लेख-समिक्षण

मनोरंजन

‘असंभव’च्या रहस्यमय पोस्टरने वाढवली उत्सुकता

टीझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलेल्या ‘असंभव’ या आगामी मराठी सस्पेन्स थ्रिलरच्या नव्या रहस्यमय पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेचे वण घेतले आहे. गडद लाल-काळ्या पार्श्वभूमी असलेले हे पोस्टर, नजरेतून जणू काही प्रश्न विचारत आहे की, ही कहाणी प्रेमाची आहे की सुडाची? सचित पाटील, मुता बर्वेआणि प्रिया बापट या तिघांचे भावदर्शी चेहरे, शांततेतली अस्वस्थता, आणि हलकं स्मित हे सगं गूढतेचे धागे …

Read More »

वास्तववादी चित्रपटांची वानवा

चित्रपट हे मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु मनोरंजनाचा अर्थ फक्त मन रमविणे, वेळ घालविणे इतकाच नसतो. प्रेमकथा, नाचगाणी आणि मारामारी यानंतर एखाद्या चित्रपटाचा सुखांत झाला की तेवढेच मनोरंजन असे होत नाही. जीवनाचे यथार्थ दर्शन, लोकांच्या वेदना, समाजातील सत्य आणि मानवी संघर्षाशी प्रेक्षकाला सामोरे नेणे हेही मनोरंजनाचे एक महत्वाचे अंग असते. सत्य दाखविणार्‍या चित्रपटांची कथानके म्हणूनच विशेष ठरतात, कारण …

Read More »

रणबीर-राज्ाूचा चित्रपट आमिरमुळे लटकला

राजकुमार हिरानी आणि रणबीर कपूर यांचा चित्रपट अनिश्चित काासाठी लटकला आहे. राजकुमार आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र येत होते. मात्र दोघांच्या चाहत्यांची आता निराशा झाली आहे. आमिर खानमुळे हा चित्रपट लांबणार असल्याची माहिती आहे. ‘दादासाहेब फाळके’ यांच्या आयुष्यावर आधारीत असा चित्रपट तयार करण्याचा मानस राजकुमार हिरानी यांचा होता. त्यासाठी आमिर खानची निवड करण्यात आली. आमिर खानने या चित्रपटासाठी अनेक चित्रपट …

Read More »

रुपेरी पडद्यावरचा दीपोत्सव

भारतीय संस्कृतीत दिवाळी हा तेजाचा, चैतन्याचा, प्रकाशाचा उत्सव असून या सणाला सणसम्राज्ञी किंवा सणांची महाराणी म्हटले जाते. या सणाचे सामाजिक, धार्मिक आणि भावनिक पैलू जितके खोल, तितकाच त्याचा प्रभाव भारतीय चित्रपटसृष्टीवरही दिसून येतो. बॉलिवूडने गेल्या काही दशकांत दिवाळीच्या उत्सवाला केवळ पार्श्वभूमी म्हणून नव्हे तर एक कथानकाचे केंद्रस्थान म्हणूनही वापरले आहे. प्रत्येक काळात दिवाळीच्या प्रकाशात नातेसंबंधांची गुंतागुंत, कुटुंबातील बंध, प्रेम, पुनर्मिलन, …

Read More »

‘क्रू’ परतणार…

करीना कपूर, क्रिती सॅनॉन आणि तब्बू या हवाई सुंदर्‍यांचा ‘क्रू’ लवकरच परतणार आहे. २०२४ मध्ये या विनोदी अंगाने जाणार्‍या गुन्हेपटाने रसिकांची चांगलीच पसंती मिवली होती. एकता कपूर आणि रिहा कपूर यांनी ‘क्रू’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोघांनी आता या चित्रपटाचा दुसरा भाग आणायचे ठरवले आहे. ‘क्रू’ या चित्रपटातच त्याचे अनेक भाग लपले आहेत. निर्मात्यांनी अनेक संकल्पांनांची चाचपणी केली. त्यानंतर …

Read More »

शेवट दुःखद असूनही…

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते माणसाला एका वेगळ्या जगात घेऊन जाणारे माध्यम आहे. पडद्यावर उमटणार्‍या भावनांनी आपण अनेकदा वास्तव विसरतो आणि पात्रांच्या आनंद-दुःखात रंगून जातो. काही चित्रपटांचा शेवट जसा आशादायक आणि सुखद असतो, तसाच काहींचा शेवट इतका वेदनादायी असतो की तो मनावर कायमचा ठसा उमटवून जातो. असेच काही बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यांच्या कथांचा शेवट शोकांत आहे पण त्यातून …

Read More »

महावतार नरसिम्हाचा विक्रम

नुकताच प्रदर्शित झालेला ‘महावतार नरसिम्हा’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाने आतापर्यंत ३२० कोटींचा गल्ला जमवला आहे. एकट्या भारतातून २६८ कोटींची कमाईने चित्रपटाने केली. यात थ्रीडीची कमाई जोडल्यास हा आकडा २९६ कोटींच्या घरात जातो. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी सुरुवात काहीशी रडतखडत झाली. परंतु उत्तरोत्तर चित्रपटाने चांगलीच गती मिवली. खास करुन शाळाशाळांंतून या चित्रपटाचा प्रचार झाला. दाक्षिणात्य प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलाच हात दिला. तेलूगू पट्ट्यातून …

Read More »

मल्याळम सिनेमातील अमिताभ

अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. भारतीय सिनेमावर मोहनलाल यांचा प्रभाव अनुपम मानला जातो. पडद्यावर प्रभावी उपस्थितीमुळेच ते नेहमीच इतरांहून वेगळे भासतात. ते देशातील सर्वाधिक सन्मानित अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन अशी उपाधी दिली गेली आहे. संवादफेक आणि भावनांचे चित्रण यांत त्यांची खासियत …

Read More »

बजेटपेक्षा दहापट कमाई

सध्या तेलुगू चित्रपट बॉस ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. एकापेक्षा एक उत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि प्रेक्षक त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. दमदार कथा आणि प्रभावी अभिनय यामुळे लोक थिएटरमध्ये धावत आहेत. या दिवसांत लिटिल हार्टस् हा चित्रपट बॉस ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. ५ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या छोट्या बजेटच्या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. सकारात्मक प्रतिक्रिया …

Read More »

दशावतार ः विकास-विध्वंसाचे द्वंद्व

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर बोट ठेवणारे चित्रपट आले, मात्र ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे वेगळे स्थान पटकावले आहे. पौराणिक अवतारांचा आधार घेत वर्तमानातील भ्रष्ट व्यवस्था, अन्याय्य विकासाची संकल्पना आणि निसर्गविनाशाचे भयावह वास्तव उलगडून दाखवणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता न राहता विचारप्रवृत्त करणारा ठरतो. दिग्दर्शकाची कलादृष्टी, प्रभावी संवाद आणि कलाकारांचा बहुआयामी, हृदयस्पर्शी अभिनय यामुळे …

Read More »