लेख-समिक्षण

इनर स्टोरी

परकीयांच्या हाती नकोत बँकांची सूत्रे

मार्च 2020 मध्ये भारताची एक नामांकित खासगी येस बँक ही व्यवस्थापनाने केलेल्या चुकांमुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचली. एखादी पतसंस्था दिवाळीखोरीत निघाल्यावर ठेवीदारांची ज्याप्रमाणे शाखेबाहेर गर्दी होते, तशी गर्दी येस बँकेच्या शाखांबाहेर झाली. एटीएममधून ठरावीक रक्कमच काढता येत होती. कमी कालावधीत दबदबा निर्माण केलेल्या या बँकेच्या शेअरचे मूल्य तीन अंकीवरून दोन अंकावर आले. अशावेळी भारतीय स्टेट बँकेने 49 टक्के शेअर खरेदी करत …

Read More »

घातक खोडसाळपणाचे आव्हान

एकीकडे देशातील विमानप्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रकार घडले. सोशल मीडिया किंवा ईमेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणार्‍यांचा शोध लावू शकत नाही. यामागचे …

Read More »

बालविवाहांचे कटू वास्तव

नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी 2022 मध्ये बालविवाह मुक्त भारत आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाचा उद्देश 2030 पर्यंत देशातून बालविवाहाचे उच्चाटन करणे हा होता. पण आजही कोठे ना कोठे धर्माच्या, प्रथेच्या पडद्याआड बालविवाह होण्याचे प्रमाण पाहता हे लक्ष्य गाठणे कठीण वाटत आहे. ‘युनिसेफ’च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 18 वर्षापेक्षा कमी वयोगयातील सुमारे पंधरा लाख मुलींचे विवाह होतात आणि भारत …

Read More »

हरहुन्नरी अतुल

आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणार्‍या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर …

Read More »

‘स्वच्छ’ भरारी

भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या …

Read More »

‘नीट’ रद्द कशासाठी?

राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) च्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात खटला सुरू आहे. यादरम्यान नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पण सध्याची व्यवस्था मोडीत काढली तर त्याजागी कोणती व्यवस्था लागू होणार आहे? तसेच ‘नीट’ व्यवस्था अमलात येण्यापूर्वी प्रवेश परीक्षेचे स्वरुप कसे असायचे आणि त्याचे काय गुण दोष होते, या प्रश्नांची उत्तरे तपासावी लागतील. तसेच त्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर …

Read More »

शेअर ट्रेडिगच्या चक्रव्यूहात

बाजार नियामक संस्था सेबीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान 93 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सरासरी 2 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झाले आहे. किरकोळ गुंतवणूकदांचं नुकसान तीन वर्षात वाढून 1.8 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 4 लाख गुंतवणूकदारांना या काळात 28 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झालं आहे. अलीकडील काळात ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागून कर्जबाजारी …

Read More »

विकासाच्या जमिनीवरचे वर्तमान

दरवर्षी भारतातील तीन महिन्यांच्या सणासुदीत ऑटो डीलर्सपासून रेस्टॉरंट चेनपर्यंतचे व्यवसाय त्यांच्या वार्षिक विक्रीच्या 20 ते 30 टक्के पैसा कमवतात. पण यंदा देशातील पारंपारिक सणासुदीच्या खरेदीचा हंगाम सुरू होताच भारतीय शहरांमधील ग्राहक खर्चात कपात करत आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या प्रमुख अर्थव्यवस्थेसाठी हे चिंताजनक लक्षण आहे. कार विक्री, विमान प्रवास आणि पॅकेज्ड फूडवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. मारुती सुझुकीसारख्या कार …

Read More »

बघ्यांच्या गर्दीत हरवल्या संवेदना

‘क्रांतिवीर’ चित्रपटातला ‘आ गये मेरे मौत का तमाशा देखने…..’. हा संवाद लोकप्रिय झाला. पण सध्याच्या काळात मोबाईलमध्ये व्यग्र झालेल्या आणि रीलमध्ये आकंठ बुडालेल्या समाजाला तंतोतंत लागू पडतो. अपघाताच्या ठिकाणी, दुर्घटनेच्या स्थळी, अत्याचार, अन्याय होत असताना ते रोखण्याऐवजी त्याचे शूटिंग करण्याची मानसिकता ही अशा विकृतीला नकळतपणे प्रोत्साहन देत आहे. सोशल मीडियात हरविलेल्या समाजात हत्या, हल्ला, अपघात, मृत आणि जखमी लोक हे …

Read More »

अवकाशातील संघर्ष अडचणींच्या अवकाशात सुनीता

बोइंग स्टारलायनर यानातून झेप घेणार्‍या सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवताच सहकार्‍यांची अतिशय उत्साहाने घेतलेली भेट सर्व जगाने पाहिली. त्यांची ऊर्जा आणि आशा आकांक्षा अनेकांच्या जिद्दीला बळ देणार्‍या ठरल्या. परंतु, बोइंगचे स्टारलायनर अवकाश स्थानकावर उतरले तेव्हापासूनच सुनीता विल्यम्स यांच्या माघारी दौर्‍याच्या कार्यक्रमावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यात अनेक तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. यानाची दिशा निश्चित करणारे पाच …

Read More »