हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपट मालिकेच्या तिसऱ्या भागावरून सध्या मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. चित्रपट निर्माते विजय कुमार यांनी या मालिकेच्या बौद्धिक संपदा अधिकारांवर आपला पूर्णतः हक्क असल्याचे सांगत निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘हेरा फेरी’ या फ्रँचायझीचे सर्व अधिकार त्यांच्याकडेच आहेत. या मालिकेचा …
Read More »मनोरंजन
सिनेसृष्टीला ‘संजीवनी’ देणारा ‘धुरंधर’
हिंदी चित्रपटसृष्टी गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याच्या आव्हानाचा सामना निकराने करत आहे. जुन्याच सूत्रांवर आधारित चित्रपट आणि थंडावलेला प्रतिसाद यामुळे 2026 च्या आर्थिक वर्षाचा चौथा तिमाही काळ काहीसा चिंतेत होता. अशा परिस्थितीत दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या भागाप्रमाणेच या सिक्वेलनेही सुपरडुपर हिटच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला. परिणामी, संपूर्ण …
Read More »‘लकडबग्घा-2’चा टीझर रिलीज
अभिनेता आणि दिग्दर्शक अंशुमन झा याने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ’लकडबग्घा 2: द मंकी बिझनेस’ या बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. ‘फर्स्ट रे फिल्म्स’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली असून, हा भाग इंडोनेशियमधील दुर्मिळ होत चाललेल्या ‘सेलेबेस क्रेस्टेड …
Read More »कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी याबाबत मतप्रदर्शन केले. वास्तविक सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या नशिबी अशा प्रकारे आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली होती. शोमन राज कपूर, बिग बी अमिताभ बच्चन, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांनाही आर्थिक नियोजन चुकल्याचा फटका सहन करावा लागला. परंतु या कलाकारांनी प्रचंड मेहनतीने परिस्थिती पालटवली. या …
Read More »‘लाहोर 1947’चे नाव बदलणार?
बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या निर्मिती संस्थेद्वारे साकारण्यात येत असलेल्या आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘लाहोर 1947’ या चित्रपटाच्या शीर्षकात बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतानाच समोर आलेल्या या माहितीनुसार, आता हा चित्रपट ‘बटवारा 1947’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. फाळणीच्या काळातील भीषण वास्तव आणि त्यातील भावनिक खोली अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी …
Read More »‘बूंग’च्या सन्मानाचा अन्वयार्थ
यंदाच्या बाफ्टा (ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) पुरस्कार सोहळ्यात मणिपुरी भाषेतील ’बूँग’ या चित्रपटाने ’सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट’ गटात बाजी मारून भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत असणारा गुगुन किपगेन हा बालकलाकार स्वतः कुकी-झो समुदायाचा असून त्याने यात मैतेई मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या हरवलेल्या वडिलांना परत …
Read More »सूर्याचा नवा चित्रपट ‘विश्वनाथ अँड सन्स’
तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सूर्या याच्या आगामी चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून असलेली उत्सुकता आता संपली आहे. ‘सूर्या 46’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे अधिकृत नाव आणि पहिले पोस्टर निर्मात्यांनी प्रसिद्ध केले आहे. ‘विश्वनाथ अँड सन्स’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून, हा एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सूर्या एका लहान मुलाला कडेवर घेऊन दिसतोय. त्याच्या …
Read More »पुन्हा उजळली चंदेरी दुनिया
कोरोना महामारीच्या काळात वेगाने लोकप्रिय झालेल्या ओटीटी कल्चरमुळे बॉलीवूड संकटात सापडल्याची चर्चा सातत्याने होत होती. विशेषतः चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांनी सिनेमे पाहण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा सर्रास केला जात होता. पण 2025 मध्ये भारतीय चित्रपटांच्या एकूण बॉक्स ऑफिस संकलनाने 13,395 कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीपूर्व काळातील सरासरीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक असून ती प्रेक्षकांच्या बदललेल्या मानसिकतेचे …
Read More »अनुराग विरुद्ध विपुल
हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्भीड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. हा चित्रपट केवळ एक भंपक प्रचारकी थाटाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका विशिष्ट दृश्याचा संदर्भ देत कश्यप यांनी या चित्रिकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दृश्यात एका महिलेला बळजबरीने गोमांस खाऊ घालताना दाखवण्यात आले आहे, ज्यावर कश्यप यांनी उपरोधिक टीका केली. …
Read More »चर्चा नायकांच्या वयाची
बॉलीवूड अभिनेता इमरान खान याने अलीकडेच लोकमनातील एका विषयाची तार छेडली आहे. हा विषय म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान या खानावळींनी वयाची साठी ओलांडत आली तरी किती दिवस नायकाची व्यक्तिरेखा साकारायची? आणखी किती दिवस त्यांना प्रेक्षकांनी पडद्यावर नायकाच्या रुपात पाहायचे? या तिन्ही स्टार्सनी आता आता आपल्या वयाला साजेसा आणि वास्तववादी अभिनय करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र