लेख-समिक्षण

इनर स्टोरी

नेपाळमधील अराजकाच्या मुळाशी

भारताचा शेजारी देश असणारा नेपाळ हा गेल्या जवळपास दशकभरापासून अस्थिरता-अस्वस्थता आणि अशांतता यांच्या मगरमिठीत सापडला आहे. राजेशाही व्यवस्थेचा त्याग करुन नेपाळने लोकशाहीची कास धरली खरी; पण दहा वर्षेउलटूनही तेथे लोकशाही व्यवस्था खर्‍या अर्थाने नावारुपाला आलीच नाही. सुरुवातीला राज्यघटना निर्मितीसाठी प्रचंड खल झाला. त्यानंतर राजकीय अस्थिरतेचे ग्रहण नेपाळला लागले ते कायमचेच. आज नेपाळ राजकीय आणि सामाजिक संकटाच्या नव्या वळणावर पोहोचला आहे. …

Read More »

वेध ‘समुद्रयान मिशन’चा

भारतीय अवकाश संशोधनाने जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान, मंगळयान आणि गगनयानासारख्या प्रकल्पांमुळे भारत आज अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात अव्वल ठरला आहे. पण आता केवळ आकाशच नव्हे तर अथांग महासागराकडेही भारताचे लक्ष वेधले गेले आहे. ‘समुद्रयान मिशन’ही त्या दृष्टीने भारताची एक धाडसी झेप आहे. ६००० मीटर खोलीपर्यंत मानवाला समुद्राच्या तळाशी नेणारा हा प्रकल्प केवळ वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित नाही, तर देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्था, …

Read More »

एआय आणि भारतीय निवडणुकीचे भवितव्य

आर्टिफिशियल इंटिलिजन्स हळूहळू भारत आणि जगातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम करत आहे. त्याचा वाढता प्रभाव पाहता एआय शाप की वरदान याभोवती चर्चा फिरत आहे. आजघडीला विविध क्षेत्रात एआयचा वापर वाढलेला असताना निवडणूक प्रक्रिया देखील त्यापासून अपवाद राहिली नाही. या माध्यमातून राजकीय पक्ष, उमेदवार हे मतदारांना आकर्षित करत आहेत आणि त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत एआयचा …

Read More »

गरज आव्हानांचा थेट मुकाबला करण्याची

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणामुळे जगातील अर्थव्यवस्था धोयात आली आहे. अमेरिका फर्स्ट या नावाखाली ट्रम्प यांनी चालविलेली कुर्‍हाड अनेक देशांना घायाळ करत आहे तर काही देश चोखपणे उत्तर देण्यासाठी देखील सक्षम होत आहेत. परंतु अशा प्रकारचे धोरण राबविणारे ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष आहेत का. १९७०,८० आणि ९० च्या दशकांतही अध्यक्षांनी बचावात्मक धोरणापोटी काही देशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला …

Read More »

इंटरनेट सुविधा धोक्यात?

डिजिटल युगातील अदृश्य जीवनवाहिन्या म्हणजे समुद्रात खोल तळाशी असणार्‍या ऑप्टिकल केबल्स. या इंटरनेट केबल्समधून दररोज अब्जावधी संदेश, डेटा आणि व्यवहार जगाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतात. पण या जीवनवाहिन्या जागतिक सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू बनत आहे. अमेरिकेच्या नव्या सुरक्षा नियमांपासून ते रेड सी परिसरातील अस्थिरतेपर्यंत, या केबल्सवर घोंगावणारे धोके हे राष्ट्रांच्या आर्थिक स्थैर्यापासून लष्करी क्षमतेपर्यंत सर्वकाही प्रभावित करू शकतात. या पार्श्वभूमीवर भारताने‡ …

Read More »

जेटिनल फीचर मॅपिंगची किमया

हासन लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू असलेल्या प्रज्वल रेवण्णा याला नुकतेच बेंगळुरू येथील विशेष कोर्टाने बलात्काराच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. हे प्रकरण केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर न्यायवैज्ञानिक पातळीवरही ऐतिहासिक ठरले कारण भारतात पहिल्यांदाच जेनिटल फीचर मॅपिंग या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन साक्ष म्हणून करण्यात आला. प्रकरणाची …

Read More »

एआयच्या मदतीने शिक्षणक्रांती

प्राचीन काळापासून शिक्षणाचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवणे हा नव्हता, तर त्यांना आयुष्यातील विविध पैलूंसाठी तयार करणे देखील होता. तो साध्य होण्यासाठी शिक्षण प्रणाली लवचिक, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक पातळीवर लक्ष देणारी असावी. एआयच्या मदतीने हे उद्दिष्ट आता अधिक सोपे झाले आहे. तथापि, शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांचीभूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि राहणार आहे, कारण एआयकडे मानवी समज आणि भावना नसतात. …

Read More »

रोजगाराची चिंता आणि निधीची मर्यादा

भारतासारख्या प्रचंड मनुष्यबळ असलेल्या देशात रोजगार हा कळीचा मुद्दा आहे. शहर आणि ग्रामीण भागात राहणार्‍या स्थानिकांना रोजगार मिळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत असल्याने प्रसंगी कामासाठी स्थलांतर करण्याचीही वेळ काहींवर येते. पण स्थलांतर रोखणारी केंद्र सरकारची मनरेगा योजना अतिशय उपयुक्त असून कोरोना काळात या योजनेने ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र योजनेवरचा वाढता खर्च पाहता केंद्र सरकारने खर्चाची मर्यादा आखून दिली. अशा वेळी रोजगाराची …

Read More »

चाल ड्रॅगनची, टंचाई खतांची

अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जगाला मोठ्या प्रमाणावर निर्यात करणार्‍या भारताला दरवर्षी तब्बल सहा कोटी टन खताची गरज भासते. यापैकी बहुतांश खतांची आयात होते आणि यातही चीनचा वाटा मोठा आहे. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून चीनने कोणतिही पूर्वसूचना न देता किंवा अधिकृत घोषणा न करता भारताला होणारा खतांचा पुरवठा रोखला आहे. परिणामी भारतातील पिकांवर संकट घोंघावत आहे. स्पेशालिटी फर्टिलायजर्ससारखी वॉटर सोल्यूबल, मायक्रोन्यूट्रिएंट …

Read More »

कहाणी कोल्हापुरी चप्पलचोरीची

भारतात धार्मिक आयोजनात किंवा धार्मिक स्थळाबाहेर चप्पल चोरीचे प्रकार नेहमीच घडत असतात. काहीवेळा चप्पल चोरी ही हसण्यावरी नेण्यात येते. मात्र भारताच्या-विशेषतः महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलची चोरी ही एका आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीने केली आहे. ही चोरी वस्तुरुपातून नसून त्याच्या मालकीची, स्वामित्वाची आहे. यावर माध्यमातून आवाज उठविल्यानंतर कंपनीने रॅम्पवॉकमध्ये वापरलेली चप्पल ही याबाबत तातडीने कोल्हापुरी चप्पलेपासून प्रेरणा घेतच तयार केलेली होती, हे …

Read More »