हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवले. यामध्ये शोमन राज कपूर यांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा आणि दूरदृष्टीचा, संवेदनशीलतेचा ठसा उमटवणार्या राज यांच्या चित्रपटांनी रसिकांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर त्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले. आपल्या विलक्षण अभिनयक्षमतेनं आणि उत्कट …
Read More »TimeLine Layout
December, 2024
-
29 December
कार चालवा बिनधास्त…!
हल्लीचा जमाना धावपळ आणि मोबाईल म्हणजे चालताफिरता कामे करण्याचा आहे. त्यामुळे कार चालवतानाही मेसेजचे उत्तर द्यावे लागते. सरकारी आकडेवारीनुसार 2016 या वर्षामध्ये कार चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे 4 हजार 976 अपघात झाले. अपघातात 2138 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशा वेळी कार चालवताना फोनचा वापर करणे हे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच आहे. पण ऑटो रिप्लाय अॅप्सचा वापर करून ड्रायव्हिंग दरम्यान स्वतःला …
Read More » -
29 December
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी असतात. तरीही प्रत्येकालाच आपण दुसर्या कुणासारखे असावे असं वाटत असतं. ‘त्या माणसाकडे अमुक किती चांगलं आहे?’ ‘तमका किती बुद्धीमान आहे!‘ ‘तो किती यशस्वी आहे!’ अशा पद्धतीचे असंख्य तुलनात्मक विचार प्रत्येक माणूस करतोच. आपणही वेगळे आहोत. आपणही कुणाचा तरी आदर्श असू शकतो. कुणाला तरी आपल्यासारख बनायचं …
Read More » -
29 December
स्नायू बळकटीसाठी खा हेझलनट्स
निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. अनेक जण आहारात ड्रायफ्रूटस्चा समावेश करतात. पण, खूप कमी लोकांना माहिती आहे की एक ड्रायफ्रूट जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणजे हेझलनट किंवा पहाडी बदाम. त्याला कुल्ठी किंवा चिलगोजा म्हणून देखील ओळखले जाते. याला काजू आणि बदामांपेक्षाही जास्त शक्तिशाली मानले जाते. विशेषतः जेव्हा शरीराला शक्ती आणि पोषण देण्याची गरज असते, त्यावेळी त्याचे …
Read More » -
29 December
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत करण्याची तयारी असली की यश दूर नसते, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील मुलीने विपरीत परिस्थितीत यश मिळवले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेवालवाडी हे गाव. या गावात अर्जुन चिखले आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्यांकडे फक्त 30 …
Read More » -
29 December
खातेवाटपाचे उणे-अधिक
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजित पवार गिरीश महाजनांना …
Read More » -
29 December
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे अभ्यासाचं कारण असतं. कधीतरी घराबाहेर असलेल्या छोट्या-मोठ्या धोक्यांचं निमित्त असतं. कधी पाऊस तर कधी कडाक्याचं ऊन पडलेलं असतं. मुलांचं आरोग्य बिघडेल, अशी काळजी आईवडिलांना वाटत असते. नैसर्गिक धोक्यांबरोबरच मानवनिर्मित धोकेही असतात. या व्यतिरिक्तही कारणं असू शकतात. परंतु पोरांना ‘खेळू नका’ म्हणण्याचं एक अजब कारण पुढे …
Read More » -
29 December
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी परभणीत जाऊन सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सूर्यवंशीचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर …
Read More » -
29 December
एका पर्वाची अखेर
भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे संचालक प्रदीप के. लाहिरी यांच्या ‘अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन: अ पब्लिक सर्व्हंट रिमेम्बर्स’ या आत्मचरित्रामध्ये मनमोहन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, मनमोहन सिंग यांचे भारतीय इतिहासातील योगदान पंतप्रधान म्हणून न राहता भारताचे अर्थमंत्री म्हणून अधिक …
Read More » -
29 December
नदीजोड प्रकल्पातून विकासगंगा
महाराष्ट्रात नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नद्या जोड प्रकल्पाचा संकल्प बोलून दाखवला आहे. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान यादरम्यान वाहणार्या पार्वती, कालीसिंध आणि चंबळ नद्यांचे पाणी हे मोठा जलस्रोत म्हणून पाहिले जाते. या नद्यांना जोडण्यासाठी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोडप्रकल्पाच्या अभियानाची संकल्पना …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







