बॉलीवूड अभिनेता इमरान खान याने अलीकडेच लोकमनातील एका विषयाची तार छेडली आहे. हा विषय म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान या खानावळींनी वयाची साठी ओलांडत आली तरी किती दिवस नायकाची व्यक्तिरेखा साकारायची? आणखी किती दिवस त्यांना प्रेक्षकांनी पडद्यावर नायकाच्या रुपात पाहायचे? या तिन्ही स्टार्सनी आता आता आपल्या वयाला साजेसा आणि वास्तववादी अभिनय करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही …
Read More »TimeLine Layout
March, 2026
-
1 March
इंस्टाग्राम रील्सचे कंटाळवाणे अल्गोरिदम बदला
सोशल मीडियाच्या विश्वात आज इंस्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम आहे. प्रवास, जीवनशैली आणि तंदुरुस्ती अशा अनेक विषयांवरील लघुपट म्हणजेच रील्स या मंचावर जगभरातून पाहिले जातात. मात्र अनेकदा आपल्या फीडमध्ये नको असलेले किंवा निरुपयोगी व्हिडिओ येऊ लागतात आणि रील पाहण्याचा आनंद पूर्णपणे निघून जातो. आनंदाची बाब अशी की ही समस्या अल्गोरिदम रीसेट करून अगदी सहज सोडवता येते. काय आहे …
Read More » -
1 March
समस्या किशोरवयीनांमधील एकटेपणाची
किशोरवयीन मुलांमधील एकटेपणा ही आज जगभरात एक गंभीर आणि वाढती समस्या बनली आहे. सतत येणाऱ्या किशोरांच्या आत्महत्येच्या बातम्या याबाबतच्या गांभीर्याची जाणीव करून देतात. ग्लोबल स्टेट ऑफ कनेक्शन्स या अहवालानुसार, जगभरात सुमारे 1.25 अब्ज लोक एकटेपणाशी झुंज देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील 13 ते 15 वयोगटातील सुमारे 25 टक्के किशोर मुले मानसिक तणाव व एकटेपणाने त्रस्त आहेत. 2022 मधील …
Read More » -
1 March
मोड आलेल्या मेथीचे लाभ
मेथी दाणे असोत किंवा मेथीची हिरवीगार भाजी, त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व बरेच आहे. विशेषतः मोड आलेली मेथी आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. मोड आलेल्या मेथीमध्ये आवश्यक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच हे व्हिटॅमिन-सी, ए ने समृद्ध असून आरोग्य सुद़ृढ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. मोड आलेल्या मेथीच्या सेवनाचे हे काही लाभ… पचनासाठी फायदेशीर : मोड आलेल्या मेथीमधील उच्च फायबर …
Read More » -
1 March
चिलकूरच्या मातीतून जागतिक क्षितिजाकडे
हैदराबादच्या कोलाहलापासून दूर, चिलकूर गावातील एक एकर शेतात झाडांच्या सावलीत आणि खुल्या आकाशाखाली एक वेगळीच सृष्टी आकाराला येत आहे. जहाजाच्या जुन्या ‘कंटेनर’ला कल्पकतेने घराचे रूप देऊन तिथे राहणारा एक तरुण कलाकार आज जागतिक कलाविश्वात आपली मोहोर उमटवत आहे. हर्ष दुरूगड्डा असे या शिल्पकाराचे नाव असून, त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. सध्या त्यांच्या कार्याचा गौरव होत …
Read More » -
1 March
अविमुक्तेश्वरानंदांचा संघर्ष
प्रयागराजमधील माघ मेळ्याच्या वेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना तेथे स्नानास बंदी करून त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार घडला होता. त्यातून शंकराचार्य विरुद्ध योगी आदित्यनाथ असा संघर्ष निर्माण झालेला आहे. या संघर्षाने आता अधिक उग्र स्वरूप धारण केले आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी गो संरक्षणाचा मुद्दा पुढे करत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मोठा लढा हाती घेतला आहे. उत्तर प्रदेशात गाईचे रक्षण …
Read More » -
1 March
वाढत्या बंडखोरीची काँग्रेसला डोकेदुखी
एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या दहा राज्यांतील 37 जागा रिक्त होत असून यासाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहिल्यास अलीकडच्या काळात भाजपच्या स्थितीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. खरी समस्या तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आहे. काही जागांवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकू शकतो, परंतु क्रॉस व्होटिंग म्हणजेच मतविभाजनामुळे काही जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर मागील काळातही ओढवली आहे. …
Read More » -
1 March
राहुल गांधींचे मोदींना थेट आव्हान
गेल्या मंगळवारी, काँग्रेसने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या निषेधार्थ किसान महाचौपाल आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्ो राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हटले, ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर भारत-अमेरिका करार रद्द करा’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ‘मोदींनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले …
Read More » -
1 March
एकात्मतेचा ‘रंग’ सोहळा
भारतात सर्व प्रांतात साजरा होणारा सर्वात चैतन्यमयी सण म्हणजे होळी. एकीकडे वसंतागमनाच्या ओढीने आतूर झालेली सृष्टी वातावरणात चैतन्य पसरत असते, त्याच वेळी फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीला रंगांची उधळण करत मानवी मने आनंदाने न्हाऊन निघतात. प्रेम, जिव्हाळा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा हाभव्य सोहळा भारतीय णसंस्कृतीतील विविधता आणि एकात्मता दर्शवणारा आहे. ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ हे या सणाचे मुख्य सूत्र आहे. या काळात …
Read More » -
1 March
आव्हानांच्या बोजाखाली आयटी क्षेत्र
भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. देशाची माहिती तंत्रज्ञान उद्योगव्यवस्था अनेक दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिली आहे; मात्र …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







