लेख-समिक्षण

इनर स्टोरी

चीनचे ‘मनाचे’ उद्योग

माहिती-तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे वास्तव असले तरी या प्रक्रियेने काही धोकेही जवळ आले आहेत. आज इंटरनेटच्या विश्वातील गुन्हेगारांची संख्या ही प्रत्यक्ष जमिनीवरील चोर-लुटेरे, डाकू यांपेक्षा मोठी बनत चालली आहे. तशाच प्रकारे शत्रू राष्ट्राला हादरे देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रे मोठ्या प्रमाणावर करत चालली असून त्यामाध्यमातून प्रत्यक्ष युद्धातील हानीप्रमाणे वित्तीय नुकसान होताना दिसत आहे. विघातक कृत्यासाठी तंत्रज्ञानाच्या पोटातून काही आविष्कार जाणीवपूर्वक …

Read More »

प्रोत्साहनाची थाप

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्‍या पद्म पुरस्कारांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. साहित्य, कला, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य, संशोधन आदी क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येतो. याहीवेळी पद्म विजेत्यांत देशातील आणि विदेशातील नामवंताचा समावेश असून त्यापैकी काही जण प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये या पुरस्कारांमध्ये राजकीय हित बाजूला सारुन …

Read More »

हिप हिप हुर्ये…

कबड्डी आणि खोखोसारखे क्रीडाप्रकार हे वर्षानुवर्षे गावाखेड्यातील शाळांमधील मुले-मुली खेळत आले आहेत. या मैदानी खेळातून शारीरिक विकासाबरोबरच सांघिकतेचे गुण विकसित होत जातात. परंतु तरीही या क्रीडाप्रकारांची क्रिकेटच्या तुलनेत उपेक्षाच झाली होती. मध्यंतरी कबड्डी प्रो लिगमुळे या खेळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनद्वारे खो-खो विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करुन आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले. या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष …

Read More »

अग्नितांडवाचा शोध आणि बोध

दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलात भडकलेल्या वणव्याच्या ज्वालांपुढे जागतिक अर्थसत्ता, महासत्ता, सामरीक सत्ता असणारी अमेरिका हतबल ठरताना दिसत आहे. ही आग मानवतेवरचे, जीवसृष्टीवरचे किती मोठे नैसर्गिक संकट आहे, याचा अंदाज अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू इराणही यामध्ये अमेरिकेला मदतीचा हात देत आहे, यावरून समजू शकतो. या आगीत जळून खाक झालेल्या इमारती नवतंत्रज्ञानाने काही दिवसांत पुन्हा उभ्या करता येतीलही; पण शेकडो वर्षांपासून …

Read More »

नव्या वर्षात आर्थिक संधी

आशावादी असल्याने आपण नेहमीच कॅलेंडरवर्षापासून सुरुवात करतो. नव्या वर्षात कितीही आव्हाने असली तरी आशावादी हे नेहमीच निराशावादापेक्षा उजवे ठरतात. अर्थतज्ज्ञांनी कितीही अडचणीचे चित्र आणि गणित मांडलेले असले तरी आशावादी हे आशेची कास सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर 2025 मध्ये आव्हानात्मक चित्र आहे आणि त्यावर तोडगा काढण्याचे काम आशावादी विचार ठेवणार्‍या लोकांना देखील जड जाणार आहे. नवीन वर्ष हे अनिश्चितेने व्यापलेले असल्यामुळे …

Read More »

पाकिस्तानवर काळ उलटला!

एकेकाळी संपूर्ण जगभरात दहशतवादी हिंसाचाराने थैमान घालणार्‍या तालिबानला अस्र-शस्रांपासून लष्करी प्रशिक्षण देण्यापर्यंत सर्वतोपरी मदत करणार्‍या पाकिस्तानवर आता हा भस्मासूर उलटला आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानी राजवट परतल्यावर या टापूत आपल्याला हवे तसे आपण करू, अशा आविर्भावात पाकिस्तान होता. परंतु तालिबान्यांनी पाकिस्तानलाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. 2024 या वर्षातच पाकिस्तानात आठशेहून अधिक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात सुमारे एक हजार …

Read More »

नदीजोड प्रकल्पातून विकासगंगा

महाराष्ट्रात नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नद्या जोड प्रकल्पाचा संकल्प बोलून दाखवला आहे. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान यादरम्यान वाहणार्‍या पार्वती, कालीसिंध आणि चंबळ नद्यांचे पाणी हे मोठा जलस्रोत म्हणून पाहिले जाते. या नद्यांना जोडण्यासाठी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोडप्रकल्पाच्या अभियानाची संकल्पना …

Read More »

तबला पोरका झाला…

तबला या वाद्यसंगीतातील महत्त्वाच्या वाद्याला जगभरात प्रसिद्धी, लोकप्रियता आणि सन्मान मिळवून देण्याचं अद्वितीय कार्य करणार्‍या पंडित झाकीर हुसेन यांच्या निधनाची वार्ता अखेरच्या क्षणापर्यंत अफवा ठरावी असं असंख्य जणांना वाटत होतं. पण अखेर ती खरी ठरली आणि नियतीनं एक महान तबलावादक आपल्यातून हिरावून नेला. तबला म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन हे समीकरण वर्षानुवर्षं आपल्याकडं पहायला मिळतं यातच त्यांचं श्रेष्ठत्व दडलेलं आहे. त्याचबरोबर …

Read More »

कृषीविकासाला हवी चालना

चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार आले, तेव्हा सर्वात प्रथम कृषी पायाभूत सुविधांचा विकास झाला. अमेरिकेचे दूरदर्शी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनीही शेतीला विकासाचा आधार बनवला होता. यातुलनेत भारतात कृषी विकासाबाबत भरीव प्रयत्न झाले नाहीत. देशातील सुमारे दोन हजार लाख हेक्टर जमीन शेतीसाठी योग्य आहे. यापैकी केवळ 1,200 ते 1,500 लाख हेक्टर जमीन वापरण्यायोग्य आहे. यातील केवळ 40 टक्के जमीन सिंचनाखाली येते. उर्वरित 60 टक्के …

Read More »

गरज सुधारणांची

देशात लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची सुरुवात जून 1997 मध्ये झाली. त्याआधीही देशात अन्नधान्य वितरणासाठी व्यवस्था होती, पण ती मुख्यत्वे सर्वसामान्यांसाठी होती. देशात लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्देश गरजू आणि गरीब लोकसंख्येसाठी अन्नधान्याचा पुरवठा सुनिश्चित करणे हा होता. सप्टेंबर 2013 मध्ये मंजूर झालेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने या प्रणालीला एक नवी दिशा दिली. तथापि, आयसीआरआयईआरच्या अभ्यासानुसार, दरवर्षी 20 दशलक्ष टन अन्नधान्य …

Read More »