सिनेमा आणि समाज यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. मोठा पडदा मनोरंजनाच्या गोष्टी सांगतानाच प्रशासकीय व्यवस्थेविरुद्ध आणि सामाजिक प्रश्नांविरुद्ध जागी होणाऱ्या चेतनेचंही प्रतिबिंब बनतो. जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार आणि द्वेषाचं वातावरण गडद होत गेलं, तेव्हा तेव्हा पडद्यावर एक काल्पनिक ‘जननायक’ जन्माला आला, ज्यानं सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पाऊल उचललं. दक्षिणेतील ‘जना नायकन’ सारखे चित्रपट स्त्री-सक्षमीकरणाचा संदेश देतात, तर हिंदीतील …
Read More »सिने समिक्षण
रुपेरी पडद्यावरची विद्यार्थी आंदोलने
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर मतभिन्नता स्वीकारण्याच्या आणि शांततापूर्ण विरोधाला स्थान देण्याच्या संस्कृतीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आंदोलने ही केवळ शैक्षणिक परिसरातील घटना नसून समाजातील बदलाची चाहूल देणारी शक्ती मानली जाते. जेव्हा तरुण पिढी शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, भ्रष्टाचार किंवा सार्वजनिक धोरणांविषयी प्रश्न उपस्थित करते, तेव्हा त्या प्रश्नांचे प्रतिबिंब साहित्य, नाटक आणि चित्रपटांमध्येही उमटते. हिंदी चित्रपटसृष्टीनेही विविध काळात …
Read More »ओटीटीवर दिग्गजांची मांदियाळी
भारतीय मनोरंजनविश्व एका अभूतपूर्व संक्रमणातून जात आहे. एकेकाळी रुपेरी पडदाच लोकप्रियतेचा, यशाचा आणि कीर्तीचा सर्वोच्च मानदंड मानला जात होता; परंतु गेल्या काही वर्षांत या संकल्पनेला मूलभूत धक्का बसला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे ओटीटी (ओव्हर द टॉप) या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली आहे. ही केवळ माध्यमांतराची प्रक्रिया नाही, तर प्रेक्षकांची अभिरुची, कलाकारांचे स्थान, कथानकाची मांडणी आणि मनोरंजन उद्योगाची …
Read More »अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कसोटी
भारतीय चित्रपटसृष्टीने आपल्या स्थापनेपासून समाजाचे वास्तव, त्यातील संघर्ष, विसंगती आणि बदलत्या काळाचे प्रतिबिंब पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जेव्हा जेव्हा या माध्यमाने व्यवस्था, सत्ताकेंद्रे किंवा प्रस्थापित सामाजिक कथनांना प्रश्न विचारण्याचे धाडस केले, तेव्हा तेव्हा त्याला राज्यसत्ता, दबावगट आणि रूढीवादी शक्तींच्या विरोधाला सामोरे जावे लागले. अलीकडे अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्या ‘सतलुज’ या चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद हा अशाच …
Read More »आगळावेगळा आर. माधवन
बॉलीवूड अभिनेता आर. माधवन याला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संवेदनशील नागरिक आणि कुटुंबवत्सल पिता अशा अनेक भूमिका आर. माधवनने यशस्वीपणे पार पाडल्या. अभिनयातील सहजता, भूमिकांमधील वैविध्य, दर्जेदार चित्रपटांची निवड आणि प्रसिद्धीपेक्षा कामाला दिलेले महत्त्व यांमुळे त्याने समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि निर्मितीतही त्याने …
Read More »स्टारडमचे बदलते गणित
एकेकाळी एखाद्या चित्रपटाच्या यशाचे पहिले संकेत तिकीट खिडकीबाहेर लागलेल्या रांगांमधून मिळत असत. चित्रपटगृहांबाहेरील गर्दी, शहरभर लागलेले पोस्टर्स, चित्रपट मासिकांच्या मुखपृष्ठांवरील छायाचित्रे आणि दूरचित्रवाणीवरील मुलाखती यांमधून एखाद्या अभिनेत्याची लोकप्रियता मोजली जात असे. मात्र डिजिटल युगाने या सगळ्या समीकरणांना पूर्णपणे बदलून टाकले आहे. आज कोणत्याही चित्रपटाच्या यशाची पहिली चाहूल बॉक्स ऑफिसवर नव्हे, तर इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्टस् आणि एक्सवरील ट्रेंडिंग हॅशटॅगमधून लागते. …
Read More »बालपट हरवले कोठे?
आजकाल शाळकरी मुले मैदानावर खेळण्यापेक्षा किंवा पालकांसमवेत फिरायला जाण्यापेक्षा घरातच मोबाईलवर खेळणे पसंत करतात. अर्थात काही मुले अपवाद असू शकतात, मात्र बऱ्याच ठिकाणी असेच चित्र पाहवयास मिळते. पूर्वी उन्हाळी सुटी आली की लहान मुलांना जादुचे प्रयोग, लहान मुलांसाठीचे चित्रपट, भटकंती यासारखे उपक्रम दिसायचे. आता जादूच्या प्रयोगाला मुलांपेक्षा पालकांचीच गर्दी अधिक दिसते. दुसरीकडे लहान मुलांचे चित्रपट टॉकीजवर लागतातच असे नाही आणि …
Read More »मोहिनी व्यवस्थेशी लढणाऱ्या नायकाची
हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला तर काही कथा अशा आहेत की त्या काळ बदलला, समाज बदलला, प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलल्या तरी पुन्हा पुन्हा नव्या रूपात समोर येत राहिल्या. त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकून राहिलेली कथा म्हणजे ‘एक माणूस विरुद्ध व्यवस्था’ ही. ही चित्रपटातील संघर्षाची चौकट सामान्य माणसाच्या मनातील असंतोष, अपेक्षा, न्यायाची आस आणि बदलाची आकांक्षा यांचे कलात्मक प्रतिबिंब आहे. म्हणूनच प्रत्येक …
Read More »गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र रहस्य, थरार आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम हा त्यांचा स्थायीभाव राहिला. देव आनंद यांच्या शैलीदार गुप्तहेरापासून ते आधुनिक काळातील जागतिक मोहिमा पार पाडणाऱ्या उच्च-तंत्रसज्ज नायकांपर्यंतचा हा प्रवास भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतला. रहस्याचा धूसर पडदा, शत्रूच्या छावणीतून येणारे गुप्त संदेश, प्रत्येक क्षणी बिंग फुटण्याचा धोका आणि …
Read More »पुनर्निमितीला उधाण
बॉलीवूडमध्ये जुन्या चित्रपटांची पुनर्निर्मिती, रीमेक, रिक्रिएशन किंवा पुनर्कल्पना ही आता अपवादात्मक गोष्ट राहिलेली नाही. गेल्या दोन दशकांत अनेक लोकप्रिय चित्रपट नव्या कलाकारांसह, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि बदललेल्या प्रेक्षकवर्गाला लक्षात घेऊन पुन्हा साकारले गेले. काहींनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले, तर काहींना प्रेक्षकांनी सपशेल नाकारले. प्रत्येक पिढीची स्वतःची अभिरुची, सामाजिक वास्तव आणि मनोरंजनाची भाषा असते. त्यामुळे जुन्या कथा नव्या काळाच्या संदर्भात …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र