लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

गरज छत्रपतींच्या युध्दनीतीची

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या सर्व देशभरात चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे नेमकं भारताचं प्रत्युत्तर कसं राहील? खरं तर याची जाहीर चर्चा करायचीच नसते, ते करुन दाखवायचं असतं. दरवेळी तोच-तो उपाय काम करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असं शिकवते की, कधी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, कधी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून जायचं असतं तर कधी लाल महालावर छापा टाकून शायिस्तेखानाची …

Read More »

पहलगाममधील हल्ल्याच्या मुळाशी..

जम्मू- काश्मीरमधील पहलगाममधील बैरासन व्हॅलीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भीषण, नृशंस आणि तितकाच भेदक आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवामामधील हल्ला हा लष्करी जवानांवर झाला होता; परंतु पहलगाममधील हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. हा बदल अत्यंत महत्त्वाचा असून त्यातील गर्भितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. पहलगाममध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले झालेले …

Read More »

गालबोट विश्वासार्हतेला

एनपीसीआयने गेल्या दशकात डिजिटल व्यवहारांचे स्वरूपच पालटले आहे. सध्या भारतात दररोज सुमारे 60 कोटी यूपीआय व्यवहार होतात. यूपीआयच्या यशामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर लोक आता रोख रक्कम न बाळगता घराबाहेर पडतात. खेड्यापाड्यांतही यूपीआय व्यवहार स्वीकारले जात असल्यामुळे ही सेवा अखंड चालू राहणे अत्यावश्यक आहे. परंतु अलीकडेच ही सेवा ठप्प झाल्याने सबंध देशभरामध्ये बराच गोंधळ उडाला. गेल्या एका वर्षात अशा प्रकारे यूपीआय …

Read More »

अधिवेशनातून काय साधले?

काँग्रेस पक्षाचे अधिवेशन गुजरातमध्ये तब्बल 64 वर्षांनंतर झालं. अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रियंका गांधींची अनुपस्थिती कार्यकर्त्यांसाठी केवळ निराशाजनक आणि आश्चर्यजनक नव्हती, तर ती रहस्यमयही ठरली. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेससमोरील मोठी समस्या ही आहे की तिच्याकडे गुजरातमध्ये मूळचा असा एकही नेता नाही, जो मुख्यमंत्रीपदासाठी सशक्त उमेदवार ठरू शकेल. तरीही काँग्रेस किंवा राहुल गांधी आपली लढाई गुजरातमध्ये केंद्रित करून ‘राजा’लाच …

Read More »

अमेरिकन टेरीफअस्त्राचा ‘कडकडाट’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिसिप्रोकल टॅक्स धोरणांतर्गत 2 एप्रिल रोजी जगातील 60 देशांविरोधात आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आणि जगभरात खळबळ उडाली. अमेरिकन शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली असून भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड झाली आहे. भारतावरही त्यांनी 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. आयात शुल्काच्या भयामुळे आपण बचावाच्या भूमिकेत गेलो तर भारतालाही त्यातून काही साध्य होणार …

Read More »

संकट अमेरिकन कृषीमाल आयातीचे

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक हेड यांनी भारताला विशेषतः अत्याधिक अनुदानित अमेरिकन शेती उत्पादनांसाठी आपला बाजार खुला करण्यास सांगितले. जॉर्ज बुश ज्युनियर यांच्या कार्यकाळात वाणिज्य सचिव असलेल्या एन्न वेनमॅन यांच्यापासून सुरू झालेले हे दुटप्पी धोरण अमेरिकेच्या विविध कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी पुढे रेटले आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या नव्या टॅरिफ युद्धामध्येही हेच घडत आहे. जागतिक व्यापार संघटनेतील अनेक वर्षांच्या …

Read More »

अंतराळ दिग्विजयाला सलाम

नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अवकाशात अडकून पडल्यानंतर अखेर भारतीय वंशांच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी यशस्वीरित्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कुपीतून घरवापसी झाली. त्यांच्यासमवेत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अ‍ॅलेक्झांडर गोर्व्हुनोव्ह देखील भूतलावर परतले. हे चौघेही अवकाश स्थानकावर (आयएसएस) क्रु-9 चे सदस्य होते. त्यांची जागा घेण्यासाठी चार अन्य अंतराळवीर नासाचे अ‍ॅनी …

Read More »

अर्थसंकल्पातून काय मिळाले?

महायुती सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी लोकानुनयाला थारा न देता राज्याच्या वित्तीय शिस्तीच्या चौकटीचे पालन करत विकासाला चालना देण्यासाठीचे महत्तम प्रयत्न केल्याचे दिसते. कोणत्याही अर्थसंकल्पानंतर अजून खूप काही करावयास हवे होते, हा सूर नेहमीच ऐकावयास मिळतो. परंतु समोर असणारी आव्हाने आणि उपलब्ध संसाधने यांचा ताळमेळ उत्कृष्टपणाने घालणे याला कुशल वित्तीय व्यवस्थापन म्हणतात. त्यादृष्टीने एकीकडे लाडक्या बहिणींना …

Read More »

जगज्जेतेपदाचा शंखनाद

क्रिकेटच्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत अनेकदा आपली छाप उमटवली आहे. 2002 मध्ये संयुक्त विजेतेपद पटकावल्यानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि धोनी हा सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. आता भारताने सलग तिसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला …

Read More »

महायुतीत काय चाललंय?

विधानसभा निवडणुकांमध्ये न भूतो… असे यश मिळूनही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील सुंदोपसुंदीमुळे महायुती सरकारमध्ये सारे काही आलबेल नाहीये, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून आपली पद्धतशीरपणाने राजकीय कोंडी केली जात असल्याचे शिंदे यांना वाटत आहे. अशा प्रकारची राजकीय अपरिहार्यता सत्तेच्या राजकारणात अनेकांना सोसावी लागली आहे. त्याची कारणे बहुतेकदा अतिमहत्त्वाकांक्षेत दडलेली असतात. भूतकाळ आणि वर्तमान यांचा तटस्थपणाने अभ्यास करण्याऐवजी महत्त्वाकांक्षा …

Read More »