नव्वदच्या दशकातील रुपेरी पडद्यावर गाणे नृत्याचा जलवा असताना, अभिनेत्री सोमी अलीसाठी तो का कठीण होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंदोलन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान संजय दत्तसोबतचा अनुभव सांगतांना सोमी म्हणते, ‘माझ्याकडे कधीच नृत्याचे औपचारिक प्रशिक्षण नव्हते. भारतातील अनेक कलाकारांना लहानपणापासून नृत्य शिकवले जाते, कारण ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण माझ्यासाठी तो मोठा कस होता. सरोज खानसारख्या कोरिओग्राफरच माझ्याकडून नृत्य करवून …
Read More »मनोरंजन
रुपेरी पडद्यावरील गणेशोत्सव
घराघरांमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले की वातावरण मांगल्यदायी आणि ऊर्जादायी बनून जाते. गणपती ही बुद्धीची देवता आहे, तशीच ती कलेची देवता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा संदर्भ आहे आणि आज हा उत्सव सबंध देशभरात नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. त्यामुळे सिनेकलाकृतींमध्येही गणेशोत्सवाचे प्रतिबिंब उमटले आहे. वास्तव, सत्या, अग्निपथ, डॉन, शोर इन द सिटी, माय फ्रेंड गणेशा यांसारख्या …
Read More »‘महावतार नरसिंम्हा कसा बनला?
जुलै महिन्यात रिलीज झालेल्या महावतार नरसिंह या अॅनिमेटेड सिनेमाने नवा इतिहास रचत बॉस ऑफिसवर धूमाकूळ घातला. कालच कुली आणि वॉर २ हे मोठे सिनेमे रिलीज झाले आहेत. मात्र, महावतार नरसिंह सिनेमाचे शो सुरू आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा अॅनिमेटेड सिनेमा ठरला आहे. पण सिनेमा तयार करण्यामागे घेण्यात आलेली मेहनत आणि आलेल्या संकटांना कशा पद्धतीने तोंड दिलं याविषयी या …
Read More »आठवणी ‘शोले’च्या
बॉलिवुडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट म्हणून रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाचा उल्लेख करावा लागतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झाली. आजही या चित्रपटातील पात्र, गाणे, संवाद, दृश्य प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहेत. तीन कोटी रुपयांत तयार झालेल्या चित्रपटाचे प्रारंभिक बजेट एक कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने तत्कालिन काळात ३५ कोटी रुपयांची कमाई केली. मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमध्ये सलग …
Read More »माफी असावी
स्पॅनिश चित्रपट ’चॅम्पियन्स’वर बेतलेल्या ’सितारें जमीं पर’ या चित्रपटाने जवळपास २६७ कोटींचा गल्ला जमवला. २० जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित न करता आमिर खानने तो यु-ट्युबवर प्रदर्शित केला. परंतु अनेक वापरकर्त्यांना पैसे देऊनही तो नीटसा पहाता आलेला नाही. त्यामुळे आमिर खानच्या वतीने माफी मागितली आहे. ’सितारें जमीं पर’ या चित्रपटासाठी अनेक ओटीटी कंपन्या उत्सूक होत्या. परंतु आमिर खानने …
Read More »अद्वितीय काजोल
साधारणतः १९७०च्या दशकात जया भादुरी या मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत सहज अभिनयाचे उदाहरण म्हणून ओळखल्या जात असत. नव्वदीच्या दशकात या धाटणीमध्ये तनुजांची कन्या काजोल दाखल झाली. पन्नाशी पार करणारी काजोल आजही तशीच आहे, आरशाने काय सांगितले याकडे फारसे लक्ष न देणारी. ती एकमेवाद्वितीय आहे. काजोल भारतात इतर कुठल्याही अभिनेत्यापेक्षा जास्त भूमिका नाकारते. काजोलचा जिवलग मित्र करण जोहर सांगतो की, काजोल कधीच …
Read More »१०० सरले, ९० उरले
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘राम लिला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘गंगुबाई’सारखे चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपट ५० टक्के पूर्ण झाला आहे. १०० दिवसांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ९० दिवसांचे शिल्लक आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. आठ महिने सलग चित्रीकरण सुरु होते. ऑगस्टपासून रणबीर …
Read More »‘सैयारा’च्या यशाचे वेगळेपण
प्रकाश मंदावलेला, प्रेक्षकांच्या डोळ्यांत उत्कंठा. स्क्रीनवर पहिली फ्रेम झळकते एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर हलकासा पाऊस, नायकाच्या डोळ्यांत एक अनामिक शोध, आणि त्याच वेळी समोरून येणारी ती! पडद्यावर क्षणभर थांबलेला श्वास, थरार आणि कोमलतेचा संगम. ही आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ची प्रेमकथा जी जणू काळाला वळसा घालून आली आहे. हिंसा, डार्क कंटेंट आणि ओटीटीच्या जगात हरवलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाशी जोडणारी …
Read More »किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा
मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी गाजवला. आजही टीव्हीवर या कलाकारांचे चित्रपट लोकं मोठ्या आवडीने पाहतात. या तिघांची सिनेमातील केमिस्ट्री तर विलक्षण होतीच; पण प्रत्यक्ष जीवनातही ते चांगले मित्र होते. अलीकडेच अशोक सराफ यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, सचिनसोबत माझी आधी कधीच …
Read More »संवेदनशील दिग्दर्शकाची जन्मशताब्दी
भारतीय सिनेमाच्या इतिहासात फारच कमी चित्रपट दिग्दर्शकांनी भांडवलशाही व्यवस्थेच्या पोकळपणाला आणि त्यातून जन्माला येणार्या अधोगामी मूल्यांना तीव्रतेने, जिव्हाळ्याने आणि कलात्मकतेने दाखवले आहे. या दुर्मिळ आणि संवेदनशील दिग्दर्शकांंमध्ये गुरुदत्त यांचे स्थान अग्रक्रमावर आहे. त्यांनी जे काही केले ते त्या काळात केवळ धाडसीच नव्हे, तर सामाजिक भान जागवणारे कार्य होते. त्या काळात भारत स्वतंत्र झाला होता आणि राष्ट्र उभं करण्याची प्रक्रिया सुरू …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र