लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

निकाल ठरवतील दिशा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे राजकारण वेगाने बदलले आहे. राजकीय पंडितांनी, पक्षांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा वेगळे निकाल लागले आणि लोकसभेला एकट्या जीवावर बहुमत मिळवत सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. पुन्हा एकदा आघाडी सरकारचे पर्व सुरू झाले.तिसर्‍यांदा भाजप आघाडी सत्तेवर आल्यानंतरच्या देशभरातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर मोदी सरकारची राजकीय अपरिहार्यता प्रकर्षाने समोर आली. उदा. ‘लॅटरल एंट्री’वर यूटर्न किंवा वक्फ बोर्ड दुरुस्ती …

Read More »

सामरीक सामर्थ्याला नवे बळ

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौर्‍यात भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचे संरक्षण करार झाले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी ‘सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट’चा करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी फायटर जेट इंजिनच्या निर्मितीसाठी संयुक्तपणे पुढे जाण्यास सहमती दर्शवली आहे. मानवरहित प्लॅटफॉर्म, आधुनिक शस्त्रे, ग्राउंड मोबिलिटी सिस्टम इत्यादींच्या सह-उत्पादनाबाबतही बोलणी पुढे सरकली आहेत. अमेरिका भारताला पाणबुडीविरोधी शस्त्र सोनोवॉय …

Read More »

अत्याचार दाही दिशा!

शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, कामाची जागा, सार्वजनिक ठिकाण, घर कुठेही मुली, महिला आणि मुले सुरक्षित नाहीत. अलीकडच्या काळात समाजात लैंगिक विकृती एवढी वाढली आहे की, तीन-चार वर्षांच्या मुलीही सुरक्षित नाहीत आणि 60 ते 80 वर्षे वयाच्या महिलाही सुरक्षित नाहीत. लैंगिक हिंसाचाराच्या घटना सर्वत्र उघडकीस येत असल्याचे पाहून संपूर्ण सामाजिक स्थिती निरोगी नसल्याचे दिसून येते. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाने देश हादरला असतानाच महाराष्ट्रातील …

Read More »

प्रश्न डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा

पश्चिम बंगालमधील एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला अमानुष, पाशवी अत्याचार आणि नंतर तितक्याच नृशंसतेने झालेली तिची हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली असली तरी यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आजघडीला वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या असंख्य तरुणी शिक्षणाच्या निमित्ताने अन्य शहरांत राहत असून अशा घटनांमुळे पालकवर्गांत चिंता वाढणे स्वाभाविक आहे. अशा घटनांना चाप बसणे काळाची …

Read More »

विनेश प्रकरणाचा बोध

हरियानाची कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिंपिकच्या बाराव्या दिवशी होणार्‍या अंतीम सामन्यात स्थान मिळवून इतिहास घडविलेला असतानाच तिला अपात्र केल्याची बातमी धक्कादायक होती. अशा प्रकारचा अनुभव हा कोणत्याही खेळाडूला मानसिक आघात ठरणारा राहू शकतो. मात्र विनेश फोगाटने ज्या पद्धतीने जिद्द दाखवत पॅरिसमधील मजल मारली, ते पाहता देशच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रीडा प्रेमींच्या भावना तिच्यासोबत असणे स्वाभाविक होते. आता देशातील संपूर्ण …

Read More »

बस झाले आता

महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये अलीकडील काळात एक चिंतेची बाब समोर येत आहे. राज्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले करण्याचा एक घातक प्रवाह पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या वर्षी घडलेले दर्शना पवारचे प्रकरण असो, पुण्यामध्ये तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न असो, वसईतील तरुणीची निर्घृण हत्या असो यांसारख्या घटनांमधून मुलींना नकार देण्याचा अधिकार नाही, हा पुरुषसत्ताक अहंकार नव्याने बळावत चालल्याचे दिसू लागले आहे. …

Read More »

धोक्याचा घंटानाद

आधुनिक काळात सर्वांचे आयुष्य आता संगणकावर अवलंबून आहे. एक दिवस जरी संगणक बंद पडला तर काय होईल? याचा कदाचित विचार आपल्यापैकी कोणी केला नसेल. परंतु जे काही घडेल, ते कल्पनेपलीकडचे असेल आणि त्याचे परिणाम अणुबॉम्ब पडण्यापेक्षा भयानक असतील. याचा अनुभव काही दिवसापूंर्वीच आला आहे. 1980 च्या दशकांत आपण संगणकाच्या बिघाडामुळे मोठ्या घटना घडलेल्या पाहिल्या. सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे क्षेपणास्त्र चुकीच्या ठिकाणी पडलेले …

Read More »

विकासाच्या वाटेवर महागाईचे काटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार तिसर्‍या कार्यकाळात कृषी आणि ग्रामीण विकासाबरोबरच कृषी सुधारणांच्या पातळीवर आघाडी घेण्याची गरज आहे. सरकारकडून तंत्रज्ञानाचा वापर करत खाद्य पदार्थाची नासाडीचे प्रमाण कमी करणे, कृषी क्षेत्रात यांत्रिकीरणाचा वापर अधिक करणे, हवामान बदलाचा सामना करणार्‍या प्रणालीचा अंगीकार करणे, ग्रामीण भागातील रस्ते मंडईला जोडणे, कृषी साठवणुकीच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेत सुधारणा करणे यांसारख्या धोरणात्मक प्राधान्यक्रमाबरोबरच पुरवठा साखळीत सुधारणा करावी लागेल. …

Read More »

बेधुंद मस्तवालांना रोखायचे कसे?

पुण्यातील पोर्शेप्रकरणानंतरच्या गेल्या दोन महिन्यांच्या काळात देशभरातून हीट अँड रनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भरधाव वेगाने गाडी चालवून निष्पापांना चिरडणार्‍यांचा बंदोबस्त करायचा कसा हा आज कळीचा मुद्दा ठरला आहे. याबाबत दोन मुलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसतैनाती अशक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकरणांमध्ये बहुतांश जण मद्यपान करणारे असले तरी दारुवर बंदी घातली जाणेही अशक्य …

Read More »

सरकारी रुग्णालयांच्या मरणकळा

भारतातील सरकारी रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचा अनुभव आम आदमी नेहमीच घेत असतो. पण आता सरकारनेच तयार केलेल्या अहवालातून देशातील 80 टक्के सरकारी रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधाही नसल्याचं समोर आलं आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि अत्यावश्यक उपकरणांचा मोठा तुटवडा असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधांसंदर्भातील हे वास्तव अत्यंत भीषण आहे. विकसित भारताचे स्वप्न घेऊन पुढे जाताना सार्वजनिक …

Read More »