लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

राहुल गांधींचे मोदींना थेट आव्हान

गेल्या मंगळवारी, काँग्रेसने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या निषेधार्थ किसान महाचौपाल आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्ो राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हटले, ‌‘जर तुमच्यात हिंमत असेल तर भारत-अमेरिका करार रद्द करा‌’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ‌‘मोदींनी शेतकऱ्यांना उद्ध्‌‍वस्त केले …

Read More »

चिनी रोबोडॉग वादामुळे भारताची नाचक्की

दिल्लीत केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ‌‘एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’ आयोजित करण्यात आली. या समिटमध्ये आधी भारतीय उद्योजकाच्या गॅझेट्सची चोरी आणि दुसऱ्या दिवशी चिनी कंपनीने तयार केलेला रोबोटिक डॉग स्वत: विकसित केल्याचा दावा एका भारतीय विद्यापीठाने केल्याने भारताची जगभरात नाचक्की झाली आहे. चीनने या ग्रेटर नोएडातील गलगोटिया विद्यापीठाच्या तंत्रज्ञान चोरीवर बातम्या जगभरात पोहोचवल्या आहेत. मोठा गाजावाजा करीत केंद्र सरकारच्या …

Read More »

अविश्वास प्रस्तावानंतर विशेषाधिकार भंगाचा खेळ

पक्षपातीपणाचा आरोप करीत ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची सूचना सादर केली आहे. विरोधकांनी मंगळवारी सभापतींविरुद्ध ही सूचना सादर केली. त्यानंतरही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची पोलखोल करीत राहिले. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी खा. राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान झालेल्या ट्रेड डीलवर मोठा …

Read More »

संसदेत महिला खासदारांचा रुद्रावतार

संसदेत महिला खासदार असण्याकडे दुर्लक्ष करून भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर संतापजनक व घाणेरडी वक्तव्ये केली. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता बोलणार होते. मात्र, विरोधी पक्षाच्या महिला खासदार पंतप्रधान मोदी यांच्या आसनाजवळ पोहोचल्या. या प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले आणि यावेळी पंतप्रधानांचे संबोधन टळले. …

Read More »

अजित पवार यांना अखेरचा निरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात गुरुवारी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह …

Read More »

दावोसमध्ये 14.50 लाख कोटींचे करार

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी तब्बल 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. …

Read More »

अमरावतीत त्रिशंकु, नागपूर, अकोल्यात भाजप

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 87 जागांच्या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. निकालानुसार भाजपने सर्वाधिक 25 जागा जिंकत पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 11 जागांवर यश मिळवले आहे. अकोल्यात भाजप तर चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईत …

Read More »

आकोटात भाजपा-एमआयएम युती?

अकोला जिल्ह्यातील आकोट नगरपरिषदेत आक्रित घडले होते. साप आणि मुंगूस याप्रमाणे एकमेकांना पाण्यात पाहणारे जानी दुष्मन एकत्र आले. हिंदुत्ववादी भाजपाने इस्लामवादी एमआयएमसोबत युती केली होती. धर्माधर्मात भांडण लावून सामान्य लोकांना एकमेकांचे हत्याकांड करण्यास उद्युक्त करणारे हे दोन पक्ष सत्तेसाठी काहीही करण्यास तयार झाले. त्यावरून राज्यभरात विरोधकांनी भाजपावर टीका केली. हे प्रकरण अंगाशी येताच मुख्यमंत्र्ाी देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त …

Read More »

मतदानापूर्वीच भाजपचे सहा उमेदवार अविरोध

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतमोजणी होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खाते उघडले आहे. मनपा निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच कल्याण-डोंबिवली मनपात तीन उमेदवार व धुळेमध्ये दोन आणि पनवेल मनपात एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 29 महापालिकांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जागा कमी आणि इच्छुक जास्त यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळत आहेत. अशातच भाजपाला …

Read More »

शिवसेना-मनसे युतीची घोषणा

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. त्याशिवाय मुंबईत कोण किती जागा लढवणार, याबाबतही ठाकरे बंधूंकडून माहिती देण्यात आलेली नाही. बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सावधपणे पाऊले उचलत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शिवसेना (ठाकरे) …

Read More »