लेख-समिक्षण

इनर स्टोरी

‌‘टेराफॅब‌’ची धूम

जगप्रसिद्ध अब्जाधिश आणि ‌‘टेस्लाकार‌’ एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश तंत्रज्ञान आणि प्रगत संगणनशक्ती यांचा संगम घडवून आणणाऱ्या एका अत्यंत मोठ्या औद्योगिक उपक्रमाची कल्पना त्यांनी मांडली आहे. या उपक्रमाचे नाव आहे ‌‘टेराफॅब.‌’ जगातील सर्वांत मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून या संकल्पनेची चर्चा सुरू आहे.भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, स्वयंचलित रोबोटस्‌‍, उपग्रह नेटवर्क आणि अवकाशाधारित संगणकीय व्यवस्था यांसाठी लागणाऱ्या प्रचंड प्रमाणातील …

Read More »

सायबरस्पेस: आधुनिक अदृश्य रणक्षेत्र

आजच्या काळात युद्धाचे स्वरूप केवळ सीमा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. डिजिटल रुपात आता एक नवीन आघाडी उघडली गेली असून ती अदृश्य असूनही सातत्याने सक्रिय आहे. या युद्धामध्ये गोळ्यांचा आवाज येत नाही, परंतु त्याचे परिणाम तितकेच विनाशकारी असतात. आता कोणताही देश सीमा ओलांडल्याशिवाय शत्रूची अर्थव्यवस्था, ऊर्जा व्यवस्था किंवा दळणवळण यंत्रणेला थेट लक्ष्य करू शकतो. आधुनिक युद्ध आता दोन समांतर …

Read More »

कौटुंबिक जबाबदारीचे सामायिकीकरण

सृजन आणि संगोपन या मानवी जीवनातील दोन सर्वात महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. आजवर केवळ मातेच्या खांद्यावर सोपवलेली संगोपनाची जबाबदारी ही आधुनिक समाजात आता पित्याच्या सहभागाशिवाय अपूर्ण मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे पितृत्व रजेच्या (पॅटर्निटी लीव्ह) संदर्भात एका नव्या सामाजिक क्रांतीची नांदी झाली आहे. केवळ आर्थिक तरतूद करणारा घटक म्हणून पुरुषाकडे पाहण्याची पारंपरिक मानसिकता बदलून, त्याला बालकाच्या भावनिक आणि …

Read More »

कसोटी सामूहिक संयमाची

आपण सर्वजण कधी ना कधी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटांतून जातो, त्यांचा सामना करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. समाजाकडूनही हीच अपेक्षा असते. परंतु काय ही अपेक्षा बहुतेकदा पूर्ण होत नाही. याचे कारण सामूहिक परिणाम करणारी एखादी गोष्ट घडते किंवा संकट येते तेव्हा अविश्वासाचे, भीतीचे आणि लोभाचे चित्र सर्वदूर दिसते. त्यामुळेच एखादी अफवा पसरते आणि आपण विचार न करता तिच्या मागे …

Read More »

भारतासाठी धोक्याची घंटा

जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींनी एक अत्यंत स्फोटक वळण घेतले आहे. विशेषतः 28 फेब्रुवारी 2026 च्या रात्री इराण आणि अमेरिका यांच्यात जो अभूतपूर्व क्षेपणास्त्र संघर्ष झाला, तो आधुनिक युद्धतंत्राच्या भविष्यातील दिशेचा एक संकेत होता. इराणने अमेरिकेच्या सागरी सामर्थ्याचे केंद्र असलेल्या अब्राहम लिंकन या महाकाय विमानवाहू जहाजाला लक्ष्य करण्याचा जो धाडसी प्रयत्न केला, त्याने संपूर्ण जगाचे सामरिक लक्ष वेधून घेतले. …

Read More »

नारीशक्तीच्या हाती विकसित भारताची दोर

अनेक दशकांपासून देशातील महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणातील योगदान शून्य आहे, असे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आणि चित्र निर्माण केले. अवमूल्यन करणाऱ्या या विचारसरणीमुळे साहजिकच या ‌‘आधी आबादी‌’ने आत्मसन्मान गमावला. त्यांच्या वेदना, समस्या या कोणाच्याच अजेंडयावर नव्हत्या. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये महिलाकेंद्री योजना तळागाळात पोहोचवण्यात आल्या आणि त्याचे सुपरिणाम प्रकर्षाने दिसून येऊ लागले. जगभरातील विकसित देशात कामकाज आणि उद्योग क्षेत्रात …

Read More »

आव्हानांच्या बोजाखाली आयटी क्षेत्र

भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. देशाची माहिती तंत्रज्ञान उद्योगव्यवस्था अनेक दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिली आहे; मात्र …

Read More »

महामार्गावरील धावपट्टीचा संदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले तर सिंगापूर, तैवान आणि स्वीडन सारख्या देशांनी आपल्या महामार्गांचा वापर लष्करी धावपट्टया म्हणून करण्याचे कसब आधीच आत्मसात केले आहे. भारतानेही त्याच धर्तीवर आपली सुरक्षा व्यवस्था अधिक लवचिक बनवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील मोरान येथे ‌‘सी-130 जे‌’ सुपर हर्क्युलिस विमानातून ज्या प्रकारे आपत्कालीन लँडिंग सुविधेवर (ईएलएफ) पदार्पण केले, ती प्रतीकात्मक कृती चीनच्या सीमेवर भारताच्या वाढत्या हवाई …

Read More »

महाशिवरात्रीचा बोधार्थ

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येणारी महाशिवरात्री हा हिंदू धर्मियांमध्ये सर्वदूर साजरा होणारा एक महाउत्सव. आध्यात्मिक उन्नती,आत्मबोध आणि विश्वातील लयाचा हा उत्सव शिव आणि शक्तीच्या मीलनाचा सोहळा म्हणूनही साजरा होतो. चेतना आणि ऊर्जा एकरूप होऊन सृष्टीच्या संतुलनाचा संदेश देतात. मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याची ही पर्वणी मानली जाते. आपल्यातील अहंकार आणि षड्रिपूंचा नाश करून आत्मस्वरूपाकडे …

Read More »

हरित महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी…

जागतिक तापमानवाढीचे चटके आणि निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे निर्माण झालेली संकटे पाहता, 2026 हे वर्ष महाराष्ट्रासाठी एका नव्या हरित क्रांतीची पहाट ठरणार आहे. विकासाच्या धावपळीत मानवाकडून निसर्गाचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या काळात तब्बल 300 कोटी वृक्षलागवडीचे महाभयंकर पण तितकेच महत्त्वाचे उद्दिष्ट राज्यासमोर ठेवले …

Read More »