लेख-समिक्षण
  • 22 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

March, 2026

  • 22 March

    ‌‘लकडबग्घा-2‌’चा टीझर रिलीज

    अभिनेता आणि दिग्दर्शक अंशुमन झा याने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‌’लकडबग्घा 2: द मंकी बिझनेस‌’ या बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. ‌‘फर्स्ट रे फिल्म्स‌’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली असून, हा भाग इंडोनेशियमधील दुर्मिळ होत चाललेल्या ‌‘सेलेबेस क्रेस्टेड …

    Read More »
  • 22 March

    कलाकारांचा आर्थिक संघर्ष

    सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी याबाबत मतप्रदर्शन केले. वास्तविक सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या नशिबी अशा प्रकारे आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली होती. शोमन राज कपूर, बिग बी अमिताभ बच्चन, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांनाही आर्थिक नियोजन चुकल्याचा फटका सहन करावा लागला. परंतु या कलाकारांनी प्रचंड मेहनतीने परिस्थिती पालटवली. या …

    Read More »
  • 22 March

    वायरलेस चार्जिंग ः फायद्याचे की तोट्याचे?

    स्मार्टफोनच्या जगात सध्या ‌‘वायरलेस चार्जिंग‌’ हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. केबलची कटकट नसल्यामुळे अनेकजण या सुविधेला पसंती देत आहेत. मात्र, या तंत्रज्ञानामुळे फोनच्या बॅटरीवर विपरीत परिणाम होतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो. याविषयी… गेल्या काही वर्षांत वायरलेस चार्जिंगचे तंत्रज्ञान घराघरांत पोहोचले आहे. आता केवळ महागड्या स्मार्टफोनमध्येच नव्हे, तर कारमध्येही हे फीचर मिळू लागले आहे. चार्जिंग पॅडवर फोन ठेवला की …

    Read More »
  • 22 March

    पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

    आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय वाढल्यानंतर स्रियांचे केस पांढरे होत असत; पण आज अनेक महिला वयाच्या साठीसमीप असतानाही त्यांचे केसे काळे आहेत. याउलट अगदी कॉलेजगोईंग तरुणींपासून 30-35 च्या वयातील मुली केस पांढरे होऊ लागल्यामुळे अनेक प्रकारची औषधे घेताना दिसताहेत. यामागे चुकीची जीवनशैली, अस्वास्थ्यदायक आहार, तणाव, प्रदूषण आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा अधिक …

    Read More »
  • 22 March

    ‌‘हा‌’ आहे पृथ्वीवरील शेवटचा रस्ता

    जग कुठे संपतेय, जगाचे शेवटचं टोक कुठे आहे, असे प्रश्न फक्त लहान मुलांनाच नाही, तर सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी तरी येत असतात. जगाचे शेवटचे टोक कुठे आहे, हे माहिती नसले तरीही जगाचा शेवटचा रस्ता कोणता, हे निश्चित झाले आहे. या रस्त्याला जगातील अखेरचा रस्ता मानले जाते. या रस्त्यानंतर जग संपत असल्याचे देखील मानले जाते. पृथ्वीवरील या शेवटच्या रस्त्याचे नाव …

    Read More »
  • 22 March

    दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

    जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्योगपती सत्यनारायण नुवाल. राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर स्फोटक आणि संरक्षण क्षेत्रातील एका महाकाय साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‌‘पद्मश्री‌’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. सत्यनारायण नुवाल यांचा जन्म 25 जुलै …

    Read More »
  • 22 March

    वांगचुकांच्या सुटकेचा अर्थ

    लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने घुमजाव केले आहे. गृहमंत्रालयाने वांगचुक यांच्यावर लादलेला एनएसए रद्द केला आहे. त्यामुळे सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांचा सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करून सोनम यांची नजरकैद …

    Read More »
  • 22 March

    वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

    देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेत हवाई दलाच्या दोन वैमानिकांना वीरमरण आले. त्याआधी रांचीजवळ झालेल्या एअर ॲम्ब्युलन्सच्या अपघातात रुग्णासह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी बारामतीमध्ये (महाराष्ट्र) चार्टर विमान कोसळून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी जून महिन्यात अहमदाबादमध्ये एअर …

    Read More »
  • 22 March

    पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

    केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांची आणि पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचीदेखील घोषणा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचादेखील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी …

    Read More »
  • 22 March

    ऊर्जा राजनयाचे यश

    होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जगाची तेलजहाजे अडकून पडलेली असताना भारताने आपली जहाजे सोडवून आणण्यात यश मिळवले आहे. हा भारताचा राजनैतिक आणि कूटनीतीक विजय आहे. भारताची ही मुत्सद्देगिरी केवळ तेलापुरती मर्यादित नाही, तर ती प्रादेशिक स्थिरतेसाठीही आहे. पश्चिम आशियात लाखो भारतीय कामगार वास्तव्यास आहेत, ज्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही भारत सरकारवर आहे. कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष या भारतीयांच्या आयुष्याला धोक्यात टाकू शकतो. त्यामुळेच भारताने लष्करी …

    Read More »