गेल्या मंगळवारी, काँग्रेसने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या निषेधार्थ किसान महाचौपाल आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्ो राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हटले, ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर भारत-अमेरिका करार रद्द करा’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ‘मोदींनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले …
Read More »विशेष
एकात्मतेचा ‘रंग’ सोहळा
भारतात सर्व प्रांतात साजरा होणारा सर्वात चैतन्यमयी सण म्हणजे होळी. एकीकडे वसंतागमनाच्या ओढीने आतूर झालेली सृष्टी वातावरणात चैतन्य पसरत असते, त्याच वेळी फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीला रंगांची उधळण करत मानवी मने आनंदाने न्हाऊन निघतात. प्रेम, जिव्हाळा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा हाभव्य सोहळा भारतीय णसंस्कृतीतील विविधता आणि एकात्मता दर्शवणारा आहे. ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ हे या सणाचे मुख्य सूत्र आहे. या काळात …
Read More »आव्हानांच्या बोजाखाली आयटी क्षेत्र
भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. देशाची माहिती तंत्रज्ञान उद्योगव्यवस्था अनेक दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिली आहे; मात्र …
Read More »चिनी रोबोडॉग वादामुळे भारताची नाचक्की
दिल्लीत केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ‘एआय इम्पॅक्ट समिट 2026’ आयोजित करण्यात आली. या समिटमध्ये आधी भारतीय उद्योजकाच्या गॅझेट्सची चोरी आणि दुसऱ्या दिवशी चिनी कंपनीने तयार केलेला रोबोटिक डॉग स्वत: विकसित केल्याचा दावा एका भारतीय विद्यापीठाने केल्याने भारताची जगभरात नाचक्की झाली आहे. चीनने या ग्रेटर नोएडातील गलगोटिया विद्यापीठाच्या तंत्रज्ञान चोरीवर बातम्या जगभरात पोहोचवल्या आहेत. मोठा गाजावाजा करीत केंद्र सरकारच्या …
Read More »‘एआय समिट’ ची सांगता,पण…
नवी दिल्लीतील ’इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ च्या निमित्ताने सध्या देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सामर्थ्याची आणि त्यातील गुंतवणुकीची मोठी चर्चा सुरू आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील हा बदल जागतिक अर्थव्यवस्थेच्या नव्या समीकरणांची नांदी मानला जात असला, तरी त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीचे संकेत मिळत असताना, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाबद्दल व्यक्त केलेली चिंता अत्यंत कळीची आहे. …
Read More »महामार्गावरील धावपट्टीचा संदेश
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले तर सिंगापूर, तैवान आणि स्वीडन सारख्या देशांनी आपल्या महामार्गांचा वापर लष्करी धावपट्टया म्हणून करण्याचे कसब आधीच आत्मसात केले आहे. भारतानेही त्याच धर्तीवर आपली सुरक्षा व्यवस्था अधिक लवचिक बनवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील मोरान येथे ‘सी-130 जे’ सुपर हर्क्युलिस विमानातून ज्या प्रकारे आपत्कालीन लँडिंग सुविधेवर (ईएलएफ) पदार्पण केले, ती प्रतीकात्मक कृती चीनच्या सीमेवर भारताच्या वाढत्या हवाई …
Read More »अविश्वास प्रस्तावानंतर विशेषाधिकार भंगाचा खेळ
पक्षपातीपणाचा आरोप करीत ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची सूचना सादर केली आहे. विरोधकांनी मंगळवारी सभापतींविरुद्ध ही सूचना सादर केली. त्यानंतरही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची पोलखोल करीत राहिले. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी खा. राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान झालेल्या ट्रेड डीलवर मोठा …
Read More »आयात कृषीमालाची टांगती तलवार
भारत-अमेरिका यांच्यातील बहुचर्चित व्यापार करारासंदर्भात सध्या सार्वजनिकरीत्या जी चर्चा सुरू आहे, तिने देशातील शेतकरी संघटनांच्या काळजात धडकी भरवली आहे. त्यांच्या या चिंतेमागे सबळ कारणेही आहेत. देशांतर्गत शेती आधीच मोठ्या संकटात असून, बाजारात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 30 ते 40 टक्के कमी दर मिळत आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकेतील प्रचंड सबसिडी असलेल्या स्वस्त शेती उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली केल्यास, त्याचे गंभीर परिणाम स्थानिक शेतीवर …
Read More »महाशिवरात्रीचा बोधार्थ
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येणारी महाशिवरात्री हा हिंदू धर्मियांमध्ये सर्वदूर साजरा होणारा एक महाउत्सव. आध्यात्मिक उन्नती,आत्मबोध आणि विश्वातील लयाचा हा उत्सव शिव आणि शक्तीच्या मीलनाचा सोहळा म्हणूनही साजरा होतो. चेतना आणि ऊर्जा एकरूप होऊन सृष्टीच्या संतुलनाचा संदेश देतात. मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याची ही पर्वणी मानली जाते. आपल्यातील अहंकार आणि षड्रिपूंचा नाश करून आत्मस्वरूपाकडे …
Read More »संसदेत महिला खासदारांचा रुद्रावतार
संसदेत महिला खासदार असण्याकडे दुर्लक्ष करून भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर संतापजनक व घाणेरडी वक्तव्ये केली. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता बोलणार होते. मात्र, विरोधी पक्षाच्या महिला खासदार पंतप्रधान मोदी यांच्या आसनाजवळ पोहोचल्या. या प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले आणि यावेळी पंतप्रधानांचे संबोधन टळले. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र