लेख-समिक्षण

इनर स्टोरी

विरोधकांपुढे आव्हान

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे भारतीय राजकारणातील एका मोठ्या वैचारिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. भारतीय जनता पक्षासाठी पूर्व भारताचे प्रवेशद्वार मानले जाणारे हे राज्य आता त्यांच्या ताब्यात आले आहे. या विजयाने हे स्पष्ट केले आहे की, जिथे जिथे भाजपसाठी यशाची नवीन द्वारे उघडत आहेत, तिथे तिथे विरोधकांसाठी राजकीय रस्ते कायमचे बंद होत आहेत. सद्यस्थितीत भारतीय राजकारणात ‌’सत्ताविरोधी‌’ लाटेपेक्षा ‌’सत्तासमर्थक‌’ राजकारणाचे …

Read More »

तापमानाची काहिली

जगात सर्वाधिक उष्ण असणाऱ्या वीस ठिकाणांत भारतातील 19 ठिकाणांचा समावेश झाला आहे. या ठिकाणचे तापमान 44 ते 46.9 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले गेले. वाढते तापमान ही केवळ हवामानाची नोंद नसून तो एक चिंताजनक विषय आहे. पूर्वी मे आणि जून महिन्यांत तापमानाचा उच्चांक नोंदला जात असताना आता एप्रिलमध्येच या तापमानाने नागरिकांना त्रस्त केले आहे. कमाल तापमानात विक्रमी वाढ होण्यामागे पर्यावरण, मानवी …

Read More »

प्रश्न न्यायसंस्थेच्या विश्वासार्हतेचा

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाच्या भोवऱ्यात अडकलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी महाभियोगाची प्रक्रिया सुरू होताच पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या घरात कोट्यवधी रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने त्यांना दोषी ठरविले होते. पण आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावर महाभियोगाची कार्यवाही होणार नाही. कदाचित खटला देखील भरला जाणार नाही. परंतु त्यांच्या राजीनाम्याने न्यायव्यवस्थेवरचा …

Read More »

नोएडातील उद्रेकाच्या मुळाशी…

देशातील विविध औद्योगिक शहरांमध्ये सध्या कामगारांच्या असंतोषाचा ज्वालामुखी धुमसत असून नोएडातील हिंसक आंदोलनाने या गंभीर समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच विविध राज्यांतील औद्योगिक केंद्रांमध्ये कामगारांची निदर्शने सुरू होती, परंतु नोएडामध्ये झालेली दगडफेक, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेली झटापट याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा असंतोष केवळ स्थानिक कारणांपुरता मर्यादित नसून, त्यामागे वाढती महागाई, इंधन संकट …

Read More »

‌‘टेराफॅब‌’ची धूम

जगप्रसिद्ध अब्जाधिश आणि ‌‘टेस्लाकार‌’ एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश तंत्रज्ञान आणि प्रगत संगणनशक्ती यांचा संगम घडवून आणणाऱ्या एका अत्यंत मोठ्या औद्योगिक उपक्रमाची कल्पना त्यांनी मांडली आहे. या उपक्रमाचे नाव आहे ‌‘टेराफॅब.‌’ जगातील सर्वांत मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून या संकल्पनेची चर्चा सुरू आहे.भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, स्वयंचलित रोबोटस्‌‍, उपग्रह नेटवर्क आणि अवकाशाधारित संगणकीय व्यवस्था यांसाठी लागणाऱ्या प्रचंड प्रमाणातील …

Read More »

सायबरस्पेस: आधुनिक अदृश्य रणक्षेत्र

आजच्या काळात युद्धाचे स्वरूप केवळ सीमा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. डिजिटल रुपात आता एक नवीन आघाडी उघडली गेली असून ती अदृश्य असूनही सातत्याने सक्रिय आहे. या युद्धामध्ये गोळ्यांचा आवाज येत नाही, परंतु त्याचे परिणाम तितकेच विनाशकारी असतात. आता कोणताही देश सीमा ओलांडल्याशिवाय शत्रूची अर्थव्यवस्था, ऊर्जा व्यवस्था किंवा दळणवळण यंत्रणेला थेट लक्ष्य करू शकतो. आधुनिक युद्ध आता दोन समांतर …

Read More »

कौटुंबिक जबाबदारीचे सामायिकीकरण

सृजन आणि संगोपन या मानवी जीवनातील दोन सर्वात महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. आजवर केवळ मातेच्या खांद्यावर सोपवलेली संगोपनाची जबाबदारी ही आधुनिक समाजात आता पित्याच्या सहभागाशिवाय अपूर्ण मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे पितृत्व रजेच्या (पॅटर्निटी लीव्ह) संदर्भात एका नव्या सामाजिक क्रांतीची नांदी झाली आहे. केवळ आर्थिक तरतूद करणारा घटक म्हणून पुरुषाकडे पाहण्याची पारंपरिक मानसिकता बदलून, त्याला बालकाच्या भावनिक आणि …

Read More »

कसोटी सामूहिक संयमाची

आपण सर्वजण कधी ना कधी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटांतून जातो, त्यांचा सामना करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. समाजाकडूनही हीच अपेक्षा असते. परंतु काय ही अपेक्षा बहुतेकदा पूर्ण होत नाही. याचे कारण सामूहिक परिणाम करणारी एखादी गोष्ट घडते किंवा संकट येते तेव्हा अविश्वासाचे, भीतीचे आणि लोभाचे चित्र सर्वदूर दिसते. त्यामुळेच एखादी अफवा पसरते आणि आपण विचार न करता तिच्या मागे …

Read More »

भारतासाठी धोक्याची घंटा

जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींनी एक अत्यंत स्फोटक वळण घेतले आहे. विशेषतः 28 फेब्रुवारी 2026 च्या रात्री इराण आणि अमेरिका यांच्यात जो अभूतपूर्व क्षेपणास्त्र संघर्ष झाला, तो आधुनिक युद्धतंत्राच्या भविष्यातील दिशेचा एक संकेत होता. इराणने अमेरिकेच्या सागरी सामर्थ्याचे केंद्र असलेल्या अब्राहम लिंकन या महाकाय विमानवाहू जहाजाला लक्ष्य करण्याचा जो धाडसी प्रयत्न केला, त्याने संपूर्ण जगाचे सामरिक लक्ष वेधून घेतले. …

Read More »

नारीशक्तीच्या हाती विकसित भारताची दोर

अनेक दशकांपासून देशातील महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणातील योगदान शून्य आहे, असे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आणि चित्र निर्माण केले. अवमूल्यन करणाऱ्या या विचारसरणीमुळे साहजिकच या ‌‘आधी आबादी‌’ने आत्मसन्मान गमावला. त्यांच्या वेदना, समस्या या कोणाच्याच अजेंडयावर नव्हत्या. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये महिलाकेंद्री योजना तळागाळात पोहोचवण्यात आल्या आणि त्याचे सुपरिणाम प्रकर्षाने दिसून येऊ लागले. जगभरातील विकसित देशात कामकाज आणि उद्योग क्षेत्रात …

Read More »