचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानले जाते. या प्रकल्पाच्या …
Read More »आणखी एक आमदार फुटला
15 दिवसांपृर्वी शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर, शिवसेना (ठाकरे)ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर विधानपरिषद उपसभापतीपदाच्या मोबदल्यात शिंदेसेनेत सहभागी झाले आहेत. अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानतंर, त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सचिन अहिर हे ठाकरेंचे अत्यंत …
Read More »कर्जमाफीवरून आ. बच्चू कडूंचा घरचा आहेर
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधान परिषद सभागृहात दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यात हा वाद झाला. कर्जमाफीच्या मुद्यावर मंत्री बोलत असताना आ. कडू यांनी त्यांना प्रश्न केला. त्यावरून आ. दरेकर यांनी आक्षेप घेत आ. कडू यांना चागलेच सुनावले. त्यावर आ. कडू यांनी कर्जमाफीतील प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याचे सांगून घरचा …
Read More »शिवसेनेत तिसरी फूट
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात षडयंत्र पूर्णत्वास नेण्यात आले, त्याला आठवडाही होत नाही, तोच महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी करण्यात आले. पॅटर्न तोच होता. आधी पक्षातून फुटायचे, मग बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी करायची आणि लोकसभा …
Read More »तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. राज्यात आमदार फुटल्यानंतर आता टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी केली. या बंडखोर खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणाही केली आहे, ज्यामुळे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर हा …
Read More »देशाची राजधानी दिल्लीत आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू
देशाची राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात हौज रानी भागात आज बुधवारी सकाळी एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे 21 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 37 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये बहुसंख्य परदेशी नागरिक आहेत. या आगीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. आग एवढी भयानक होती की, काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र