लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

महती नवरात्रोत्सवाची

भारताच्या सर्वच प्रांतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरे होतात. भारतीय संस्कृतीने पुरुष देवता असतानाही शक्ती देवता म्हणून स्त्री देवतेला उभे करुन महिषासुरासारखा बलदंड राक्षस तिच्या हातून वध करवून घेतला. तिचा हा मोठा पराक्रम सांगण्यासाठी मोठी परंपरा निर्माण झाली. असुरी शक्ती जेव्हा दैवी शक्तीविरुद्ध युद्ध करते तेव्हा त्याचे प्रतिक म्हणून नवरात्र साजरी …

Read More »

सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ‘विक्रम-३२’ ही देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडटर चिप प्रदान करण्यात आली. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या विश्वातील आकांक्षांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. आतापर्यंत भारताचे योगदान डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक दर्जाचे असले तरी प्रत्यक्ष उत्पादनात तो मागे राहिला होता. परंतु आता सेमीकंडटर निर्मितीच्या स्पर्धेत भारताने अग्रणी स्थान मिळविण्याची दिशा निश्चित केली आहे. आजची दुनिया एका प्रचंड तांत्रिक क्रांतीच्या …

Read More »

करुया स्वदेशीचा जागर

रशिया-युक्रेन संघर्ष, हमास-इस्राईल संघर्ष, ट्रम्प यांचे शुल्क धोरण आणि चीनच्या भूमिकेवरून वाटणारी अनिश्चितता पाहता भारताने आता स्वदेशी धोरणावर व्यापक विचार करायला हवा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार्‍या भारताने आता स्वदेशीची मात्रा बहुतांश क्षेत्रावर लागू करावी, जेणेकरून देशहित साधले जाईलच, त्याचवेळी जगाला पर्यायी देशही मिळेल. आतापर्यतची भारताची प्रतिमा आणि भूमिका पाहता वसुधैव कुटुम्बकम अशीच राहिली असून ती जागतिक बाजारातील …

Read More »

राहुल-तेजस्वींची यात्रा फलदायी ठरेल?

बिहारमध्ये येणार्‍या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकांची पूर्वतयारी सध्या जोमाने सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बिहारी जनतेला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काँग्रेस पक्षाने गेल्या काही वर्षांत बिहारमधील जनाधार मोठ्या प्रमाणावर गमावला आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी आणि ‘इंडिया’ आघाडीला बळकटी देण्यासाठी राहुल गांधी यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत ‘मतदार अधिकार यात्रे’स …

Read More »

मांगल्यदायी गणेशोत्सव

भाद्रपद शुल चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशमूर्ती तयार करून तिचे यथासांग पूजन करावे आणि वाहत्या पाण्यात ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्र सांगते. या व्रताला सिद्धिविनायक व्रत म्हटले जाते. हे व्रत जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, अपकीर्ती निवारणासाठी, कीर्ती पुनःप्राप्तीसाठी केले जाते. कृष्णाला स्यमन्तक मणि चोरीच्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी नारदांनी हे व्रत सांगितले होते. महाभारतातील युद्धकाळी कृष्णाने युधिष्ठिरालाही याच व्रताची शिकवण …

Read More »

‘पिरियड शेमिंग’ चा डाग

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या राज्यातील ठाणे जिल्ह्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींशी करण्यात आलेली वर्तणूक ही अमानवी आणि घृणास्पद आहे. मासिक पाळीविषयीची लाज ही मासिक पाळीला एक अनावश्यक शारीरिक घटना मानण्याच्या सामाजिक धारणेचा परिणाम आहे. वास्तविक पाहता तो शरीरधर्म आहे. असे असूनही मासिक पाळीकडे नकारात्मक प्रक्रिया म्हणून पाहिले जाणे, ही घृणास्पद आणि वीट आणणारी मानसिकता आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील …

Read More »

भारत झुकेगा नही…

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात भारत व अमेरिकेतील व्यापार आणि गाढ मैत्री ज्या चमकदार उंचीवर पोहोचेल, अशी जी अपेक्षा होती, ती १ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आणि ६ ऑगस्ट रोजी रशियाकडून तेलखरेदीचे कारण पुढे करत अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्कआकारणी जाहीर केल्यामुळे धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी …

Read More »

‘फेक नॅरेटिव्ह’ ला चपराक

मालेगावच्या मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल नुकताच लागला असून राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने (एनआयए) या खटल्यातील सर्व सातही आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी घडलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणाचा निकाल १७ वर्षांनी येणे हे आपल्या न्यायप्रणालीचे अपयशच असून अशा प्रकारे इतक्या वर्षांनी आरोपी निर्दोष असल्याचे समोर येत असेल तर ती बाब अधिक गंभीर आहे. पण या निकालामध्ये सर्व …

Read More »

उपराष्ट्रपतींचे वादपुराण

जगदीप धनखड यांनी अचानकपणे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व कामकाज सुरळीत पार पडत असताना सायंकाळी अचानक त्यांनी इतका मोठा निर्णय का घेतला? हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या रुपातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकिर हुसेन, गोपाल स्वरुप पाठक, आर. वेंकटरमन, शंकरदयाळ शर्मा, डॉ. के. आर. नारायणन, कृष्णकांत, …

Read More »

दुर्गरत्नांवर जागतिक मोहोर

मराठेशाहीच्या समृद्ध आणि जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असणारे गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरीक रणनीतीचे, दूरदृष्टीचे आणि तत्कालीन अतुलनीय स्थापत्यकलेचे प्रतीक आहेत. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक इतिहासकारांनी या भुईकोटांविषयी, जलदुर्गांविषयी समृद्ध लेखन केले आहे. परंतु त्याचा आधार घेत दुर्गपर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न फारशा प्रभावीपणाने झाले नाहीत. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या …

Read More »