‘रील्स’ बनवणाऱ्या असहाब अहमद अन्सारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत अपयश आल्यानंतरही जिद्द न हारता कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी सीजीएल) परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशातील टांडा या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या असहाब यांनी शालेय शिक्षणात उत्तम गुण मिळवले होते. त्यानंतर कोटा येथे जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि पुढे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीची (बीटेक) पदवी पूर्ण …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
विनेशला न्याय,पण
क्रीडा क्षेत्रात एखाद्या खेळाडूची पात्रता किंवा अपात्रता ठरवताना अनेकदा त्याच्या अंगभूत क्षमतेपेक्षा नियमांचा बागुलबुवा जास्त केला जातो. काही वेळा तर सक्षम खेळाडूला केवळ आकसापोटी किंवा पूर्वग्रहामुळे मैदानातून बाहेर ठेवण्यासाठी नियमांचे निमित्त पुढे केले जाते. दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कुश्ती महासंघाच्या म्हणजेच डब्लूएफआयच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत दिलेली चपराक क्रीडा क्षेत्रातील राजकारणाचा बुरखा फाडणारी आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, आपल्या …
Read More »मागणी राणी नेफरतितीच्या पुतळ्याची
इजिप्तच्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आजही पिरॅमिड, मकबरे व प्राचीन कलाकृतींच्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक कलाकृती म्हणजे 3,370 वर्षांपूर्वीच्या राणी नेफरतितीचा पुतळा. या पुतळ्याचा शोध लागल्यापासून तो जर्मनीतच आहे. एका इजिप्शियन पुरातत्त्वज्ञाने बर्लिनमध्ये असलेला हा राणी नेफरतितीचा अर्धपुतळा परत करण्याची मागणी केली आहे; तर जर्मनीने तसे करण्यास नकार दिला आहे. नेफरतिती प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि …
Read More »आयआयटी पासआऊट चिकन व्यवसायातून कोट्याधीश
तेलंगणाचा रहिवासी असलेल्या सैकेश गौडने आयआयटी वाराणसीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक 28 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगतात उत्तम भवितव्य असतानाही सैकेशच्या मनात स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याचे विचार घोळत होते. याच काळात त्याची भेट हेमाम्बर रेड्डी आणि मोहम्मद सामी उद्दीन यांच्याशी झाली. हेमाम्बर हे त्यावेळी भारतातील मांस उद्योगाचा अभ्यास करत …
Read More »कहाणी ‘केंट’ काराची
केंट कंपनीचे प्रमुख डॉ. महेश गुप्ता यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात एका घरगुती समस्येतून झाली. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात दूषित पाणी प्यायल्यामुळे त्यांच्या मुलांना कावीळ झाली. स्वतः आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतलेले असल्याने, डॉ. गुप्ता यांनी या आजारपणाच्या मूळ कारणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्रांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, विरघळलेले हानिकारक घटक आणि जड धातू …
Read More »मंगळ का पडला कोरडा ?
आपल्या शेजारचा लाल ग्रह ‘मंगळ’ नेहमीच खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा बनून राहिलेला आहे. या ग्रहावर एकेकाळी वाहते पाणी होते, नद्या-सरोवरे होती, हे आता सिद्ध झालेले आहे. मग हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न पडतो. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे तेथील खडकांनी स्पंजाप्रमाणे हे पाणी शोषून घेतले, हे असल्याचाही दावा काही संशोधकांनी केलेला आहे. मंगळाची सध्याची भूमी ओसाड, गोठलेली आणि …
Read More »गरिबीवर मात करत ऐतिहासिक कामगिरी
आंध्रमधील विझियानगरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी जागतिक क्रीडा नकाशावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एका शेतमजूर पित्याच्या या मुलींनी सामोआ येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांवर नाव कोरून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. बेलना हारिका आणि बेलना भार्गवी अशी या दोन सुवर्णकन्यांची नावे असून, त्यांच्या यशाने प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात …
Read More »चीनी धोरणाबाबत लवचिकपणा का?
एकीकडे पंतप्रधान भारतीयांना आयात कमी करण्याबाबत आवाहन करत असताना त्यांच्याच सरकारने चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीबाबत अलीकडे घेतलेला निर्णय धक्कादायक ठरणारा आहे. सरकारने चीनसह भू-सीमा असलेल्या शेजारी देशांकडून येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजेच एफडीआयला निवडक 40 उत्पादन उपक्षेत्रांमध्ये 60 दिवसांच्या आत मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘प्रेस नोट 3’नंतर चीनमधील गुंतवणुकीवर कडक निर्बंध आले होते. गलवान संघर्षानंतर …
Read More »सर्वात वेगाने वाढणारा गहू
आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा नेहमीच पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठीही मोठा उपयोग झालेला आहे. ‘नासा’ या अमेरिकन अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजातीही विकसित केलेली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढू शकते. नासाच्या प्रयोगात रोपे सतत सूर्यप्रकाशात राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाट्याने होते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकाने सांगितले, की …
Read More »सेंद्रीय उद्योगातून बनले कोट्यधीश
जयपूर येथील प्रतीक तिवारी यांनी आपली लठ्ठ पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून ‘रुफटॉप ऑरगॅनिक फार्मिंग’ क्षेत्रात पाऊल टाकले आणि आज ते कोट्यवधींची उलाढाल करणारे यशस्वी उद्योजक बनले आहेत. प्रतीक यांचे शिक्षण 1998 मध्ये कृषी अभियांत्रिकी विषयात झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत महिंद्रा, रिलायन्स फ्रेश, आयटीसी आणि वॉलमार्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये पुरवठा साखळी आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. मात्र, त्यांच्या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र