• 14 jun 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4209

TimeLine Layout

June, 2026

  • 14 June

    ‌‘बंटवारा‌’साठी आमीरचा पुढाकार

    आमिर खान, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या बहुप्रतीक्षित ‌‘लाहोर 1947‌’ या चित्रपटाच्या शीर्षकात (टायटल) मोठा बदल करण्यात आला असून, आता हा चित्रपट ‌‘बंटवारा‌’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शीर्षकाचे हक्क मिळवण्यासाठी स्वतः निर्माता आमिर खानने घेतलेल्या पुढाकारामुळे हा महत्त्वपूर्ण बदल शक्य झाला आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‌‘लाहोर 1947‌’ असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, एका …

    Read More »
  • 14 June

    गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

    बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र रहस्य, थरार आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम हा त्यांचा स्थायीभाव राहिला. देव आनंद यांच्या शैलीदार गुप्तहेरापासून ते आधुनिक काळातील जागतिक मोहिमा पार पाडणाऱ्या उच्च-तंत्रसज्ज नायकांपर्यंतचा हा प्रवास भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतला. रहस्याचा धूसर पडदा, शत्रूच्या छावणीतून येणारे गुप्त संदेश, प्रत्येक क्षणी बिंग फुटण्याचा धोका आणि …

    Read More »
  • 14 June

    संरक्षणदलातील आधुनिक करिअरसंधी

    लष्करी रणनीती आणि युद्धपद्धतीचे पारंपारिक स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून, आधुनिक संरक्षण क्षेत्र हे केवळ बंदुका आणि रणगाड्यांच्या पल्याड गेले आहे. आज जगातील प्रत्येक राष्ट्रे प्रत्यक्ष युद्धभूमीपेक्षा डिजिटल आणि तांत्रिक आघाड्यांवर अधिक सक्रिय आहेत. यामुळेच संरक्षण दलांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञान या क्षेत्रांना अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे. तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या आणि देशसेवेची इच्छा बाळगणाऱ्या तरुण …

    Read More »
  • 14 June

    लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

    लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करतात, परंतु बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अर्पित गुप्ता यांच्या मते ही पद्धत चुकीची आहे. मुलांचे हात आणि मेंदू अक्षरे लिहिण्यासाठी लगेच तयार नसतात. त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने आणि खेळाच्या माध्यमातून लिहिण्यास शिकवले पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर कोणताही ताण येणार नाही. 1. सुरुवातीला फक्त ओरखडे (स्क्रिबलिंग) काढू द्या डॉक्टर अर्पित …

    Read More »
  • 14 June

    मिमांस वामकुक्षीची

    अनेकजण दुपारी जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होतात. दुपारची ‌‘वामकुक्षी‌’ या नावाने अनेक लोक तासाभराची का होईना झोप काढत असतात. अर्थात, दुपारच्या जेवणानंतर झोप येणे किंवा सुस्ती येणे, हे अगदी साहजिक आहे. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर आपल्या आजूबाजूचे बरेच लोक जांभई देताना दिसतात. कधीकधी आपल्याला शरीरातून सर्व ऊर्जा निघून गेली आहे आणि झोपेशिवाय पर्याय नाही, असेही वाटते. पण, दुपारच्या जेवणानंतर …

    Read More »
  • 14 June

    जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

    तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप पत्करली, केवळ मॅगी खाऊन दिवस काढले आणि आज तो एका यशस्वी कंपनीचा मालक बनला आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे इमॅन्युएल जॉन या तरुण उद्योजकाची. इमॅन्युएल जॉन यांनी 2018 मध्ये 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये कोडिंग शिकण्यासाठी 10 हजार रुपयांची इंटर्नशिप स्वीकारली. पैशांच्या …

    Read More »
  • 14 June

    तपपूर्तीचे मूल्यमापन

    नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली त्याला 9 जून रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आणि मोदी यांच्या एकूण पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला बारा वर्षे पूर्ण झाली. सलग बारा वर्षे पंतप्रधानपदाची कारकीर्द पूर्ण करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. सर्वसाधारणपणे भारतीय संस्कृतीमध्ये बारा वर्षांची तपश्चर्या सर्वमान्य आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीकडे पहावे लागणार आहे. 2014 मध्ये …

    Read More »
  • 14 June

    दिलासादायक माघार

    केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशातील ऊसउत्पादक , साखर कारखानदार, गूळ खांडसरी उत्पादक आणि छोटी गाळप केंद्रे यांच्यासाठी हा निर्णंय मोठा दिलासादायक आहे. तब्बल 60 वर्षेजुन्या असलेल्या या आदेशाच्या जागी एक नवी आणि आधुनिक नियामक व्यवस्था आणण्याचा केंद्र सरकारचा मानस होता. मात्र, या प्रस्तावित मसुद्यातील काही …

    Read More »
  • 14 June

    तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

    पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. राज्यात आमदार फुटल्यानंतर आता टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी केली. या बंडखोर खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणाही केली आहे, ज्यामुळे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर हा …

    Read More »
  • 14 June

    आघाडीची धडपड

    काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि त्या पक्षावर अजूनही गांधी परिवाराचीच हुकूमत असल्याने हा पक्ष क्षीण झाला असला तरी, संपलेला नाही किंवा तो फुटीच्या उंबरठ्यावरही उभा नाही. त्यामुळे काँग्रेसच्या झेंड्याखाली निःसंशयपणे एकत्र येऊन भाजपाला समर्थ पर्याय देण्याची क्षमता इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये नक्कीच आहे, प्रश्न फक्त संघर्षाचा खडतर मार्ग पत्करण्यापुरता मर्यादित आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, ही वस्तुस्थितीच …

    Read More »