राजकारणात विजयाचा अहंकार आणि पराभवाचा झटका दोन्ही सोबतच चालत असतात. स्थिती बदलण्यास फार वेळ लागत नाही. काही पराभव असे असतात जे केवळ एखाद्या पक्षाचे गणित बिघडवत नाहीत, तर त्यांच्या अहंकारालाच सुरूंग लावतात. तीन राज्यांतील तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल नेमके हेच सांगणारे आहेत. भाजपसाठी मांजलपूरचा (गुजरात) विजय ही अगदी कोरडी मलमपट्टी ठरली आहे, कारण बांकीपूर (बिहार) आणि दतिया (मध्य प्रदेश) …
Read More »कव्हर स्टोरी
विजयाचा अन्वयार्थ
लोकशाही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसते; ती नागरिकांच्या जागरूकतेवर आणि सत्तेला जाब विचारण्याच्या क्षमतेवर उभी असते. देशभरातील पेपरफुटी प्रकरणे, परीक्षा व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाविरोधात उभे राहिलेले अलीकडील विद्यार्थी आंदोलन याच लोकशाही मूल्यांचे प्रभावी उदाहरण ठरले. या संघर्षाने परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींना वाचा फोडतानाच जनतेचा संघटित आवाज अखेरीस सत्तेला निर्णय बदलण्यास भाग पाडू शकतो, हेही पुन्हा एकदा सिद्ध करून …
Read More »प्रतीक्षा निर्णायक निकालाची
लोकशाहीत मतदाराचा कौल हा अंतिम मानला जातो. मात्र, निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने पक्ष बदलून सत्तेची समीकरणे बदलत असतील, तर तो कौल खऱ्या अर्थाने अबाधित राहतो का? हा मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांच्या विलीनीकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील आगामी सुनावणी पक्षांतरविरोधी कायद्याच्या भवितव्याचा आणि भारतीय लोकशाहीतील मतदारांच्या विश्वासाचा कस लावणारी ठरणार आहे. ठाकरेसेनेच्या सहा खासदारांचे एकनाथ …
Read More »बँकिगमधील करिअरचा स्वप्नभंग
देशातील आघाडीच्या बँकांमध्ये सध्या एक मूक क्रांती आणि तितकीच मोठी पडझड सुरू आहे. ग्राहक सेवा वेगवान करणे आणि अचूकता आणणे या नावाखाली बँकिंग क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि प्रगत रोबोटिक्सचा वापर कमालीचा वाढला आहे. परंतु, या तथाकथित तांत्रिक प्रगतीमागे मनुष्यबळ कपातीचे एक अघोषित वादळ दडले आहे, ज्याचा पहिला मोठा तडाखा कनिष्ठ आणि लिपिकीय कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या …
Read More »नाव प्रेमाचं, विसर माणुसकीचा
पाश्चात्त्य समाजांकडे पाहिले, तर तिथेही गुन्हे घडतात, तिथेही हिंसा आहे. पण खासगी नात्यांमध्ये होणारी अशी टोकाची क्रूरता तिथे सर्वसामान्य घरांमध्ये फारशी आढळत नाही; ती बहुधा अपवादात्मक, गंभीर मानसिक विकृतीच्या प्रकरणांपुरती मर्यादित राहते. तिथे नाते न पटल्यास वेगळे होणे स्वीकारले जाते; एखाद्या नात्यात फरफटत राहणे तिथल्या संस्कृतीला मान्य नाही. आपल्याकडे मात्र नाते तुटणे हे जणू काही स्वतःच्या अस्तित्वालाच आव्हान वाटते, आणि …
Read More »शुध्दीकरण मोहीमेचा धडाका
महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यातील भेसळखोरीच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. दूध, पनीर, औषधे, वेफर्स, गुटखा, चहापत्ती, खाद्यतेल अशा सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील पदार्थांमध्ये बिनदिक्कतपणे भेसळ करून लोकांच्या जीवाशी अत्यंत घातक खेळ सुरू होता. आपल्या धाडसत्रांनी या निर्ढावलेल्या भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम ज्या तडफदारपणाने सुरू आहे त्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक …
Read More »द्विपक्षीय लोकशाहीकडे?
वर्तमान राजकारणात देशातील प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे फुटून विखुरत चालले आहेत, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशाच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय जाणिवांमध्ये झालेला आमूलाग्र बदल. आर्थिक आघाडीवर संपूर्ण भारत एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याने प्रादेशिक पक्षांचे राजकारण हळूहळू अप्रस्तुत ठरत चालले आहे. ही परिस्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. प्रादेशिक पक्षांचे प्रस्थापित नेतृत्व आता जनतेकडून नाकारले जात आहे. लोकशाहीत विरोधी …
Read More »अन्वयार्थ फुटीचा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ’ऑपरेशन टायगर’ची चर्चा ही अफवा नव्हती तर, एक वास्तव होते हे बुधवारी सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेमध्ये स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसांच्या कालावधीत म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी होतील …
Read More »आघाडीची धडपड
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि त्या पक्षावर अजूनही गांधी परिवाराचीच हुकूमत असल्याने हा पक्ष क्षीण झाला असला तरी, संपलेला नाही किंवा तो फुटीच्या उंबरठ्यावरही उभा नाही. त्यामुळे काँग्रेसच्या झेंड्याखाली निःसंशयपणे एकत्र येऊन भाजपाला समर्थ पर्याय देण्याची क्षमता इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये नक्कीच आहे, प्रश्न फक्त संघर्षाचा खडतर मार्ग पत्करण्यापुरता मर्यादित आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, ही वस्तुस्थितीच …
Read More »ये रे ये पावसा…
सुमारे तीन महिन्यांच्या अत्यंत कडक अशा उन्हाळी हंगामानंतर केवळ धरतीच नव्हे तर धरतीवर राहणारे सर्व प्राणिमात्र चातक पक्ष्याप्रमाणे आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतामध्ये मान्सूनचा हंगाम सुरू होत असला, तरी यावर्षी एल निनो परिणामामुळे काही प्रमाणात मान्सूनची वाटचाल संथ झाल्याने पावसाचे थेंब पडण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. गेल्या काही …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र