रेंगाळणारे रशिया युक्रेन युद्ध आणि इस्राईल-इराण संघर्ष या कारणांमुळेही भारताच्या आर्थिक चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. जगातील युद्धग्रस्त देशातील संघर्ष आणखी चिघळला तर तर कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारात किंमती वाढण्याची मालिका सुरू होऊ शकते आणि कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या तर जगभरात अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्याबरोबरच भारतात देखील महागाई मी मी म्हणू शकते. सध्या देशात महागाई भडकण्याचा ट्रेंड हा स्पष्टपणे दिसत …
Read More »इनर स्टोरी
क्रिकेटच्या राजकारणात पाकिस्तान ‘बोल्ड’
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला. सुरक्षा कारणावरून अनेक देशांनी पाकिस्तानचे दौरे रद्द केले आहेत. भारत आणि आयसीसीव्यतिरिक्त ब्रॉडकास्टर्सनी देखील पाकिस्तानवर दबाव आणला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात येत नसल्याचा मुद्यावरून आकांडतांडव करू नका, असे बजावले आहे. स्पर्धा रद्द झाली तर सर्वाधिक आर्थिक फटका हा पकिस्तानलाच सहन करावा लागेल. भारताच्या मागणीची दखल घेत आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पीओके टूरवर …
Read More »निकालाचा अन्वयार्थ
उत्तर प्रदेशातील मदरसा कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार मदरसा कायदा पूर्णपणे संविधानाच्या अंतर्गत असल्याने त्याची वैधता नाकारता येत नाही. मात्र मदरशांमध्ये दिल्या जाणार्या शिक्षणाच्या दर्जाबाबत काळीजी घेतली जावी असे सांगतानाच फाजिल आणि कामिल या मदरशांमध्ये देण्यात येणार्या पदव्या असंविधानिक ठरवल्या आहेत. एका वार्षिक पर्यवेक्षण पाहणीनुसार, 14 ते 18 या वयोगटातील मदरशांमध्ये शिक्षण घेणार्या मुलांना दुसरीचे …
Read More »परकीयांच्या हाती नकोत बँकांची सूत्रे
मार्च 2020 मध्ये भारताची एक नामांकित खासगी येस बँक ही व्यवस्थापनाने केलेल्या चुकांमुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचली. एखादी पतसंस्था दिवाळीखोरीत निघाल्यावर ठेवीदारांची ज्याप्रमाणे शाखेबाहेर गर्दी होते, तशी गर्दी येस बँकेच्या शाखांबाहेर झाली. एटीएममधून ठरावीक रक्कमच काढता येत होती. कमी कालावधीत दबदबा निर्माण केलेल्या या बँकेच्या शेअरचे मूल्य तीन अंकीवरून दोन अंकावर आले. अशावेळी भारतीय स्टेट बँकेने 49 टक्के शेअर खरेदी करत …
Read More »घातक खोडसाळपणाचे आव्हान
एकीकडे देशातील विमानप्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रकार घडले. सोशल मीडिया किंवा ईमेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणार्यांचा शोध लावू शकत नाही. यामागचे …
Read More »बालविवाहांचे कटू वास्तव
नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी 2022 मध्ये बालविवाह मुक्त भारत आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाचा उद्देश 2030 पर्यंत देशातून बालविवाहाचे उच्चाटन करणे हा होता. पण आजही कोठे ना कोठे धर्माच्या, प्रथेच्या पडद्याआड बालविवाह होण्याचे प्रमाण पाहता हे लक्ष्य गाठणे कठीण वाटत आहे. ‘युनिसेफ’च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 18 वर्षापेक्षा कमी वयोगयातील सुमारे पंधरा लाख मुलींचे विवाह होतात आणि भारत …
Read More »हरहुन्नरी अतुल
आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणार्या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर …
Read More »‘स्वच्छ’ भरारी
भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या …
Read More »‘नीट’ रद्द कशासाठी?
राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) च्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात खटला सुरू आहे. यादरम्यान नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पण सध्याची व्यवस्था मोडीत काढली तर त्याजागी कोणती व्यवस्था लागू होणार आहे? तसेच ‘नीट’ व्यवस्था अमलात येण्यापूर्वी प्रवेश परीक्षेचे स्वरुप कसे असायचे आणि त्याचे काय गुण दोष होते, या प्रश्नांची उत्तरे तपासावी लागतील. तसेच त्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर …
Read More »शेअर ट्रेडिगच्या चक्रव्यूहात
बाजार नियामक संस्था सेबीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान 93 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सरासरी 2 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झाले आहे. किरकोळ गुंतवणूकदांचं नुकसान तीन वर्षात वाढून 1.8 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 4 लाख गुंतवणूकदारांना या काळात 28 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झालं आहे. अलीकडील काळात ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागून कर्जबाजारी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र