स्पॅनिश चित्रपट ’चॅम्पियन्स’वर बेतलेल्या ’सितारें जमीं पर’ या चित्रपटाने जवळपास २६७ कोटींचा गल्ला जमवला. २० जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित न करता आमिर खानने तो यु-ट्युबवर प्रदर्शित केला. परंतु अनेक वापरकर्त्यांना पैसे देऊनही तो नीटसा पहाता आलेला नाही. त्यामुळे आमिर खानच्या वतीने माफी मागितली आहे. ’सितारें जमीं पर’ या चित्रपटासाठी अनेक ओटीटी कंपन्या उत्सूक होत्या. परंतु आमिर खानने …
Read More »मनोरंजन
अद्वितीय काजोल
साधारणतः १९७०च्या दशकात जया भादुरी या मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत सहज अभिनयाचे उदाहरण म्हणून ओळखल्या जात असत. नव्वदीच्या दशकात या धाटणीमध्ये तनुजांची कन्या काजोल दाखल झाली. पन्नाशी पार करणारी काजोल आजही तशीच आहे, आरशाने काय सांगितले याकडे फारसे लक्ष न देणारी. ती एकमेवाद्वितीय आहे. काजोल भारतात इतर कुठल्याही अभिनेत्यापेक्षा जास्त भूमिका नाकारते. काजोलचा जिवलग मित्र करण जोहर सांगतो की, काजोल कधीच …
Read More »१०० सरले, ९० उरले
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘राम लिला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘गंगुबाई’सारखे चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपट ५० टक्के पूर्ण झाला आहे. १०० दिवसांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ९० दिवसांचे शिल्लक आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. आठ महिने सलग चित्रीकरण सुरु होते. ऑगस्टपासून रणबीर …
Read More »‘सैयारा’च्या यशाचे वेगळेपण
प्रकाश मंदावलेला, प्रेक्षकांच्या डोळ्यांत उत्कंठा. स्क्रीनवर पहिली फ्रेम झळकते एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर हलकासा पाऊस, नायकाच्या डोळ्यांत एक अनामिक शोध, आणि त्याच वेळी समोरून येणारी ती! पडद्यावर क्षणभर थांबलेला श्वास, थरार आणि कोमलतेचा संगम. ही आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ची प्रेमकथा जी जणू काळाला वळसा घालून आली आहे. हिंसा, डार्क कंटेंट आणि ओटीटीच्या जगात हरवलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाशी जोडणारी …
Read More »किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा
मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी गाजवला. आजही टीव्हीवर या कलाकारांचे चित्रपट लोकं मोठ्या आवडीने पाहतात. या तिघांची सिनेमातील केमिस्ट्री तर विलक्षण होतीच; पण प्रत्यक्ष जीवनातही ते चांगले मित्र होते. अलीकडेच अशोक सराफ यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, सचिनसोबत माझी आधी कधीच …
Read More »संवेदनशील दिग्दर्शकाची जन्मशताब्दी
भारतीय सिनेमाच्या इतिहासात फारच कमी चित्रपट दिग्दर्शकांनी भांडवलशाही व्यवस्थेच्या पोकळपणाला आणि त्यातून जन्माला येणार्या अधोगामी मूल्यांना तीव्रतेने, जिव्हाळ्याने आणि कलात्मकतेने दाखवले आहे. या दुर्मिळ आणि संवेदनशील दिग्दर्शकांंमध्ये गुरुदत्त यांचे स्थान अग्रक्रमावर आहे. त्यांनी जे काही केले ते त्या काळात केवळ धाडसीच नव्हे, तर सामाजिक भान जागवणारे कार्य होते. त्या काळात भारत स्वतंत्र झाला होता आणि राष्ट्र उभं करण्याची प्रक्रिया सुरू …
Read More »आमिरचा ’महाभारत’ ऑगस्टपासून सुरु
आपल्या अनेक मुलाखतीतून ’महाभारत’ यावर सिनेमा काढण्याचे बोलणार्या आमिर खानने येत्या ऑगस्टपासून त्यावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे ’रामयण’ तयार होत असताना ’महाभारता’च्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शयता आहे. थोडयात लवकरच भारतीय चित्ररसिकांना या दोन्ही महाकाव्यांना रुपेरी पडद्यावर पहाता येणार आहे. मनिष मल्होत्रा यांच्या ’रामायण’ या चित्रपटाचे दोन भाग येणार आहेत. आमिर खान याच्या …
Read More »वैवाहिक नातेसंबंधांचे रुपेरी दर्शन
अग्निला साक्षी ठेवून घेतलेल्या सात फेर्यांनंतर बनलेले पती-पत्नी हे जीवनसाथी म्हणवले जातात. पण त्यांच्यातील नातेसंबंधांना असंख्य पदर असतात. ते बहुतांश वेळा उंबरठ्याआडच असतात. त्यांचा बोभाटा केला जात नाही. पण सिनेदिग्दर्शक-कथाकारांनी या हळूवार नात्यातील कंगोरे चित्रपटांच्या माध्यमातून विविध रुपांत मांडले आणि पाहता पाहता याच कथानकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती लाभली. कधी पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज झाले, कधी त्यांच्या नात्यात तिसर्या व्यक्तीच्या अस्तित्वामुळे कथानक …
Read More »कार्तिकचे क्रोएशियामधील वेळापत्रक पूर्ण
बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. गेला महिनाभर क्रोएशियात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. यात त्याने चित्रपटाची स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्ससोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चित्रपटाचे क्रोएशियातील वेळापत्रक पूर्ण झाले …
Read More »बॉलीवूडच्या अपयशास जबाबदार कोण?
सध्या बॉलिवूडची स्थिती खरोखरच चिंताजनक आहे. अलीकडच्या काळात अनेक मोठ्या चित्रपटांनी रसिकांना निराश केले आहे. सातत्याने होणार्या चित्रपटांच्या अपयशाने बॉलिवूडची पायाभूत रचना डळमळीत झाली आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात असली, तरी चित्रपट क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे की, याचे मुख्य कारण म्हणजे खुद्द चित्रपट तारेच आहेत. तेच प्रत्येक चित्रपटाचे भविष्य घडवू शकतात, पण ते तसे करत नाहीत. मोठ्या नायकांची मनमानी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र