तामिळनाडूच्या राजकीय पटलावर गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टी आणि सत्ताकारण यांचे एक अतूट समीकरण राहिले आहे. रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या नायकांनी जनमानसावर अशी काही मोहिनी घातली की, तेथील जनतेने त्यांना प्रत्यक्ष सत्तेच्या सिंहासनावरही बसवले. एम. जी. रामचंद्रन यांनी या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर जयललिता यांनी तो वारसा समर्थपणे चालवला. मात्र, गेल्या काही वर्षांत कमल हासन किंवा विजयकांत यांच्यासारख्या दिग्गजांनी प्रयत्न …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
शतपावली का गरजेची?
केवळ उदरभरण करण्यासाठी किंवा चवीसाठी खाऊ नये, तर आरोग्याचा विचार करून पौष्टिक आहार घ्यावा, हे जसे गरजेचे आहे तसेच जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होऊ नये, हेही समजून घेणे गरजेचे ठरते. अनेकांना जेवल्यानंतर बसून राहण्याची किंवा पहुडण्याची सवय असते. त्याचे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जेवल्यानंतर अचानक कोणतेही काम करणे किंवा झोपणे टाळले तसेच जेवल्यानंतर फेरफटका मारण्याची सवय लावल्यास …
Read More »दहावीत शाळा सोडलेला अब्जाधिश
झिरेोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच थक्क करणारा आहे. अवघ्या 17 व्या वर्षी शाळा सोडलेला एक तरुण आज 23 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याचा अधिपती बनला आहे, ही किमया त्यांच्या जिद्दीच्या आणि वेगळ्या वाटेने जाण्याच्या वृत्तीमुळे साध्य झाली आहे. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1986 मध्ये जन्मलेल्या निखिल यांना शालेय शिक्षणात कधीच रस …
Read More »बाजारातील घसरणीने भयकंप कशाला?
भू-राजकीय संकटामुळे अनेकदा शेअर बाजारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळतात. गेल्या दोन महिन्यांपासून इराण युद्धामुळे याचा अनुभव अनेक गुंतवणूकदार घेत आहेत. वास्तविक, या घसरणीचा अर्थव्यवस्थेच्या पायाभूत रचनेवर फारसा परिणाम होत नाही. शेअर बाजार प्रामुख्याने कंपन्यांची कमाई, व्याजदर आणि शेअर्सचे मूल्यांकन या मूलभूत गोष्टींवर चालतो. या गोष्टी भू-राजकीय संकटामुळे कायमस्वरूपी बदलत नाहीत. उदाहरणार्थ, रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात …
Read More »कासव गडद रंगांना घाबरतं?
आणत्याही प्राण्याला जर कोणत्या गोष्टीपासून धोका असेल, तर लगेचच ते प्रतिकार करण्याच्या मोडमध्ये येतात. असंच कासवाचंदेखील आहे; पण कासव गडद रंगांच्या गोष्टींना का घाबरते जाणून घ्या. कासवांपासून काळ्या किंवा इतर गडद रंगाच्या वस्तू दूर ठेवल्या पाहिजेत. तलाव, नदी किंवा कोणत्याही जलाशयाच्या आजूबाजूला तुम्ही कासवे पाहिली असतील; पण तुम्हाला माहीत आहे की, कासवांचे काळ्या रंगाबद्दल एक वेगळेच वर्तन असते. ज्यामुळे ते …
Read More »एका स्वप्नाचा ध्यास
आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …
Read More »उधारी आली गळ्याशी….
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामध्ये मध्यस्थ बनून जागतिक पटलावर कॉलर ताठ करून फिरू पाहणाऱ्या पाकिस्तानला अलीकडेच संयुक्त अरब आमिरातीने एक मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानला दिलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज युएईने आता परत मागितले आहे. ही रक्कम सुमारे 3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात साधारण 32,500 कोटी रुपये इतकी असून यातील 450 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज 1996-97 मध्ये घेण्यात आले होते. …
Read More »डिटोक्टिव्ह माश्या
प्रथमग्रासे मक्षिकापातः म्हणजे पहिल्याच घासात माशी पडणं. एखाद्या कामात सुरुवातीलाच विघ्न येणं. ‘माशी शिंकणं’ या वाक्प्रचाराचा अर्थही जवळजवळ तोच. माश्या मारत बसणं म्हणजे निरुद्योगी बसून राहणं. ज्याच्या तोंडावरची माशीही उठत नाही, तो प्रचंड आळशी किंवा मंद. चांदोमामाला तूप रोटी खायला बोलवावं, तर तुपात नेमकी माशी पडते आणि चांदोबा उपाशी राहतो. एकंदरीत माशीविषयी चांगलं मत असणारा माणूस सापडणं अवघड. का सापडावा? …
Read More »शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम
आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. आजीच्या शाश्वत जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन मान्याने ‘ग्रँडमाज् ग्रीन वीव्ह’ नावाचा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे आतापर्यंत सुमारे 1.2 टन कापडी कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून वाचवण्यात तिला यश आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मान्याच्या आजीचे, व्ही. रुद्रम्मा यांचे निधन झाले. आजीच्या …
Read More »डिजिटल दहशतीचे नवे आव्हान आणि तपासातील त्रुटी
देशभरातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये, सरकारी इमारती आणि सार्वजनिक ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचे वाढते सत्र ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या उरलेली नाही, तर ती राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर तांत्रिक आव्हान बनली आहे. ई-मेल किंवा समाजमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या या धमक्यांमुळे जनमानसात घबराट पसरतेच, शिवाय सुरक्षा यंत्रणांचा अमूल्य वेळ आणि संसाधनेही मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतात. अलीकडेच चंदीगडमधील शाळा आणि सरकारी इमारतींना …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र