लेख-समिक्षण

मनोरंजन

अन्या सिंग ‘बॉर्डर २’मध्ये

बहुलोकप्रिय ठरलेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉर्डर २ नावाने प्रदर्शित होणार्‍या या बहुप्रतिक्षित सिनेमाविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सनी देओल अभिनीत या आगामी सिनेमात वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार काम करणार आहेत हे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. आता या सिनेमात आणखी एका कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली …

Read More »

अनभिषिक्त सुपरस्टार

शाहरुख खान… बॉलीवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न… हजारो-लाखो नव्हे तर कोट्यवधी तरुण-तरुणींच्या हृदयाची धडकन…जवळपास तीन दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेसृष्टीवर आपली अवीट आणि अमीट छाप उमटवणारा बादशहा… फॅशन आयकॉन…स्टाईल आयकॉन…एटिकेटस् आयकॉन….आणि अभिनयाच्या क्षेत्रात तर अनभिषिक्त सम्राट… रुपेरी पडद्यावरील त्याच्या हरेक अदा प्रेक्षकांना मनापासून आवडणार्‍या… इतक्या की गावाखेड्यांमध्येही एखाद्या स्टायलिश तरुणाला ‘काय शाहरुख’ म्हणून उपमा दिली जाते…. त्याच्या स्टाईलची नक्कल करणार्‍यांची …

Read More »

आलिया झळकणार ‘चामुंडा’मध्ये

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एकामागून एक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या दोन भव्य चित्रपटांचे शूटिंग ती सध्या करत आहे. मात्र, या दोन्ही प्रोजेट्सच्या दरम्यान आलिया आता आणखी एका मोठ्या चित्रपटाशी जोडली जाऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. असं सांगितलं जातंय की, स्पाय यूनिव्हर्सनंतर आलिया आता …

Read More »

असरानी नावाचे हास्यपर्व

हिंदी चित्रपटसृष्टीतील चालतीबोलती दंतकथा ठरलेल्या शोले चित्रपटात लहानशी, परंतु अविस्मरणीय भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे नुकतेच निधन झाले. केवळ शोलेच नाही, तर त्यापूर्वी व त्यानंतर असंख्य चित्रपटांत लहान-मोठ्या व सर्व छटांच्या भूमिका साकारणारे असरानी काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते. ‘हम अंग्रेज़ों के ज़माने के जेलर हैं’ व हमारे जेलमें सुरंग?’ हे विशिष्ट लकबीत त्यांनी उच्चारलेले संवाद चित्रपटप्रेमींच्या कायम …

Read More »

‘असंभव’च्या रहस्यमय पोस्टरने वाढवली उत्सुकता

टीझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलेल्या ‘असंभव’ या आगामी मराठी सस्पेन्स थ्रिलरच्या नव्या रहस्यमय पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेचे वण घेतले आहे. गडद लाल-काळ्या पार्श्वभूमी असलेले हे पोस्टर, नजरेतून जणू काही प्रश्न विचारत आहे की, ही कहाणी प्रेमाची आहे की सुडाची? सचित पाटील, मुता बर्वेआणि प्रिया बापट या तिघांचे भावदर्शी चेहरे, शांततेतली अस्वस्थता, आणि हलकं स्मित हे सगं गूढतेचे धागे …

Read More »

वास्तववादी चित्रपटांची वानवा

चित्रपट हे मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु मनोरंजनाचा अर्थ फक्त मन रमविणे, वेळ घालविणे इतकाच नसतो. प्रेमकथा, नाचगाणी आणि मारामारी यानंतर एखाद्या चित्रपटाचा सुखांत झाला की तेवढेच मनोरंजन असे होत नाही. जीवनाचे यथार्थ दर्शन, लोकांच्या वेदना, समाजातील सत्य आणि मानवी संघर्षाशी प्रेक्षकाला सामोरे नेणे हेही मनोरंजनाचे एक महत्वाचे अंग असते. सत्य दाखविणार्‍या चित्रपटांची कथानके म्हणूनच विशेष ठरतात, कारण …

Read More »

रणबीर-राज्ाूचा चित्रपट आमिरमुळे लटकला

राजकुमार हिरानी आणि रणबीर कपूर यांचा चित्रपट अनिश्चित काासाठी लटकला आहे. राजकुमार आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र येत होते. मात्र दोघांच्या चाहत्यांची आता निराशा झाली आहे. आमिर खानमुळे हा चित्रपट लांबणार असल्याची माहिती आहे. ‘दादासाहेब फाळके’ यांच्या आयुष्यावर आधारीत असा चित्रपट तयार करण्याचा मानस राजकुमार हिरानी यांचा होता. त्यासाठी आमिर खानची निवड करण्यात आली. आमिर खानने या चित्रपटासाठी अनेक चित्रपट …

Read More »

रुपेरी पडद्यावरचा दीपोत्सव

भारतीय संस्कृतीत दिवाळी हा तेजाचा, चैतन्याचा, प्रकाशाचा उत्सव असून या सणाला सणसम्राज्ञी किंवा सणांची महाराणी म्हटले जाते. या सणाचे सामाजिक, धार्मिक आणि भावनिक पैलू जितके खोल, तितकाच त्याचा प्रभाव भारतीय चित्रपटसृष्टीवरही दिसून येतो. बॉलिवूडने गेल्या काही दशकांत दिवाळीच्या उत्सवाला केवळ पार्श्वभूमी म्हणून नव्हे तर एक कथानकाचे केंद्रस्थान म्हणूनही वापरले आहे. प्रत्येक काळात दिवाळीच्या प्रकाशात नातेसंबंधांची गुंतागुंत, कुटुंबातील बंध, प्रेम, पुनर्मिलन, …

Read More »

‘क्रू’ परतणार…

करीना कपूर, क्रिती सॅनॉन आणि तब्बू या हवाई सुंदर्‍यांचा ‘क्रू’ लवकरच परतणार आहे. २०२४ मध्ये या विनोदी अंगाने जाणार्‍या गुन्हेपटाने रसिकांची चांगलीच पसंती मिवली होती. एकता कपूर आणि रिहा कपूर यांनी ‘क्रू’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोघांनी आता या चित्रपटाचा दुसरा भाग आणायचे ठरवले आहे. ‘क्रू’ या चित्रपटातच त्याचे अनेक भाग लपले आहेत. निर्मात्यांनी अनेक संकल्पांनांची चाचपणी केली. त्यानंतर …

Read More »

शेवट दुःखद असूनही…

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते माणसाला एका वेगळ्या जगात घेऊन जाणारे माध्यम आहे. पडद्यावर उमटणार्‍या भावनांनी आपण अनेकदा वास्तव विसरतो आणि पात्रांच्या आनंद-दुःखात रंगून जातो. काही चित्रपटांचा शेवट जसा आशादायक आणि सुखद असतो, तसाच काहींचा शेवट इतका वेदनादायी असतो की तो मनावर कायमचा ठसा उमटवून जातो. असेच काही बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यांच्या कथांचा शेवट शोकांत आहे पण त्यातून …

Read More »