चित्रपटसृष्टीत भव्यदिव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि कोट्यवधींचा बजेट म्हणजेच सिनेमा हिट होण्याचे सूत्र, असा एक समज वर्षानुवर्षेचालत आला आहे. मात्र, आशयघन कथा आणि सशक्त अभिनय यांच्या जोरावर अल्प बजेटमध्ये तयार झालेले चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात, हे ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले आहे. 7 ऑगस्ट रोजी अत्यंत शांततेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत धीम्या गतीने सुरुवात …
Read More »TimeLine Layout
September, 2026
-
20 September
रुपेरी पडद्यावरचा बाप्पा
गणपतीच्या आरतीचा स्वर, ढोल-ताशांचा वाढता गजर, गुलालाने भरलेले रस्ते आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पुढे सरकणारी विसर्जन मिरवणूकहे दृश्य महाराष्ट्राच्या उत्सवसंस्कृतीइतकेच भारतीय चित्रपटांच्या पडद्यावरही परिचित झाले आहे. कधी नायकाच्या आयुष्यातील निर्णायक वळणाचा साक्षीदार, कधी संकटात श्र्द्धेचा आधार, तर कधी मुंबईच्या चाळी-वस्त्यांतील सामूहिक जगण्याचा उत्सव म्हणून गणराया सिनेमात भेटत राहिला. गणेशोत्सवाने सिनेमातील गाणी, नृत्य आणि भव्यतेला आपलेसे केले. यातून गणेशोत्सव आणि …
Read More » -
20 September
समस्या सोडविण्याची कला शिका
परीक्षेचा ताण असो, नोकरीची चिंता असो, लग्नाची तयारी असो किंवा पैशांची अडचण असो, आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावेच लागते. समस्या नसलेले आयुष्य कदाचित कोणाचेच नसते. मात्र, समस्या आली की काही जण घाबरून जातात, तर काही जण शांतपणे परिस्थितीचा विचार करून त्यातून मार्ग काढतात. फरक असतो तो समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा. समस्या सोडविण्याचे कौशल्य जन्मतः मिळत नाही; ते …
Read More » -
20 September
गुळ आणि लिंबाने घालवा मुरुमांचे व्रण
चेहऱ्यावरील काळे आणि तपकिरी डाग ही सध्या एक सामान्य समस्या बनली आहे. प्रखर ऊन, मुरुमांचे वण, संप्रेरकांमधील बदल (हार्मोनल चेंजेस) किंवा पिगमेंटेशनमुळे त्वचेचा पोत आणि रंग असमान दिसू लागतो. यावर उपाय म्हणून अनेक जणी महागड्या रासायनिक उत्पादनांचा आधार घेतात, मात्र गुळ आणि लिंबू यांसारख्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करूनही त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवता येते. लिंबामध्ये निसर्गतः व्हिटॅमिन …
Read More » -
20 September
सर्वात खोलवरची भुयारी रेल्वे
जमिनीवर वेगाने धावणाऱ्या ट्रेन तुम्ही पाहिल्या असतील, हवेत लटकलेल्या पुलावरून जाणाऱ्या ट्रेनही पाहिल्या असतील. समुद्रावरून धावणाऱ्या रेल्वेचा प्रवासही केला असेल आणि ट्रेन भुयारात अदृश्य झाल्यावर लहानपणी टाळ्याही वाजवल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रवासाला घेऊन जात आहोत, जिथे ट्रेन एकदा भुयारात शिरली की 57 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यावरच बाहेर पडते! आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात लांब आणि सर्वात …
Read More » -
20 September
उष्ण हवामानातील ‘केशरयुक्त’ यशोगाथा
केशर म्हटले की डोळ्यांसमोर काश्मीरची थंड हवा आणि जांभळ्या फुलांनी बहरलेली शेती येते. विशिष्ट तापमान आणि हवामानाची गरज असल्यामुळे केशराचे उत्पादन प्रामुख्याने काश्मीरशी जोडले गेले आहे. मात्र नागपूरच्या उष्ण हवामानातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केशराचे उत्पादन घेता येते, हे अक्षय होले आणि दिव्या लोहकरे होले या दाम्पत्याने दाखवून दिले आहे. ‘शाया एंटरप्रायझेस’च्या माध्यमातून त्यांनी नियंत्रित वातावरणात केशर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला. …
Read More » -
20 September
ट्रम्पना दणका, भारताला दिलासा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका आणखी मनमानी निर्णयाला तेथील फेडरल न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे नवे नियम लागू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण आदेश आला आहे. ट्रम्प प्रशासनाला परदेशी विद्यार्थी, संशोधक आणि पत्रकारांच्या अमेरिकेतील मुक्कामाच्या कालावधीवर मर्यादा घालायची होती. परंतु न्यायालयाने सरकारचे हे दावे अत्यंत कमकुवत असल्याचे सांगत ते फेटाळून लावले आहेत. हा निर्णय भारतीय …
Read More » -
20 September
अतिक्रमणाचा वाढता विळखा
देशातील रस्त्यांवर वाढत चाललेले अतिक्रमण ही आता केवळ वाहतुकीची अडचण उरलेली नसून, तो एक अत्यंत गंभीर सुरक्षेचा प्रश्न बनला आहे. रस्त्यांच्या कडेला होणारे अवैध बांधकामांचे विस्तार, पदपथांवर थाटलेली दुकाने आणि रस्त्यांवर केली जाणारी बेशिस्त पार्किंग यामुळे महामार्ग आणि शहरांतील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहेत. वाहनांच्या संख्येत होणाऱ्या प्रचंड वाढीमुळे रस्त्यांचा एक मोठा भाग अनधिकृत पार्किंग आणि मालवाहतुकीच्या साहित्यासाठी वापरला …
Read More » -
20 September
मनोज जरांगेंचे उपोषण मागे
अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची सरकारचे शिष्टमंडळाने भेट घेतली. 20 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या मनोज जरांंगे यांनी 17 सप्टेंबर रोजी आपले आंदोलन संपवले. त्यांनी महाराष्ट्र सरकारला आपल्या मागण्यांवर कारवाई करण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांंगे यांनी गुरुवारी आपले 20 दिवसांचे उपोषण संपवले. मात्र, त्यांनी महाराष्ट्र सरकारला स्पष्ट इशारा …
Read More » -
20 September
‘युपीआय’ ला शुल्कचौकट
ऑनलाईन बँकिंगच्या सुरुवातीच्या काळात आरटीजीएस, एनईएफटीद्वारे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी शुल्कआकारणी केली जात होती. त्यामुळे अनेक जण बँकेकडून ही सुविधा घेऊनही तिचा सरसकट वापर करत नसत. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांच्या डिजिटलायजेशनची प्रक्रिया संथ गतीने होण्यात झाला. पेटीएमने 2014 मध्ये आपले परवानाधारक वॉलेट बाजारात आणले तेव्हा सुरुवातीच्या काळात व्यापाऱ्यांसाठी प्रतिव्यवहार प्रक्रिया शुल्क आकारले जात होते. फेब्रुवारी 2016 मध्ये …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







