हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला तर काही कथा अशा आहेत की त्या काळ बदलला, समाज बदलला, प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलल्या तरी पुन्हा पुन्हा नव्या रूपात समोर येत राहिल्या. त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकून राहिलेली कथा म्हणजे ‘एक माणूस विरुद्ध व्यवस्था’ ही. ही चित्रपटातील संघर्षाची चौकट सामान्य माणसाच्या मनातील असंतोष, अपेक्षा, न्यायाची आस आणि बदलाची आकांक्षा यांचे कलात्मक प्रतिबिंब आहे. म्हणूनच प्रत्येक …
Read More »सिने समिक्षण
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र रहस्य, थरार आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम हा त्यांचा स्थायीभाव राहिला. देव आनंद यांच्या शैलीदार गुप्तहेरापासून ते आधुनिक काळातील जागतिक मोहिमा पार पाडणाऱ्या उच्च-तंत्रसज्ज नायकांपर्यंतचा हा प्रवास भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतला. रहस्याचा धूसर पडदा, शत्रूच्या छावणीतून येणारे गुप्त संदेश, प्रत्येक क्षणी बिंग फुटण्याचा धोका आणि …
Read More »पुनर्निमितीला उधाण
बॉलीवूडमध्ये जुन्या चित्रपटांची पुनर्निर्मिती, रीमेक, रिक्रिएशन किंवा पुनर्कल्पना ही आता अपवादात्मक गोष्ट राहिलेली नाही. गेल्या दोन दशकांत अनेक लोकप्रिय चित्रपट नव्या कलाकारांसह, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि बदललेल्या प्रेक्षकवर्गाला लक्षात घेऊन पुन्हा साकारले गेले. काहींनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले, तर काहींना प्रेक्षकांनी सपशेल नाकारले. प्रत्येक पिढीची स्वतःची अभिरुची, सामाजिक वास्तव आणि मनोरंजनाची भाषा असते. त्यामुळे जुन्या कथा नव्या काळाच्या संदर्भात …
Read More »यशापयाची भरती-ओहोटी
हिंदी चित्रपटसृष्टीत स्टारडम ही कधीच कायमस्वरूपी गोष्ट नव्हती. येथे प्रत्येक शुक्रवार एखाद्या अभिनेत्याचे नशीब बदलते आणि प्रत्येक सोमवार एखादा सुपरस्टार अचानक मागे पडलेला दिसतो. एक काळ असा होता की सलग काही यशस्वी चित्रपट एखाद्या अभिनेत्याला दशकभर उद्योगाच्या सर्वोच्च स्थानी ठेवत असत; मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज एका मोठ्या यशाने अभिनेता आकाशात पोहोचतो, तर दोन अपयशी चित्रपट त्याला पुन्हा …
Read More »‘स्टार पॉवर’चे वलय आणि चित्रपट
हिंदी चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शक असे झाले, ज्यांनी केवळ चित्रपट बनवले नाहीत तर त्यांनी काळाची अभिरुची घडवली. सुभाष घई हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव. ‘ताल’, ‘परदेस’, ‘हीरो’, ‘राम लखन’ किंवा ‘खलनायक’ यांसारखे चित्रपट पाहताना केवळ मोठे कलाकार दिसत नाहीत, तर त्यामागे उभा असलेला एक ठाम दिग्दर्शकीय दृष्टिकोन जाणवतो. म्हणूनच सुभाष घई यांनी अलीकडे केलेले विधान महत्त्वाचे ठरते. फक्त स्टार पॉवरवर चित्रपट …
Read More »सिनेमा ते राजकारण
दक्षिण भारताच्या राजकारणात सिनेमा आणि सत्तेचे नाते अनेक वर्षांपासून आहे. लोकप्रियतेपलीकडे जात ते सामाजिक भावनांशी, प्रादेशिक अस्मितेशी आणि जनमानसाच्या मानसिकतेशी घट्ट जोडलेले राहिले आहे. पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा नायक, गरीबांचा तारणहार किंवा जनतेसाठी जीव धोक्यात घालणारा नेता ही प्रतिमा दक्षिणेतील प्रेक्षकांनी कमालीची उचलून धरताना अनेकदा त्या प्रतिमेलाच त्यांनी वास्तवातील नेतृत्व मानले. त्यामुळेच दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीतून थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचणाऱ्या नेत्यांची परंपरा …
Read More »‘प्रौढपटांचे’ सुवर्णयुग
भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात काही काळापूर्वीपर्यंत ’ए’ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी असलेले प्रमाणपत्र लाभलेला चित्रपट म्हणजे एक संकुचित, वादग्रस्त आणि मुख्य प्रवाहापासून तुटलेला विषय मानला जायचा. अशा चित्रपटांच्या नावाभोवती अलीलता किंवा टोकाच्या हिंसेचे वलय असायचे, ज्यामुळे सामान्य प्रेक्षक चित्रपटगृहात जाण्यास कचरत असे. कुटुंबासोबत बसून असे चित्रपट पाहणे तर दूरची गोष्ट, पण अशा चित्रपटांचे नाव काढणेही टाळले जाई. मात्र, काळाच्या ओघात समाजमनाची संवेदनशीलता …
Read More »रामायण, राम, रणबीर आणि वाद
सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, त्याची सिनेकारकिर्द आणि कलाकृतींमधील त्याचा अभिनय याची सांगड घातली जाता कामा नये, असे संकेत आहेत. कारण सिनेमा-नाटक या कलाकृतीमधील व्यक्तिरेखेला कलाकार सार्थपणाने न्याय देतो का, तो ताकदीने साकारतो का इथवरच प्रेक्षकांचा संबंध असतो. पण आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांच्या निमित्ताने ही सांगड हमखास …
Read More »महानायकाचा उदय आणि एका पर्वाचा अस्त
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी अलीकडेच सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल काही धक्कादायक आणि भावूक खुलासे केले आहेत. चित्रपटसृष्टीतील यशाच्या शिखरावर राहिलेल्या राजेश खन्ना यांना नंतरच्या काळातील अपयश पचवणं कसं जड गेलं, यावर प्रेम चोप्रा यांनी प्रकाश टाकला. एका संवादादरम्यान प्रेम चोप्रा यांनी सांगितले की, राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये जे स्थान आणि लोकप्रियता अनुभवली होती, ती कमी झाल्यावर ते …
Read More »स्वयंभू गंधार
भारतीय संगीतात अशी संकल्पना आहे की, जो स्वर अतिशय निर्मळ आणि स्वयंभू असतो, त्याला ‘गंधार’ म्हणतात. आशाताईंचा आवाज म्हणजे तोच ‘स्वयंभू गंधार’ होता. एखाद्या कठीण चालीचे सोने कसे करावे, हे केवळ त्यांनाच ठाऊक होते. ‘भुई तन मन’, ‘साकार गंधार’ किंवा ‘कुठे न दीप काजवा’ यांसारखी गाणी रेकॉर्ड करताना त्यांनी घेतलेल्या ताना आणि दिलेले भाव पाहून मी थक्क व्हायचो. रेकॉर्डिंग संपल्यावर …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र