लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे ः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षडयंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी …

Read More »

‘लाडकी बहीण’ ला मविआकडून ‘महालक्ष्मी’ ने उत्तर

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघांडीने 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेतून मविआकडून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली. ज्यात 5 मोठ्या आश्वासनांचा समावेश आहे. यातील पहिले आश्वासन राहुल गांधी यांनी जाहीर केले.महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी योजनेला उत्तर शोधण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेत आरएसएसवरही हल्ला चढविला. …

Read More »

288 मतदारसंघासाठी 7,995 उमेदवारीअर्ज

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होते. अखेरपर्यंत महायुतीने व महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 7,995 जणांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 4 नोव्हेंबरपर्यंत …

Read More »

तिरंग्याला 21 वेळा वंदन करण्याची शिक्षा

भोपाळ येथील एका आरोपीने ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला 21 वेळा वंदन केले आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली होती. या आरोपीने पाकिस्तान समर्थनपर घोषणा दिल्या होत्या. हा आरोपी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मंगळवारी पोलिस ठाण्यात हजर होऊन ‘भारतमाता की जय’ म्हणाला. त्याने तिरंग्याला 21 वेळा वंदन केले. विशेष म्हणजे जामिनावर मुक्तता मिळण्यासाठी या अटीचे पालन …

Read More »

व्होट जिहाद संज्ञेची चौकशी होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी दुपारी केली. महाराष्ट्रात एका टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पाड पडेल.झारखंडमध्ये दोन टप्प्यात म्हणजेच 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. यानंतर बुधवारी राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्होट जिहाद संज्ञेचे चौकशी करण्याचा इशारा दिला. राज्यातील 288 तर झारखंडमधील …

Read More »

हरियाणात काँग्रेसचे पानिपत

लोकसभा निवडणुकीनंतरची हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यासाठी ’लिटमस टेस्ट’ होती. काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह आणि मुख्यमंत्रिपदावरून भूपेंद्रसिंह हुडा व कुमारी सेलजा या प्रमुख नेत्यांमधील भांडणे हे पराभवाचे ठळक कारण मानले जाते. तसेच वादग्रस्त बाबा राम रहीम याला निवडणुकीच्या तोंडावर अचानक पॅरोल देण्यात आला. त्याने भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले व त्याच्या समर्थकांनी, विशेषतः दलित समाजाने भाजपच्या पारड्यात मते …

Read More »

फडणवीस व उद्धव यांची पुन्हा युती?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असताना भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. स्वत: फडणवीस रात्री 12 वाजता गाडी चालवत ’मातोश्री’वर जाऊन त्यांनी ठाकरेंशी दोन तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ’एक्स’वर व्हिडिओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे. यासंबंधी …

Read More »

बदलापूर एन्काऊंटर वादाच्या भोवर्‍यात

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हे एन्काउंटर आता वादग्रस्त ठरले असून कोर्टानेही यावरून ताशेरे ओढले आहेत. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयात याचिका दाखल झाली असताना अक्षय शिंदे चकमक प्रकरणाच्या तपासाला गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) वेग दिला आहे. सीआयडीचे …

Read More »

एक देश-एक निवडणूक लागू करणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशात एकाचवेळी सर्व निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. एक देश एक निवडणूक याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला साडे अठरा हजार पानांचा अहवाल विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच सुपूर्द केला …

Read More »

देशात पुन्हा सांप्रदायिक आग

गणपती विसर्जनावेळी कर्नाटकातील नागमंगला शहरात बुधवारी दोन गटात झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले आहे. विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर हाणामारी झाली आणि मग हिंसाचाराला सुरुवात झाली. यावेळी दगडफफेक करून अनेक दुकाने, वाहने पेटवली. त्याच दिवशी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अनधिकृत मशीद उभारल्या प्रकरणात हिंदू संघटना, स्थानिक हिंदू लोकांनी विरोध करत आंदोलन सुरू …

Read More »