लेख-समिक्षण

इनर स्टोरी

मॅनिफेस्टेशनचा बोलबाला

हल्ली सोशल मीडियावर रंगणाऱ्या पॉडकास्टमध्ये आणि रिल्समध्ये मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ ॲट्रॅक्शन यांवर आधारीत व्हिडिओ, मुलाखती यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते, आनंदी आणि निरोगी जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे, हे खरेच आहे; पण विचारांना कृतीची जोड न देता केवळ काल्पनिक क्रियांनी इच्छित गोष्टी साध्य होतात असे मानणे चुकीचे आहे. मानसशास्त्रज्ञ गॅब्रिएल ओटिंजेन यांनी मेंटल …

Read More »

नीट,झोप आणि झुरळं…

देशात शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांचे जग आज इतके अस्थिर झाले आहे की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून झोप, स्थैर्य आणि भविष्यावरील विश्वास हळूहळू नाहीसा होत चालला आहे. नीट प्रश्नपत्रिका गळतीच्या घटनेने केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटीच उघड केल्या नाहीत, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि संधी यांच्यातील नातेसंबंध किती कमकुवत होत चालले आहेत, हेही स्पष्ट केले. सततच्या स्पर्धा, अपूर्ण झोप, मानसिक थकवा आणि व्यवस्थेवरील कमी …

Read More »

आर्थिक दरी आणि भविष्याची चिंता

दुरावत चाललेल्या समाजात आशेचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. आपल्या आजूबाजूला इतक्या विरोधाभासी गोष्टी एकाच वेळी घडताना दिसतात की समाज नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, हा प्रश्न सतत पडत राहतो. एका बाजूला विकासाचे दावे, वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी आणि आधुनिकतेच्या चमकदार कथा आहेत; तर दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यासाठी झगडणारा सामान्य माणूस, नोकरीची असुरक्षितता, वाढती आर्थिक दरी आणि भविष्याबद्दलची …

Read More »

विरोधकांपुढे आव्हान

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे भारतीय राजकारणातील एका मोठ्या वैचारिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. भारतीय जनता पक्षासाठी पूर्व भारताचे प्रवेशद्वार मानले जाणारे हे राज्य आता त्यांच्या ताब्यात आले आहे. या विजयाने हे स्पष्ट केले आहे की, जिथे जिथे भाजपसाठी यशाची नवीन द्वारे उघडत आहेत, तिथे तिथे विरोधकांसाठी राजकीय रस्ते कायमचे बंद होत आहेत. सद्यस्थितीत भारतीय राजकारणात ‌’सत्ताविरोधी‌’ लाटेपेक्षा ‌’सत्तासमर्थक‌’ राजकारणाचे …

Read More »

तापमानाची काहिली

जगात सर्वाधिक उष्ण असणाऱ्या वीस ठिकाणांत भारतातील 19 ठिकाणांचा समावेश झाला आहे. या ठिकाणचे तापमान 44 ते 46.9 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले गेले. वाढते तापमान ही केवळ हवामानाची नोंद नसून तो एक चिंताजनक विषय आहे. पूर्वी मे आणि जून महिन्यांत तापमानाचा उच्चांक नोंदला जात असताना आता एप्रिलमध्येच या तापमानाने नागरिकांना त्रस्त केले आहे. कमाल तापमानात विक्रमी वाढ होण्यामागे पर्यावरण, मानवी …

Read More »

प्रश्न न्यायसंस्थेच्या विश्वासार्हतेचा

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाच्या भोवऱ्यात अडकलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी महाभियोगाची प्रक्रिया सुरू होताच पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या घरात कोट्यवधी रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने त्यांना दोषी ठरविले होते. पण आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावर महाभियोगाची कार्यवाही होणार नाही. कदाचित खटला देखील भरला जाणार नाही. परंतु त्यांच्या राजीनाम्याने न्यायव्यवस्थेवरचा …

Read More »

नोएडातील उद्रेकाच्या मुळाशी…

देशातील विविध औद्योगिक शहरांमध्ये सध्या कामगारांच्या असंतोषाचा ज्वालामुखी धुमसत असून नोएडातील हिंसक आंदोलनाने या गंभीर समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच विविध राज्यांतील औद्योगिक केंद्रांमध्ये कामगारांची निदर्शने सुरू होती, परंतु नोएडामध्ये झालेली दगडफेक, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेली झटापट याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा असंतोष केवळ स्थानिक कारणांपुरता मर्यादित नसून, त्यामागे वाढती महागाई, इंधन संकट …

Read More »

‌‘टेराफॅब‌’ची धूम

जगप्रसिद्ध अब्जाधिश आणि ‌‘टेस्लाकार‌’ एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश तंत्रज्ञान आणि प्रगत संगणनशक्ती यांचा संगम घडवून आणणाऱ्या एका अत्यंत मोठ्या औद्योगिक उपक्रमाची कल्पना त्यांनी मांडली आहे. या उपक्रमाचे नाव आहे ‌‘टेराफॅब.‌’ जगातील सर्वांत मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून या संकल्पनेची चर्चा सुरू आहे.भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, स्वयंचलित रोबोटस्‌‍, उपग्रह नेटवर्क आणि अवकाशाधारित संगणकीय व्यवस्था यांसाठी लागणाऱ्या प्रचंड प्रमाणातील …

Read More »

सायबरस्पेस: आधुनिक अदृश्य रणक्षेत्र

आजच्या काळात युद्धाचे स्वरूप केवळ सीमा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. डिजिटल रुपात आता एक नवीन आघाडी उघडली गेली असून ती अदृश्य असूनही सातत्याने सक्रिय आहे. या युद्धामध्ये गोळ्यांचा आवाज येत नाही, परंतु त्याचे परिणाम तितकेच विनाशकारी असतात. आता कोणताही देश सीमा ओलांडल्याशिवाय शत्रूची अर्थव्यवस्था, ऊर्जा व्यवस्था किंवा दळणवळण यंत्रणेला थेट लक्ष्य करू शकतो. आधुनिक युद्ध आता दोन समांतर …

Read More »

कौटुंबिक जबाबदारीचे सामायिकीकरण

सृजन आणि संगोपन या मानवी जीवनातील दोन सर्वात महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. आजवर केवळ मातेच्या खांद्यावर सोपवलेली संगोपनाची जबाबदारी ही आधुनिक समाजात आता पित्याच्या सहभागाशिवाय अपूर्ण मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे पितृत्व रजेच्या (पॅटर्निटी लीव्ह) संदर्भात एका नव्या सामाजिक क्रांतीची नांदी झाली आहे. केवळ आर्थिक तरतूद करणारा घटक म्हणून पुरुषाकडे पाहण्याची पारंपरिक मानसिकता बदलून, त्याला बालकाच्या भावनिक आणि …

Read More »