लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

का कोसळले विमान?

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच चिंताजनक आहे. वास्तविक, बोईंग ७८७ ड्रीमलाइनर ही विमाने सामान्यतः सुरक्षित मानली जातात. एअर इंडियाकडे आजघडीला २५ पेक्षा अधिक ड्रीमलायनर विमाने आहेत. याखेरीज कतार, एतिहाद, ब्रिटिश एअरवेज, चायना साउदर्न, एअर फ्रान्स, एअर कॅनडा यांच्याकडेही बोईंगची विमाने आहेत. हे त्याचे पहिलेच ‘फॅटल हुल-लॉस’ मानले जात आहे. सदर घटनेतील वैमानिकही अनुभवी आणि …

Read More »

कोविड पुन्हा का पसरतोय?

कोविड-१९ हा सतत बदलत राहणारा विषाणू असल्यामुळे त्याचे नवे उपप्रकार (सब-व्हेरियंटस्) वेळोवेळी उद्भवत असतात. त्यामुळे अनेक वेळा रुग्णसंख्येतील अचानक वाढीचे कारण हे नवीन उपप्रकारच ठरतात. तसेच, हवामान आणि ऋतूंचाही कोविडच्या प्रसारावर ठळक प्रभाव पडतो. २०२० आणि २१ मध्ये जागतिक तज्ज्ञांनी खात्रीशीररित्या सांगितले होते की, आपल्याला कोविडबरोबरच जगायचे आहे. म्हणजेच कोविडचा विषाणू हा सतत आपल्या वातावरणात राहणारच असून त्याचे नवीन उपप्रकार …

Read More »

तिसर्‍या स्थानाकडे जाताना…

जगातील आघाडीच्या पाच प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांत भारताचा समावेश झाला आहे. आता तो तिसर्‍या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळतो का? हे देखील पाहिले पाहिजे.यासाठी प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. तरच ‘विकसीत भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. यादृष्टीने सरकारने आणि नागरिकांनी आणखी व्यापकपणे काम करणे महत्त्वाचे आहे. १९९० च्या आसपास भारत आणि चीनच्या …

Read More »

अपरिपक्वपणाचे दर्शन

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा पुढचा टप्पा म्हणून केंद्र सरकारने सात शिष्टमंडळे जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवडल्या गेलेल्या प्रतिनिधींवरुन सुरू झालेले राजकारण दुर्दैवी म्हणावे लागेल. यामध्ये दोन्ही बाजूंनी खुल्या मनाचा अभाव दिसतो. दोघेही याप्रसंगी मोठेपणा दाखवू शकले नाहीत. यावरुन असे दिसते की, राजकीय मतभेद आता मनभेदात रूपांतरित झाले आहेत. ही बाब देशासाठी चांगली नाही. अशा प्रकारची प्रतिनिधिमंडळे …

Read More »

संघर्ष शमला,पण प्रतिकारहीन मानसिकतेचे काय?

भारताच्या शूर जवानांनी दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने अखेर गुडघे टेकले आहेत. संघर्षविराम झाला आहे. दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य तो धडा देऊन भारताने आपले पहिले उद्दिष्ट साध्य केले आहे. पण यादरम्यान एक प्रश्न सतत मनाला अस्वस्थ करतो आहे… तो म्हणजे बैसरन व्हॅलीत ४०० लोकांच्या नजरेसमोर २६ पर्यटक मारले गेले. यामध्ये घोडेवाला सय्यद वगळता एकाही व्यक्तीने प्रतिकार का केला नाही? एकाने जरी …

Read More »

अघोषित युध्दातील वज्राघात

भारताच्या एअरस्ट्राईकनंतर जनतेमधील प्रतिमा टिकवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला भारताविरुद्ध कारवाई करणे अपरिहार्य होते. पण या कारवाईला भारताच्या अत्याधुनिक शस्रसामग्रीने आणि लष्कराच्या अचूक नियोजनामुळे पूर्णतः निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानची क्षेपणास्रे, ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त करण्यात आली. एक विमान पाडण्यात आले. यावरुन पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलेला असावा. काही अभ्यासकांच्या मते, ही लढाई खूप दीर्घकाळ चालणारी आहे. पण मागील तीन युद्धांप्रमाणेच याही वेळी भारत …

Read More »

गरज छत्रपतींच्या युध्दनीतीची

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या सर्व देशभरात चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे नेमकं भारताचं प्रत्युत्तर कसं राहील? खरं तर याची जाहीर चर्चा करायचीच नसते, ते करुन दाखवायचं असतं. दरवेळी तोच-तो उपाय काम करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असं शिकवते की, कधी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, कधी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून जायचं असतं तर कधी लाल महालावर छापा टाकून शायिस्तेखानाची …

Read More »

पहलगाममधील हल्ल्याच्या मुळाशी..

जम्मू- काश्मीरमधील पहलगाममधील बैरासन व्हॅलीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भीषण, नृशंस आणि तितकाच भेदक आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवामामधील हल्ला हा लष्करी जवानांवर झाला होता; परंतु पहलगाममधील हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. हा बदल अत्यंत महत्त्वाचा असून त्यातील गर्भितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. पहलगाममध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले झालेले …

Read More »

गालबोट विश्वासार्हतेला

एनपीसीआयने गेल्या दशकात डिजिटल व्यवहारांचे स्वरूपच पालटले आहे. सध्या भारतात दररोज सुमारे 60 कोटी यूपीआय व्यवहार होतात. यूपीआयच्या यशामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर लोक आता रोख रक्कम न बाळगता घराबाहेर पडतात. खेड्यापाड्यांतही यूपीआय व्यवहार स्वीकारले जात असल्यामुळे ही सेवा अखंड चालू राहणे अत्यावश्यक आहे. परंतु अलीकडेच ही सेवा ठप्प झाल्याने सबंध देशभरामध्ये बराच गोंधळ उडाला. गेल्या एका वर्षात अशा प्रकारे यूपीआय …

Read More »

अधिवेशनातून काय साधले?

काँग्रेस पक्षाचे अधिवेशन गुजरातमध्ये तब्बल 64 वर्षांनंतर झालं. अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रियंका गांधींची अनुपस्थिती कार्यकर्त्यांसाठी केवळ निराशाजनक आणि आश्चर्यजनक नव्हती, तर ती रहस्यमयही ठरली. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेससमोरील मोठी समस्या ही आहे की तिच्याकडे गुजरातमध्ये मूळचा असा एकही नेता नाही, जो मुख्यमंत्रीपदासाठी सशक्त उमेदवार ठरू शकेल. तरीही काँग्रेस किंवा राहुल गांधी आपली लढाई गुजरातमध्ये केंद्रित करून ‘राजा’लाच …

Read More »