लेख-समिक्षण

सिने समिक्षण

भावनाप्रधान गीतांचा काळ सरला

हिंदी सिनेसृष्टीतील असंख्य अवीट गीतांनी तीन पिढ्यांहून अधिक काळ भारतीय जनमानसाच्या मनाला मोहिनी घातली. आजही या गीतांची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. नव्या रुपामध्ये ही गाणी सादर केली जातात तेव्हा त्यांनाही तितकीच लोकप्रियता लाभते आहे. दुर्दैवाने, आज अशा गाण्यांची कमतरता भासत आहे. यामागचे कारण प्रतिभा संपली आहे असे नसून, हृदयापर्यंत पोहोचणारा रस्ता बदलला आहे आणि तो खूप छोटा करण्यात आला …

Read More »

खलनायकीचा नवा सुवर्णकाळ

सध्याच्या चित्रपटसृष्टीत खलनायक केवळ काळ्या-पांढऱ्या रंगातील नैतिक विभागणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता अँटी-हिरो, ग्रे-झोन आणि गुन्हेगारी केंद्रित कथानकाचा प्रतीक बनला आहे. ‌‘के.जी.एफ.‌’, ‌‘पुष्पा‌’, ‌‘मिर्झापूर‌’, ‌‘छावा‌’ आणि ‌‘ॲनिमल‌’ यांसारख्या कलाकृतींनी हा ट्रेंड अधिक मजबूत केला. बॉक्स ऑफिसची आकडेवारी सांगते की, प्रेक्षक आता या गडद आणि हिंसक पात्रांमध्ये थरार शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय खन्ना आणि बॉबी देओल यांनी ‌‘स्टार व्हिलन‌’चे …

Read More »

हिंसक चित्रपटांचा घातक प्रवाह

सध्याचे हिंसाचाराने माखलेले चित्रपट नव्या पिढीला धोकादायक वळणावर नेऊन ठेवत आहेत. बासु चॅटर्जी, गुुरू दत्त, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, यश चोप्रा यांसारख्या अभिजात दिग्दर्शकांची पिढी भूतलावर अवतरली तर बॉलिवुडपटांचा झालेला विचका पाहून ‌‘नको तो चित्रपट‌’ असे म्हणतील अशी आजची स्थिती आहे. टिव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचारांची दृश्य अल्पवयीन मुलांवर नकारात्मक परिणाम करत आहेत. या लोकप्रिय होत चाललेल्या धोकादायक ट्रेंडला …

Read More »

चरित्र अभिनेत्यांच्या दुनियेत…

बॉलिवूडमध्ये आता केवळ ‌‘हिरो‌’ची चलती राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत चरित्र अभिनेत्यांचे (उहरॲरलींशॲ अॲींळीीीं) स्थान कमालीचे भक्कम झाले आहे. एकेकाळी नायकाच्या सावलीत वावरणारे हे कलाकार आता स्वतःच्या खांद्यावर चित्रपट पेलू लागले आहेत. परेश रावल, प्रकाश राज यांच्यापासून ते पंकज त्रिपाठी आणि मनोज बाजपेयींपर्यंतच्या कलाकारांनी हे सिद्ध केले आहे की, अभिनय सकस असेल तर पडद्यावरची ‌‘स्पेस‌’ महत्त्वाची नसते, तर भूमिकेची व्याप्ती …

Read More »

‌‘धुरंधर‌’ची घोडदौड कशामुळे?

रणवीर सिंगसह सहकलाकारांचा दमदार अभिनय, आदित्य धरचे कसलेले दिग्दर्शन आणि ऐतिहासिक घटनांची गुंतलेली गुंफण यांमुळे ‌‘धुरंधर‌’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. ‌‘धुरंधर‌’ ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहाची नांदी आहे. आशयघन मांडणीला तांत्रिक भव्यतेची जोड मिळते, तेव्हा बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडीत निघतात, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. राष्ट्रवाद, इतिहास आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असल्याने हा …

Read More »

राज कपूर ः द ग्रेट शोमन

हिंदी चित्रपटसृष्टिचे ग्रेट शोमन राज कपूर यांच्याबद्दल ठळक गोष्टी सर्वांनाच माहिती असतील. पण ते कसे घडले. त्या सर्वांची पार्श्वभूमी काय होती, हे जाणून घेताना प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा काही घटना या ‌‘शोमॅन‌’च्या आयुष्यात घडल्या. काही अफवा पसरल्या. त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे, परिस्थितीला बिनधास्तपणे, आव्हानात्मकरित्या स्वीकारण्याच्या स्वभावामुळे त्या अफवांना चांगलं पीक आलं. त्यांच्या देखणेपणामुळे त्या गोष्टींना अधिकाधिक खतपाणी मिळालं. त्या गोष्टी अधिक …

Read More »

कलाकारांचे बहुविवाह

भारतीय समाजात आजही दुसऱ्या विवाहाला मान्यता मिळताना दिसत नाही. विशेषतः पहिली पत्नी हयात असताना किंवा तिच्यासोबत घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह करणे ही सरळसरळ प्रतारणाच असते. परंतु सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी ही प्रतारणा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही केल्याचे दिसते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राज बब्बर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, आमीर खान, सैफ अली खान यांसारख्या नायकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या विवाहांच्या चर्चांमुळे …

Read More »

कहाणी रुपेरी पुष्पप्रेमाची

फुल हे सौंदर्य, सुवासिक आणि मोहकतेचे प्रतीक आहे. केवळ महिलाच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या वयोगटातील प्रत्येकाला फुलांविषयी आकर्षण राहिले आहे. भगवंताच्या पूजेतही फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी चित्रपटांतही विविध रंगाच्या आणि रुपाच्या फुलांनी नायिकेच्या सौंदर्यात भर घातलेली दिसून येते. कृष्णधवल काळापासून ते इस्टमनकलरपर्यंतच्या चित्रपटांवर फुलांचा बहर पाहवयास मिळाला आहे. त्याचवेळी चित्रपट गीतांत प्रेम आणि विरहात फुलांनी मोलाची भूमिका बजावली …

Read More »

चिरतरुण धर्मेंद्र

सिनेसृष्टीतील जुन्या नायकांच्या मांदियाळीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवून तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. चित्रपटांमधील नायकाकडून प्रेक्षकांना असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांचे वर्णन करावे लागेल. नव्वदीनंतरच्या काळात सिनेसृष्टीत चॉकलेट हिरोंची सद्दी निर्माण झाली; पण धर्मेंद्र यांनी साकारलेला नायक हा बलाढ्य खल प्रवृत्तींशी लढणारा, संघर्ष करणारा, कोणत्याही …

Read More »

यावसायिक वि अभिजात

तिकीटबारीवर यशवी ठरलेले चिपट समरणीय असतीलच असे नाही. दसरीकडे अभिजात आणि बहचचित चिपटानी बास आफिसवर चागले यश मिळवलेले असेलच असेही नाही. लासिक वि कमशियल अशी पधा नसली तरी दोही श्रेणीतील चिपटानी वेळावेळी आपला ठसा उमटविला आहे. ामुयाने दजेदार, अभिजात चिपटानी काहीवेळा तिकीटबारीवर जोरदार दशन केले आणि ते पिढयानपिढया मनोरजन करत राहिले. उदा. मुघल ए आझम, शोले, दिवार आदींचा उेख करता …

Read More »