आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणार्या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर …
Read More »इनर स्टोरी
‘स्वच्छ’ भरारी
भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या …
Read More »‘नीट’ रद्द कशासाठी?
राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) च्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात खटला सुरू आहे. यादरम्यान नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पण सध्याची व्यवस्था मोडीत काढली तर त्याजागी कोणती व्यवस्था लागू होणार आहे? तसेच ‘नीट’ व्यवस्था अमलात येण्यापूर्वी प्रवेश परीक्षेचे स्वरुप कसे असायचे आणि त्याचे काय गुण दोष होते, या प्रश्नांची उत्तरे तपासावी लागतील. तसेच त्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर …
Read More »शेअर ट्रेडिगच्या चक्रव्यूहात
बाजार नियामक संस्था सेबीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान 93 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सरासरी 2 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झाले आहे. किरकोळ गुंतवणूकदांचं नुकसान तीन वर्षात वाढून 1.8 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 4 लाख गुंतवणूकदारांना या काळात 28 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झालं आहे. अलीकडील काळात ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागून कर्जबाजारी …
Read More »विकासाच्या जमिनीवरचे वर्तमान
दरवर्षी भारतातील तीन महिन्यांच्या सणासुदीत ऑटो डीलर्सपासून रेस्टॉरंट चेनपर्यंतचे व्यवसाय त्यांच्या वार्षिक विक्रीच्या 20 ते 30 टक्के पैसा कमवतात. पण यंदा देशातील पारंपारिक सणासुदीच्या खरेदीचा हंगाम सुरू होताच भारतीय शहरांमधील ग्राहक खर्चात कपात करत आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणार्या प्रमुख अर्थव्यवस्थेसाठी हे चिंताजनक लक्षण आहे. कार विक्री, विमान प्रवास आणि पॅकेज्ड फूडवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. मारुती सुझुकीसारख्या कार …
Read More »बघ्यांच्या गर्दीत हरवल्या संवेदना
‘क्रांतिवीर’ चित्रपटातला ‘आ गये मेरे मौत का तमाशा देखने…..’. हा संवाद लोकप्रिय झाला. पण सध्याच्या काळात मोबाईलमध्ये व्यग्र झालेल्या आणि रीलमध्ये आकंठ बुडालेल्या समाजाला तंतोतंत लागू पडतो. अपघाताच्या ठिकाणी, दुर्घटनेच्या स्थळी, अत्याचार, अन्याय होत असताना ते रोखण्याऐवजी त्याचे शूटिंग करण्याची मानसिकता ही अशा विकृतीला नकळतपणे प्रोत्साहन देत आहे. सोशल मीडियात हरविलेल्या समाजात हत्या, हल्ला, अपघात, मृत आणि जखमी लोक हे …
Read More »अवकाशातील संघर्ष अडचणींच्या अवकाशात सुनीता
बोइंग स्टारलायनर यानातून झेप घेणार्या सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवताच सहकार्यांची अतिशय उत्साहाने घेतलेली भेट सर्व जगाने पाहिली. त्यांची ऊर्जा आणि आशा आकांक्षा अनेकांच्या जिद्दीला बळ देणार्या ठरल्या. परंतु, बोइंगचे स्टारलायनर अवकाश स्थानकावर उतरले तेव्हापासूनच सुनीता विल्यम्स यांच्या माघारी दौर्याच्या कार्यक्रमावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यात अनेक तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. यानाची दिशा निश्चित करणारे पाच …
Read More »अजितदादांची कोंडी झालीय?
लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिकेत बदल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदारांशी ताळमेळ बसविण्यासाठी ते वेगळी रणनिती आखत आहेत. सुनेत्रा पवार यांना लोकसभेला उतरवून मोठी चूक केली असे खळबळजनक विधान अलीकडेच दादांनी केले. काकांशी संघर्ष करून काही फायदा होत नसून उलट शरद पवार यांना अधिक सहानुभूती मिळत असल्याचे दादांच्या लक्षात आले आहे. लोकसभेला पवार …
Read More »नव्या वाणांची संजीवनी, पण…
औद्योगिक क्रांतीपूर्व काळ ते आतापर्यंत पृथ्वीचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढले आहे. उत्पादन, वितरण अणि ग्राहक याची संपूर्ण साखळीच पर्यावरणावर अवलंबून आहे. अशावेळी हवामान बदलाला अनुकुल असणार्या उपक्रमांतून खाद्योत्पादनाला सर्वसमावेशक स्वरुप देऊ शकतोे. या क्रमात भारतीय कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादन देणार्या 61 पिकांचे 109 वाण जारी केले आहेत. यात शेतीचे 69 आणि बागायतीतील 40 वाणांचा समावेश आहे. हे वाण …
Read More »हिंडेनबर्ग प्रकरणाचा धडा
भारतीय बँका आजघडीला ठेवीच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कर्जाच्या तुलनेत ठेवी कमी राहण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत पोचू शकते अशी भीती व्यक्त होत असताना 2015 नंतर पहिल्यांदाच ठेवी कमी असण्याचे प्रमाण उच्चांकी पातळीवर पोचले आहे. पूर्वी ठेवीचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व बँका या ताळेबंदाच्या आधारावर जमा असलेल्या ठेवीवर चांगला व्याजदर देत असत. मात्र आता ठेवीवरची तूट वाढल्याने निव्वळ व्याजाच्या मार्जिनवर …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र