लेख-समिक्षण

इनर स्टोरी

एआयच्या मदतीने शिक्षणक्रांती

प्राचीन काळापासून शिक्षणाचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवणे हा नव्हता, तर त्यांना आयुष्यातील विविध पैलूंसाठी तयार करणे देखील होता. तो साध्य होण्यासाठी शिक्षण प्रणाली लवचिक, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक पातळीवर लक्ष देणारी असावी. एआयच्या मदतीने हे उद्दिष्ट आता अधिक सोपे झाले आहे. तथापि, शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांचीभूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि राहणार आहे, कारण एआयकडे मानवी समज आणि भावना नसतात. …

Read More »

रोजगाराची चिंता आणि निधीची मर्यादा

भारतासारख्या प्रचंड मनुष्यबळ असलेल्या देशात रोजगार हा कळीचा मुद्दा आहे. शहर आणि ग्रामीण भागात राहणार्‍या स्थानिकांना रोजगार मिळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत असल्याने प्रसंगी कामासाठी स्थलांतर करण्याचीही वेळ काहींवर येते. पण स्थलांतर रोखणारी केंद्र सरकारची मनरेगा योजना अतिशय उपयुक्त असून कोरोना काळात या योजनेने ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र योजनेवरचा वाढता खर्च पाहता केंद्र सरकारने खर्चाची मर्यादा आखून दिली. अशा वेळी रोजगाराची …

Read More »

चाल ड्रॅगनची, टंचाई खतांची

अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जगाला मोठ्या प्रमाणावर निर्यात करणार्‍या भारताला दरवर्षी तब्बल सहा कोटी टन खताची गरज भासते. यापैकी बहुतांश खतांची आयात होते आणि यातही चीनचा वाटा मोठा आहे. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून चीनने कोणतिही पूर्वसूचना न देता किंवा अधिकृत घोषणा न करता भारताला होणारा खतांचा पुरवठा रोखला आहे. परिणामी भारतातील पिकांवर संकट घोंघावत आहे. स्पेशालिटी फर्टिलायजर्ससारखी वॉटर सोल्यूबल, मायक्रोन्यूट्रिएंट …

Read More »

कहाणी कोल्हापुरी चप्पलचोरीची

भारतात धार्मिक आयोजनात किंवा धार्मिक स्थळाबाहेर चप्पल चोरीचे प्रकार नेहमीच घडत असतात. काहीवेळा चप्पल चोरी ही हसण्यावरी नेण्यात येते. मात्र भारताच्या-विशेषतः महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलची चोरी ही एका आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीने केली आहे. ही चोरी वस्तुरुपातून नसून त्याच्या मालकीची, स्वामित्वाची आहे. यावर माध्यमातून आवाज उठविल्यानंतर कंपनीने रॅम्पवॉकमध्ये वापरलेली चप्पल ही याबाबत तातडीने कोल्हापुरी चप्पलेपासून प्रेरणा घेतच तयार केलेली होती, हे …

Read More »

नौदल सामर्थ्याला नवी बळकटी

‘तमाल’ या रशियात तयार झालेल्या अत्याधुनिक स्टेल्थ क्षेपणास्त्र युद्धनौकेचा भारतीय नौदलात लवकरच समावेश होणार आहे. रशियातील कैलिनिनग्राद येथे पार पडणारी ही घटना भारताच्या सागरी धोरणाचा, सामरिक ताकदीचा आणि जागतिक भागीदारीतील दृढ नात्याचा उल्लेखनीय टप्पा ठरणार आहे. ही युद्धनौका केवळ सागरी सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर भारत-रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षणसंबंधांचे ठोस प्रतीकही आहे. तीन महिने चाललेल्या समुद्री चाचण्यांमध्ये या नौकेने आपल्या प्रणाली, …

Read More »

अरण्यऋषीचा अलविदा

मराठी साहित्यविश्वाच्या समृद्ध परंपरेला निसर्गअभ्यासातून, पशुपक्ष्यांच्या अभ्यासातून मौलिक लेखन करुन अधिक समृद्ध करणारे अरुण्यऋषी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने एका पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या लेखनातून व जीवनातून केवळ निसर्गसेवा व वन्यजीवाबद्दलची कळकळ आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास दिसून आला. पर्यावरण संवर्धनाचा वसा जीवापाड जोपासलेला अरुण्यऋषी आज निसर्गाच्या कुशीत विसावला. त्यांची निसर्गाची भटकंती थांबली, पण त्यांच्या विचारांची, तत्त्वज्ञानाची आणि निसर्ग भक्तीची …

Read More »

चीनचा कृषी दहशतवाद ः जगापुढे नवा धोका

पाच वर्षांपूर्वी जगाला कोरोना महामारीच्या गर्तेत ढकलणार्‍या चीनने पुन्हा एकदा जैविक युद्ध छेडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी थेट जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेला लक्ष्य केले असून तेथील तपास यंत्रणांच्या सजगतेमुळे भला मोठा अनर्थ होता होता टळला आहे. अमेरिकेतील न्यायालयात उघड झालेल्या माहितीनुसार, चीनमधून दोन नागरिकांनी एक अत्यंत घातक फंगस अमेरिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम’ नावाचा …

Read More »

मिमांसा मान्सूनच्या लहरीपणाची

भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली असतानाच मे महिन्याच्या उत्तरार्धातच वरुणराजाने आगमन करत धुवाँधार बरसात केली खरी; पण त्यानंतर मान्सूनने दडी मारल्यामुळे पेरण्यांसाठी खोळंबलेला शेतकरी संभ्रमात पडला आहे. भारतात आजही शेती ही अर्थव्यवस्थेची कणा आहे. शेतकर्‍यांना मान्सून एक विशिष्ट वेळेला येईल अशी अपेक्षा असते. पण हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागराचे तापमान वाढत आहे. …

Read More »

रणरागिणी रणांगणात…

शुक्रवार,३० मे,२०२५ हा भारतीय लष्कर आणि त्याचे खडकवासलामधील मूलभूत गुरुकुल म्हणजेच एनडीए या दोघांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी एकूण १७ महिला कॅडेटसच्या पहिल्या बॅचने, ३०० समकक्ष पुरुष कॅडेट्सबरोबर एनडीएच्या विस्तीर्ण परेड ग्राउंडमधून मार्च करत आपला अंतिम पग मेन ब्लॉकमध्ये टाकला. एनडीएसाठी हा खूप अभिमानास्पद, ऐतिहासिक क्षण आहे. या महिला कॅडेट्सनी एनडीएचा झेंडा उंच फडकवला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं …

Read More »

भुजबळांचे पुनरागमन

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश अखेर राज्य मंत्रिमंडळात झाला आहे. त्यांना महायुतीच्या विद्यमान सरकारमध्ये प्रारंभी डावलले जाणे आणि आता आकस्मिकपणे मंत्रिपद बहाल केले जाणे, या दोन्ही बाबी असंख्य राजकीय कार्यकर्त्यांसाठी अनाकलनीय आहेत. हाविकास आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळविले. असाच निकाल त्यानंतर जेमतेम सहा महिन्यांनी होत असलेल्या विधानसभेच्या रिंगणातही लागेल, असा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांना होता. प्रत्यक्षात त्याच्या …

Read More »