लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

कायदा-सुव्यवस्थेबाबतच्या अपेक्षापूर्तीसाठी…

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांबरोबर भेदभाव करतात. धनखड हे सभागृहात आपल्याला बोलू देत नाही. सभापती हे पक्षपाती भूमिका घेत वावरत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच राज्यसभेच्या सभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. दरम्यान, बुधवारीही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. दुसरीकडे लोकसभेतही झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात …

Read More »

पुन्हा देवेंद्रपर्व

विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळूनही महायुतीच्या सरकार स्थापनेला झालेल्या विलंबामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले; परंतु अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी धूमधडाक्यात पार पडला. दरम्यानच्या काळात निर्माण झालेला गतिरोध हा मंत्रीपदांबाबतची रस्सीखेच कायम असल्याचे दर्शवणारा आहे. परंतु भक्कम बहुमत आणि महायुतीला मिळालेली लोकमान्यता यामुळे या सरकारच्या स्थैर्याबाबत कसलीही चिंता करण्याचे कारण दिसत नाही. तथापि विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतलेल्या …

Read More »

राजकीय बदलांची नांदी

यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत राष्ट्रीय पक्षांना मत देणे अधिक महत्त्वाचे वाटले. अलिकडचे निकाल पाहता मतदारांचा बदलता ट्रेंड पाहून प्रादेशिक पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्या राज्यांत भाजप आणि कॉग्रेसचा स्ट्राईक रेट अधिक आहे, तेथे लहान पक्षांना उमेदवार निवडून आणताना बराच आटापिटा करावा लागला. राष्ट्रीय पक्षांचा वाढता दबदबा येणार्‍या काळातील राजकीय बदलांची नांदी म्हणावा लागेल. यंदाच्या …

Read More »

झोल नाही, ‘ सेल्फ गोल ’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील विभक्त झालेले गट असल्यामुळे यावेळच्या निकालांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पण निकालांनी …

Read More »

फटाफुटीची भाषा कशासाठी?

सध्या एक स्लोगन खूपच व्हायरल होत आहे. ‘बटेंग तो कटेंगे.’ अर्थात ती भुलभुलैय्या निर्माण करणारे स्लोगन आहे. याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो. ज्याने त्याने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा. आता तर त्याच्याशी मिळतेजुळत्या स्लोगनचे पेव फुटले आहे. पण मुळातच बटेंगेसाठी आपण एकत्र आहोत का, याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन शंभरीकडे जाणार्‍या भारतातील समाज आज जातीजातींमध्ये …

Read More »

सुरुक्षित पदार्पण

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या आहेत. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. याशिवाय 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान …

Read More »

विकसित भारतासाठी

भारत आणि भारतातील लोक विकसित देशांच्या श्रेणीत असल्याचे म्हणायचे असेल तर तीन निकष पाहावे लागतील. पहिले म्हणजे प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाण्याची उपलब्धता. दुसरे म्हणजे स्थानिक सरकारी शाळेची गुणवत्ता. तिसरा मोठा निकष म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर. याखेरीज हवेची गुणवत्ता, कामगारांची उत्पादन क्षमता, आरोग्य स्थिती, ज्येष्ठांची देखभाल, वनक्षेत्र, उर्त्सजन कमी, जैवविविधता देखील निकष आहेत. याजोडीला पुढील 25 वर्षांत 30 हजार डॉलरपेक्षा …

Read More »

याला ‘आजार’ ऐसे नाव?

मथळा वाचून तुम्हाला एखादा गंभीर आजार किंवा रोगाविषयी लेख असेल, असे वाटू शकते. मात्र इथेच तुमची गल्लत होऊ शकते. अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एका ठिकाणी बोलताना देशाबाहेर जाण्याचा तरुणांना ‘आजार’ झाला असल्याचे मत मांडले. अर्थात तरुणाई देशाबाहेर का जात आहे? कशामुळे देश सोडण्याची वेळ आली ? यामागची प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात. श्रीमंत देश वगळली तर सर्वच विकसनशील देशात …

Read More »

आघाडीची कसोटी

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. पण काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थिती पालटली आहे. कमकुवत काँग्रेस पक्ष घटक …

Read More »

दीपस्तंभ…

रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाचा एक तेजस्वी तारा निखळला आहे. आज जगातील पाचव्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे योगदान इतिहास कधीही विसरु शकणार नाही. आपण आयुष्यात काय करतो, किती पैसा मिळवतो यापेक्षाही दैनंदिन व्यवहारात आपलं आचरण हे नम्रतापूर्ण, शालीनतापूर्ण असलं पाहिजे आणि तीच आपली खरी ताकद आहे. ही खूप मोठी शिकवणूक रतन टाटांसोबतच्या क्षणांनी मला …

Read More »