भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात काही काळापूर्वीपर्यंत ’ए’ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी असलेले प्रमाणपत्र लाभलेला चित्रपट म्हणजे एक संकुचित, वादग्रस्त आणि मुख्य प्रवाहापासून तुटलेला विषय मानला जायचा. अशा चित्रपटांच्या नावाभोवती अलीलता किंवा टोकाच्या हिंसेचे वलय असायचे, ज्यामुळे सामान्य प्रेक्षक चित्रपटगृहात जाण्यास कचरत असे. कुटुंबासोबत बसून असे चित्रपट पाहणे तर दूरची गोष्ट, पण अशा चित्रपटांचे नाव काढणेही टाळले जाई. मात्र, काळाच्या ओघात समाजमनाची संवेदनशीलता …
Read More »सिने समिक्षण
रामायण, राम, रणबीर आणि वाद
सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, त्याची सिनेकारकिर्द आणि कलाकृतींमधील त्याचा अभिनय याची सांगड घातली जाता कामा नये, असे संकेत आहेत. कारण सिनेमा-नाटक या कलाकृतीमधील व्यक्तिरेखेला कलाकार सार्थपणाने न्याय देतो का, तो ताकदीने साकारतो का इथवरच प्रेक्षकांचा संबंध असतो. पण आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांच्या निमित्ताने ही सांगड हमखास …
Read More »महानायकाचा उदय आणि एका पर्वाचा अस्त
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी अलीकडेच सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल काही धक्कादायक आणि भावूक खुलासे केले आहेत. चित्रपटसृष्टीतील यशाच्या शिखरावर राहिलेल्या राजेश खन्ना यांना नंतरच्या काळातील अपयश पचवणं कसं जड गेलं, यावर प्रेम चोप्रा यांनी प्रकाश टाकला. एका संवादादरम्यान प्रेम चोप्रा यांनी सांगितले की, राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये जे स्थान आणि लोकप्रियता अनुभवली होती, ती कमी झाल्यावर ते …
Read More »स्वयंभू गंधार
भारतीय संगीतात अशी संकल्पना आहे की, जो स्वर अतिशय निर्मळ आणि स्वयंभू असतो, त्याला ‘गंधार’ म्हणतात. आशाताईंचा आवाज म्हणजे तोच ‘स्वयंभू गंधार’ होता. एखाद्या कठीण चालीचे सोने कसे करावे, हे केवळ त्यांनाच ठाऊक होते. ‘भुई तन मन’, ‘साकार गंधार’ किंवा ‘कुठे न दीप काजवा’ यांसारखी गाणी रेकॉर्ड करताना त्यांनी घेतलेल्या ताना आणि दिलेले भाव पाहून मी थक्क व्हायचो. रेकॉर्डिंग संपल्यावर …
Read More »सिनेशीर्षकांच्या बदलांमागे…
विलियम शेक्सपिअरने त्याच्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या जगप्रसिद्ध नाटकात ‘नावात काय आहे?’ असा प्रश्न विचारला होता. त्या नाटकाच्या संदर्भात त्याचे हे विधान कदाचित योग्यही असेल, परंतु चित्रपटसृष्टीच्या बाबतीत हे विधान अनेकदा चुकीचे ठरले आहे. कदाचित म्हणूनच निर्माते चित्रपटाच्या नावात जराही अशुभ संकेत दिसल्यास, ते नाव बदलण्यास भाग पाडतात. त्यामुळे निर्मितीपूर्वी चित्रपटाच्या नावावर मोठी कसरत केली जाते.- सोनम परब, अलीकडेच सलमान …
Read More »सिनेसृष्टीला ‘संजीवनी’ देणारा ‘धुरंधर’
हिंदी चित्रपटसृष्टी गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याच्या आव्हानाचा सामना निकराने करत आहे. जुन्याच सूत्रांवर आधारित चित्रपट आणि थंडावलेला प्रतिसाद यामुळे 2026 च्या आर्थिक वर्षाचा चौथा तिमाही काळ काहीसा चिंतेत होता. अशा परिस्थितीत दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या भागाप्रमाणेच या सिक्वेलनेही सुपरडुपर हिटच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला. परिणामी, संपूर्ण …
Read More »कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी याबाबत मतप्रदर्शन केले. वास्तविक सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या नशिबी अशा प्रकारे आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली होती. शोमन राज कपूर, बिग बी अमिताभ बच्चन, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांनाही आर्थिक नियोजन चुकल्याचा फटका सहन करावा लागला. परंतु या कलाकारांनी प्रचंड मेहनतीने परिस्थिती पालटवली. या …
Read More »‘बूंग’च्या सन्मानाचा अन्वयार्थ
यंदाच्या बाफ्टा (ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) पुरस्कार सोहळ्यात मणिपुरी भाषेतील ’बूँग’ या चित्रपटाने ’सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट’ गटात बाजी मारून भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत असणारा गुगुन किपगेन हा बालकलाकार स्वतः कुकी-झो समुदायाचा असून त्याने यात मैतेई मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या हरवलेल्या वडिलांना परत …
Read More »पुन्हा उजळली चंदेरी दुनिया
कोरोना महामारीच्या काळात वेगाने लोकप्रिय झालेल्या ओटीटी कल्चरमुळे बॉलीवूड संकटात सापडल्याची चर्चा सातत्याने होत होती. विशेषतः चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांनी सिनेमे पाहण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा सर्रास केला जात होता. पण 2025 मध्ये भारतीय चित्रपटांच्या एकूण बॉक्स ऑफिस संकलनाने 13,395 कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीपूर्व काळातील सरासरीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक असून ती प्रेक्षकांच्या बदललेल्या मानसिकतेचे …
Read More »चर्चा नायकांच्या वयाची
बॉलीवूड अभिनेता इमरान खान याने अलीकडेच लोकमनातील एका विषयाची तार छेडली आहे. हा विषय म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान या खानावळींनी वयाची साठी ओलांडत आली तरी किती दिवस नायकाची व्यक्तिरेखा साकारायची? आणखी किती दिवस त्यांना प्रेक्षकांनी पडद्यावर नायकाच्या रुपात पाहायचे? या तिन्ही स्टार्सनी आता आता आपल्या वयाला साजेसा आणि वास्तववादी अभिनय करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र