रुक्ष आणि निर्जीव केस: तुमचे केस कोरडे दिसत असतील, तर त्यांना खोलवर ओलावा देण्याची गरज असते. अशा केसांसाठी खोबरेल तेल किंवा आर्गन तेल सर्वोत्तम आहे. नारळ तेल प्रथिनांचा ऱ्हास रोखते, तर आर्गन तेलातील जीवनसत्व ‘ई’ केसांना चकाकी देते. केस पातळ होणे आणि गळती : केस गळत असतील तर रक्ताभिसरण वाढवणे गरजेचे असते. अशा वेळी रोझमेरी तेल किंवा एरंडेल तेल वापरावे. …
Read More »महिला
‘शेरेटिंग’चा मोह टाळाच !
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आनंदाचे क्षण जगासोबत शेअर करणे ही आता एक सामान्य बाब बनली आहे. विशेषतः पालकांसाठी आपल्या मुलाचे पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस किंवा त्याचे गोड हसू फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे अभिमानास्पद वाटते. मात्र, या ‘शेरेटिंग’ (शेअरिंग + पेरेंटिंग) मुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या मुलाच्या सुरक्षिततेला आणि गोपनीयतेला धोक्यात आणत आहात. 1. खासगी माहिती आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोशल …
Read More »ओपन किचनला पार्टीशन हवंय ?
आजकालच्या आधुनिक घरांमध्ये ‘ओपन किचन’ची फॅशन असली तरी अनेकदा काम करताना मोकळेपणा न वाटल्यामुळे किंवा पाहुण्यांसमोर स्वयंपाक करताना संकोच वाटल्यामुळे ते झाकण्याची गरज भासते. यासाठी भिंत बांधण्याऐवजी काही पर्याय वापरता येतील: 1. मणी किंवा काचेच्या माळा (ग्लास बीड्स) ः तुम्हाला किचन पूर्णपणे बंद करायचे नसेल आणि आधुनिक लूक कायम ठेवायचा असेल, तर प्लास्टिक, लाकूड किंवा काचेच्या मण्यांच्या माळा वापरणे हा …
Read More »केसांना नैसर्गिंक चकाकी देण्यासाठी…
केस सरळ आणि चमकदार दिसावेत यासाठी आजकाल अनेक तरुण-तरुणी पार्लरमध्ये जाऊन ‘रिबॉन्डिंग’ किंवा ‘कॅरेटिन’ सारख्या रासायनिक प्रक्रियांचा आधार घेतात. मात्र या रासायनिक उपचारांचे परिणाम तात्पुरते असतात आणि कालांतराने रासायनिक प्रक्रियांमुळे केस अधिक कोरडे व निर्जीव होऊ लागतात. केसांचे नैसर्गिक आरोग्य जपून त्यांना घरच्या घरीच पार्लरसारखी चकाकी मिळवून द्यायची असेल, तर स्वयंपाकघरातील काही साध्या घटकांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. नैसर्गिकरीत्या …
Read More »‘राईट ब्रेन एज्युकेशन’ म्हणजे काय ?
मूल जन्माला येते तेव्हा ते अफाट मानसिक क्षमता आणि कुतूहल घेऊन येते. शिक्षणातील प्रगत संशोधनानुसार, वयाची पहिली सात वर्षे बालकाच्या संज्ञानात्मक (कॉग्निटिव्ह) विकासासाठी अत्यंत संवेदनशील असतात. या काळात मेंदूला जितकी माहिती आणि योग्य प्रशिक्षण मिळेल, तितकी त्याची ग्रहणशक्ती विस्तारते. मात्र, योग्य वेळी योग्य दिशा न मिळाल्यास या नैसर्गिक क्षमता काळाच्या ओघात सुप्त राहण्याची भीती असते. म्हणूनच, केवळ शालेय तयारी नव्हे, …
Read More »घरच्या घरी ’गुलाब जल’ बनवताय ?
व्हॅलेंटाईन डेला मिळालेले गुलाब असोत किंवा पूजेनंतर उरलेली फुले, ती फेकून देण्याऐवजी त्यांचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी करणे अधिक फायदेशीर ठरते. बाजारातून विकत आणलेल्या उत्पादनांपेक्षा घरच्या घरी तयार केलेले गुलाब जल फेस पॅक किंवा टोनर म्हणून वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. हे गुलाब जल बनवण्यासाठी प्रथम एक कढई गॅसवर ठेवून तिच्या मध्यभागी एक छोटी रिकामी वाटी ठेवावी. गुलाबाच्या पाकळ्या देठापासून वेगळ्या करून …
Read More »कलरींग केल्यानंतरही केस पांढरे दिसताहेत ?
केसांना कलर केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच मुळाशी पांढरे केस दिसू लागतात. अशा वेळी पुन्हा पूर्ण केसांना कलर केल्यास केसांचा पोत आणि आधीचा रंग खराब होऊ शकतो. केवळ मुळापाशी आलेला पांढरेपणा प्रभावीपणे कसा घालवायचा? रुट टचअपसाठी रंगाचे मिश्र्ण तयार करताना प्रमाण अत्यंत महत्त्वाचे असते. तज्ज्ञांच्या मते, यासाठी 1:1.3 (एक जसे दीडच्या जवळ) हे गुणोत्तर वापरावे. कलर: 20 ग्राम आणि डेव्हलपर: 30 ग्राम …
Read More »गर्भारकाळात प्रवास करताय ?
गर्भारपणात प्रवास करावा की नाही, हा प्रश्न प्रत्येक होणाऱ्या मातेच्या मनात असतो. जुन्या काळी गर्भवती स्त्रियांना घराबाहेर पडण्यास मनाई केली जात असे, मात्र आजच्या आधुनिक जीवनशैलीत आणि प्रगत वाहतूक व्यवस्थेमुळे गर्भारपणातील प्रवास पूर्वीपेक्षा सुलभ झाला आहे. तरीही, प्रवासाचे नियोजन करताना स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची सुरक्षितता लक्षात घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रवासासाठी वाहनाची निवड करणे हा सुरक्षिततेचा पहिला टप्पा आहे. स्वतःची …
Read More »लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करतात, परंतु बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अर्पित गुप्ता यांच्या मते ही पद्धत चुकीची आहे. मुलांचे हात आणि मेंदू अक्षरे लिहिण्यासाठी लगेच तयार नसतात. त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने आणि खेळाच्या माध्यमातून लिहिण्यास शिकवले पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर कोणताही ताण येणार नाही. 1. सुरुवातीला फक्त ओरखडे (स्क्रिबलिंग) काढू द्या डॉक्टर अर्पित …
Read More »सिझेरियन शस्त्रक्रिया किती वेळ सुरक्षित?
नेतृत्व हा कोणत्याही महिलेच्या जीवनातील अत्यंत सुखद अनुभव असतो, मात्र त्यासोबतच हा काळ शारीरिकदृष्ट्या तितकाच आव्हानात्मक असतो. नैसर्गिक प्रसूती न होता जेव्हा शस्त्रक्रियेद्वारे म्हणजेच सी-सेक्शनद्वारे बाळाचा जन्म होतो, तेव्हा परिस्थिती अधिक नाजूक बनते. शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर मातेच्या शरीरावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. अशा वेळी सिझेरियन शस्त्रक्रिया किती वेळा करणे सुरक्षित आहे? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. प्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र