केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेमध्ये पाली, प्राकृत, बांगला, असामिया आणि मराठी या भाषांचा समावेश अभिजात भाषांच्या सूचीमध्ये करण्यात आला आहे. मराठी भाषेला क्लासिकल किंवा अभिजात दर्जा मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. हा दर्जा देण्याची मागणी याआधीही पूर्ण करता आली असती. नेमकी निवडणुकीच्या तोंडावर ती पूर्ण करणे हा योगायोग आहे की प्रयोजन आहे हा विचार करण्यासारखा आहे. पण आजच्या महाराष्ट्रामध्ये मराठीच्या …
Read More »कव्हर स्टोरी
एकत्रित निवडणुकीलो आव्हान ‘एकमताचे’
केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारत ‘एक देश एक निवडणुक’ प्रस्तावाला मंजुरी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणले जावू शकते. या विधेयकाला मिळणार्या संमतीवरच या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असेल. एक देश एक निवडणुकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल, द्रमुक, ‘आप’सारखे जवळपास 15 पक्ष आक्षेप नोंदवत असतील तर हा अजेंडा पुढे सरकेल, असे वाटत नाही. केंद्र …
Read More »राहुल गांधीच्या विदेशवाणीचा अन्वयार्थ
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका दौर्यादरम्यान भारतात शीख धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे आणि संघराज्याचा पाया मोडला जात आहे, धार्मिक उन्माद वाढवण्याचा प्रयत्न केला जात असून भाषे सोबत छेडछाड केली जात आहे, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येत हुकूमशाही सुरू आहे अशा अनेक आरोपांची माळ उडवली आहे. राहुल गांधी आणि इतर नेते भारतातही या सगळ्या गोष्टी …
Read More »मणिपूर ‘वाचवायचे’ तर…
मणिपूर सरकार, सुरक्षा दल आणि केंद्र सरकार सध्या हिंसाचाराच्या अप्रत्यक्ष भोवर्यात अडकले आहे. गुप्तचर संघटनांना मणिपूरमधील ताज्या हल्ल्याचा अंदाज घेण्यात अपयश आले किंवा प्रत्युत्तराची बाजू कमी पडली असे म्हणावे लागेल आणि अर्थातच ही बाब दुर्देवी आहे. कुकी आता केवळ वेगळे राज्यच नाही तर वेगळा देश कुकीलँड मागत आहेत. त्यात संपूर्ण ईशान्य आणि बांगलादेशचा काही भागाचा समावेश करत आहे. दुसरीकडे नागा …
Read More »निकाल ठरवतील दिशा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे राजकारण वेगाने बदलले आहे. राजकीय पंडितांनी, पक्षांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा वेगळे निकाल लागले आणि लोकसभेला एकट्या जीवावर बहुमत मिळवत सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. पुन्हा एकदा आघाडी सरकारचे पर्व सुरू झाले.तिसर्यांदा भाजप आघाडी सत्तेवर आल्यानंतरच्या देशभरातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर मोदी सरकारची राजकीय अपरिहार्यता प्रकर्षाने समोर आली. उदा. ‘लॅटरल एंट्री’वर यूटर्न किंवा वक्फ बोर्ड दुरुस्ती …
Read More »सामरीक सामर्थ्याला नवे बळ
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचे संरक्षण करार झाले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी ‘सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट’चा करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी फायटर जेट इंजिनच्या निर्मितीसाठी संयुक्तपणे पुढे जाण्यास सहमती दर्शवली आहे. मानवरहित प्लॅटफॉर्म, आधुनिक शस्त्रे, ग्राउंड मोबिलिटी सिस्टम इत्यादींच्या सह-उत्पादनाबाबतही बोलणी पुढे सरकली आहेत. अमेरिका भारताला पाणबुडीविरोधी शस्त्र सोनोवॉय …
Read More »अत्याचार दाही दिशा!
शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, कामाची जागा, सार्वजनिक ठिकाण, घर कुठेही मुली, महिला आणि मुले सुरक्षित नाहीत. अलीकडच्या काळात समाजात लैंगिक विकृती एवढी वाढली आहे की, तीन-चार वर्षांच्या मुलीही सुरक्षित नाहीत आणि 60 ते 80 वर्षे वयाच्या महिलाही सुरक्षित नाहीत. लैंगिक हिंसाचाराच्या घटना सर्वत्र उघडकीस येत असल्याचे पाहून संपूर्ण सामाजिक स्थिती निरोगी नसल्याचे दिसून येते. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाने देश हादरला असतानाच महाराष्ट्रातील …
Read More »प्रश्न डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा
पश्चिम बंगालमधील एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला अमानुष, पाशवी अत्याचार आणि नंतर तितक्याच नृशंसतेने झालेली तिची हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली असली तरी यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आजघडीला वैद्यकीय शिक्षण घेणार्या असंख्य तरुणी शिक्षणाच्या निमित्ताने अन्य शहरांत राहत असून अशा घटनांमुळे पालकवर्गांत चिंता वाढणे स्वाभाविक आहे. अशा घटनांना चाप बसणे काळाची …
Read More »विनेश प्रकरणाचा बोध
हरियानाची कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिंपिकच्या बाराव्या दिवशी होणार्या अंतीम सामन्यात स्थान मिळवून इतिहास घडविलेला असतानाच तिला अपात्र केल्याची बातमी धक्कादायक होती. अशा प्रकारचा अनुभव हा कोणत्याही खेळाडूला मानसिक आघात ठरणारा राहू शकतो. मात्र विनेश फोगाटने ज्या पद्धतीने जिद्द दाखवत पॅरिसमधील मजल मारली, ते पाहता देशच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रीडा प्रेमींच्या भावना तिच्यासोबत असणे स्वाभाविक होते. आता देशातील संपूर्ण …
Read More »बस झाले आता
महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये अलीकडील काळात एक चिंतेची बाब समोर येत आहे. राज्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले करण्याचा एक घातक प्रवाह पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या वर्षी घडलेले दर्शना पवारचे प्रकरण असो, पुण्यामध्ये तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न असो, वसईतील तरुणीची निर्घृण हत्या असो यांसारख्या घटनांमधून मुलींना नकार देण्याचा अधिकार नाही, हा पुरुषसत्ताक अहंकार नव्याने बळावत चालल्याचे दिसू लागले आहे. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र