लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

‘औषधबळींना’ जबाबदार कोण?

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे दूषित किंवा भेसळयुक्त औषधांमुळे १२ बालके दगावल्याची घटना अत्यंत खेदनजक आहे. यापूर्वीही जम्मूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, गुरुग्राम, तामिळनाडू , जे.जे. रुग्णालय तसेच गांबियामध्ये दूषित औषधांमुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. वास्तविक, भारतामध्ये १९४० साली तयार करण्यात आलेला औषधे आणि प्रसाधने अधिनियम १९४० हा कायदा अतिशय प्रभावी आणि परिपूर्ण आहे; परंतु या कायद्याची अमलबजावणी करणारी यंत्रणा कुचकामी …

Read More »

बिहारमध्ये काँग्रेसचे काय होईल?

बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. त्यापूर्वीच या राज्यातील रणसंग्रामाने वेग घेतलेला आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर बिहारला केंद्रस्थानी ठेवत निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. राहुल गांधींची ‘व्होटर अधिकार यात्रा’ गर्दी जमवण्याच्या आणि मथळे मिळवण्याच्या दृष्टीने बरीच यशस्वी ठरली. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत आकलन अहवालानुसार या यात्रेतून निर्माण झालेला उत्साह मतांमध्ये रूपांतरित होणे कठीण …

Read More »

ई सिमकार्ड घोटाळ्याचा चक्रव्यूह

इंटरनेटच्या विस्ताराने माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली; पण या विस्तारणार्‍या सायबरविश्वात गुन्हेगारीही वाढत चालली आहे. सायबर गुन्हेगार आजच्या काळात नवनवीन शक्कल लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. परिणामी, आपल्या हातात असणारा मोबाईल कोणत्या क्षणी आपले बँक खाते रिकामे करेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. अलीकडील काळात गाजत असलेला ई-सिम घोटाळा हा यातीलच एक प्रकार असून त्याबाबत अत्यंत सजग …

Read More »

महती नवरात्रोत्सवाची

भारताच्या सर्वच प्रांतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरे होतात. भारतीय संस्कृतीने पुरुष देवता असतानाही शक्ती देवता म्हणून स्त्री देवतेला उभे करुन महिषासुरासारखा बलदंड राक्षस तिच्या हातून वध करवून घेतला. तिचा हा मोठा पराक्रम सांगण्यासाठी मोठी परंपरा निर्माण झाली. असुरी शक्ती जेव्हा दैवी शक्तीविरुद्ध युद्ध करते तेव्हा त्याचे प्रतिक म्हणून नवरात्र साजरी …

Read More »

सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ‘विक्रम-३२’ ही देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडटर चिप प्रदान करण्यात आली. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या विश्वातील आकांक्षांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. आतापर्यंत भारताचे योगदान डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक दर्जाचे असले तरी प्रत्यक्ष उत्पादनात तो मागे राहिला होता. परंतु आता सेमीकंडटर निर्मितीच्या स्पर्धेत भारताने अग्रणी स्थान मिळविण्याची दिशा निश्चित केली आहे. आजची दुनिया एका प्रचंड तांत्रिक क्रांतीच्या …

Read More »

करुया स्वदेशीचा जागर

रशिया-युक्रेन संघर्ष, हमास-इस्राईल संघर्ष, ट्रम्प यांचे शुल्क धोरण आणि चीनच्या भूमिकेवरून वाटणारी अनिश्चितता पाहता भारताने आता स्वदेशी धोरणावर व्यापक विचार करायला हवा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार्‍या भारताने आता स्वदेशीची मात्रा बहुतांश क्षेत्रावर लागू करावी, जेणेकरून देशहित साधले जाईलच, त्याचवेळी जगाला पर्यायी देशही मिळेल. आतापर्यतची भारताची प्रतिमा आणि भूमिका पाहता वसुधैव कुटुम्बकम अशीच राहिली असून ती जागतिक बाजारातील …

Read More »

राहुल-तेजस्वींची यात्रा फलदायी ठरेल?

बिहारमध्ये येणार्‍या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकांची पूर्वतयारी सध्या जोमाने सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बिहारी जनतेला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काँग्रेस पक्षाने गेल्या काही वर्षांत बिहारमधील जनाधार मोठ्या प्रमाणावर गमावला आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी आणि ‘इंडिया’ आघाडीला बळकटी देण्यासाठी राहुल गांधी यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत ‘मतदार अधिकार यात्रे’स …

Read More »

मांगल्यदायी गणेशोत्सव

भाद्रपद शुल चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशमूर्ती तयार करून तिचे यथासांग पूजन करावे आणि वाहत्या पाण्यात ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्र सांगते. या व्रताला सिद्धिविनायक व्रत म्हटले जाते. हे व्रत जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, अपकीर्ती निवारणासाठी, कीर्ती पुनःप्राप्तीसाठी केले जाते. कृष्णाला स्यमन्तक मणि चोरीच्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी नारदांनी हे व्रत सांगितले होते. महाभारतातील युद्धकाळी कृष्णाने युधिष्ठिरालाही याच व्रताची शिकवण …

Read More »

‘पिरियड शेमिंग’ चा डाग

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या राज्यातील ठाणे जिल्ह्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींशी करण्यात आलेली वर्तणूक ही अमानवी आणि घृणास्पद आहे. मासिक पाळीविषयीची लाज ही मासिक पाळीला एक अनावश्यक शारीरिक घटना मानण्याच्या सामाजिक धारणेचा परिणाम आहे. वास्तविक पाहता तो शरीरधर्म आहे. असे असूनही मासिक पाळीकडे नकारात्मक प्रक्रिया म्हणून पाहिले जाणे, ही घृणास्पद आणि वीट आणणारी मानसिकता आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील …

Read More »

भारत झुकेगा नही…

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात भारत व अमेरिकेतील व्यापार आणि गाढ मैत्री ज्या चमकदार उंचीवर पोहोचेल, अशी जी अपेक्षा होती, ती १ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आणि ६ ऑगस्ट रोजी रशियाकडून तेलखरेदीचे कारण पुढे करत अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्कआकारणी जाहीर केल्यामुळे धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी …

Read More »