दोन दशकांपूर्वी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली रिमी आता चंदेरी दुनियेपासून दूर असून तिने दुबईमध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून आपल्या नवीन करिअरची सुरुवात केली आहे. रिमीच्या प्रवासाची सुरुवात सुपरस्टार आमिर खान याच्यासोबतच्या एका गाजलेल्या जाहिरातीतून झाली होती. या जाहिरातीने तिला रातोरात घराघरांत …
Read More »TimeLine Layout
February, 2026
-
1 February
छोटी गावे, मोठे चित्रपट
बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेरसिकांना देश-विदेशातील नितांतसुंदर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवले. स्वित्झर्लंड, मॉरीशस, लंडन, ऑस्ट्रेलिया यांसह जगभराची सफर रुपेरी पडद्यामधील दृश्यांमधून प्रेक्षकांना घडवून आणली आणि ती पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही छोट्या गावांमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले. ‘स्वदेस’, ‘पीके,’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गंगाजल’, ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा आपला गाव पाहून या गावच्या मातीशी नाळ …
Read More » -
1 February
नियमित अभ्यासच गरजेचा!
सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये ‘एक्झाम फीव्हर’ची चर्चा रंगू लागली आहे. कारण परीक्षा आता जवळ येत आहेत. खरे पाहता परीक्षा ही भीती नसून केवळ स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन करण्याची पद्धत आहे. पण बहुतेक विद्यार्थी वर्षभर आजचा अभ्यास उद्यावर ढकलतात. परिणामी, परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाचा डोंगर उभा राहतो. चांगली तयारी करण्यासाठी रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेळापत्रक बनवून सर्व विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्या …
Read More » -
1 February
कमी उंचीच्या तरुणींसाठी स्टाईलमंत्रा
आजही अनेक मुली कमी उंचीमुळे स्टाईलच्या बाबतीत काहीशा बावचळलेल्या दिसतात. त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो. वास्तविक, उंची कमी असली तरीही योग्य कपडे, रंगसंगती आणि फॅशन ट्रिक्समुळे तुम्ही अधिक उंच, स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बनू शकता. कंबरेच्या वर असणारे बॉटम्स घाला ः हाय-वेस्ट जीन्स, पँट किंवा स्कर्ट अशा प्रकारचे कपडे कंबरेच्या थोड्या वरपासून सुरू होतात. त्यामुळे पाय लांब दिसतात आणि शरीराचा खालचा भाग …
Read More » -
1 February
हरणाच्या बेंबीपासून परफ्यूम
गलात एक कस्तुरी मृग राहतो, ज्याच्या बेंबीचा सुगंध हा जगातील सर्वात आकर्षक असा सुगंध आहे, हे कविता आणि निबंधांमध्ये वाचत आलो आहोत. तर या सुगंधाची इच्छा इतकी प्रबळ आहे की तो सुगंध मिळविण्यासाठी मानवाने मोठ्या प्रमाणावर हरणांची शिकार केली आहे. अनेक लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. याला केवळ एक गैरसमज मानतात. पण, खास मृग (हरीण) ‘कस्तुरी‘ आणि त्यातून येणाऱ्या अप्रतिम …
Read More » -
1 February
बालपणीच्या धक्क्यातून जन्मले ‘द मार्ग इनिशिएटिव्ह’
बेंगळुरू येथील 14 वर्षीय सूर्य उत्कर्ष याने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी एका मोठ्या रस्ते अपघाताचा अनुभव घेतला होता. या अपघाताने सूर्याला भारतात रस्ते सुरक्षेबाबत पुरेशी जागरूकता आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. कालांतराने इतर अपघातग्रस्तांच्या संपर्कात आल्यावर त्याला याबाबत काहीतरी ठोस करावे असे वाटू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी, वयाच्या 12 व्या वर्षी त्याने ‘द मार्ग इनिशिएटिव्ह’ ही …
Read More » -
1 February
इराणची पाठराखण: भारताचे धोरणात्मक पाऊल
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये इराणविरुद्ध मांडण्यात आलेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रस्तावाविरोधात मतदान करून भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची आणि इराणसोबतच्या धोरणात्मक संबंधांची प्रचिती पुन्हा एकदा जगाला दिली आहे. पाश्चात्य देशांनी आणलेला हा प्रस्ताव प्रामुख्याने इराणमध्ये गेल्या वर्षाच्या शेवटी सुरू झालेल्या देशव्यापी निदर्शनांशी संबंधित होता, ज्यामध्ये मानवी हक्कांच्या पायमल्लीचा आरोप करण्यात आला होता. या प्रस्तावात इराण सरकारने आंदोलकांवर केलेल्या अमानुष बलप्रयोगाचा आणि …
Read More » -
1 February
स्वच्छ इंधनासाठी हवी भरीव गुंतवणूक
जीवाश्म इंधनाच्या (फॉसिल फ्युएल) बेसुमार वापरामुळे निर्माण झालेल्या हवामान संकटामुळे आज संपूर्ण जगाला स्वच्छ इंधनाची निकड भासू लागली आहे. मात्र, या दिशेने होणारे प्रयत्न अत्यंत अपुरे असल्याचे दिसून येते. स्वच्छ इंधन आणि अक्षय ऊर्जेबाबत (रिन्यूएबल एनर्जी) कागदावर अनेक योजना आखल्या जात असल्या तरी, त्यांच्या अंमलबजावणीचा वेग कमालीचा संथ आहे. आजही जगाचा कल जीवाश्म इंधनावरच अधिक असल्याने, हवामान बदलाबाबत जागतिक स्तरावर …
Read More » -
1 February
अजित पवार यांना अखेरचा निरोप
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात गुरुवारी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह …
Read More » -
1 February
अर्थपूर्ण ठरो अर्थसंकल्प
गेल्या काही दिवसांपासून देशाचेच नव्हे तर सबंध जगाचे लक्ष संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कडे लागले आहे. सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर यंदा केवळ देशांतर्गत अपेक्षांचेच नव्हे, तर जागतिक अस्थिरतेचेही मोठे आव्हान आहे. महागाई, बेरोजगारी आणि बदलत्या जागतिक व्यापार समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, हा अर्थसंकल्प भारताच्या भविष्यातील आर्थिक दिशेचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







