बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी एटीएम मशिनचा वापर आता सर्वसामान्य बनलेला आहे. जगात पाण्यापासून सोन्यापर्यंत अनेक वस्तू मिळवण्याचेही असे मशिन्स आहेत. मात्र, बँकेच्या व्यवहारासाठी मनुष्याची ओळख पटवणे हे गरजेचे असते. चीनच्या संशोधकांनी प्रथमच चेहरा पाहून माणसाची ओळख पटवणारे एटीएम यंत्र तयार केले आहे. त्यामुळे एटीएम यंत्रांवर दरोडे पडण्याची जोखीम कमी होईल. तिंगशुआ विद्यापीठ व हांगझाऊची झेकवान टेक्नॉलॉजी कंपनी यांनी हे यंत्र …
Read More »TimeLine Layout
June, 2025
-
8 June
अद्वितीय अभियांत्रिकीतील कौशल्य‘लता’
जम्मू आणि काश्मीरच्या उंच कड्यांमध्ये उभारलेला चिनाब रेल्वे ब्रिज म्हणजे केवळ एक अभियांत्रिकी आश्चर्य नव्हे, तर भारतीय विज्ञान, चिकाटी आणि नवे तंत्रज्ञान यांच्या अद्वितीय संगमाचे प्रतीक आहे. ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाच्या यशामागे भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील प्रा. जी. माधवी लता यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले आहे. त्या सिव्हिल …
Read More » -
8 June
पुन्हा एकदा संशयकल्लोळ
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जी ’ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केली ती निश्चितच अभिनंदनीय असली, तरी आता या कारवाईचा धुरळा खाली बसल्यानंतर संशयाचे जे नवीन धुके निर्माण होऊन पहात आहे त्याचाही विचार करावा लागणार आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये देशातील सर्वच राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली, तरी काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने …
Read More » -
8 June
उंचीचे रहस्य
मुलीसाठी वरसंशोधन करताना आपल्याकडे उत्पन्न आणि कुंडलीबरोबरच अनेक बाबी तपासल्या जातात. सगळ्यात पहिली बाब असते मुलाची उंची. मुलापेक्षा मुलगीच उंच असेल तर इतर बाबी जुळूनसुद्धा चर्चा पुढे सरकत नाही. सरासरीपेक्षा अधिक उंची असलेल्या मुलीच्या आईवडिलांना ‘हिचं कसं होणार?’ अशी चिंता लागून राहिलेली असते. जगभरात वेगवेगळ्या वंशांचे लोक राहतात आणि त्यांची सरासरी उंची कमी-अधिक असते. परंतु एका बाबतीत संपूर्ण मानवजात एकसारखी …
Read More » -
8 June
चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू
१८ वर्षांत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आयपीएलचे विजेतेपद जिंकले. मात्र हा विजय मृत्यूचे तांडव घेऊन आला. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल २०२५ च्या विजयाच्या जल्लोषादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी सायंकाळी चेंगराचेंगरी झाली. त्यात किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ हून अधिक लोक जखमी झाले. अनेकजण गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शयता व्यक्त करण्यात आली होती. या दुर्दैवी …
Read More » -
8 June
कोविड पुन्हा का पसरतोय?
कोविड-१९ हा सतत बदलत राहणारा विषाणू असल्यामुळे त्याचे नवे उपप्रकार (सब-व्हेरियंटस्) वेळोवेळी उद्भवत असतात. त्यामुळे अनेक वेळा रुग्णसंख्येतील अचानक वाढीचे कारण हे नवीन उपप्रकारच ठरतात. तसेच, हवामान आणि ऋतूंचाही कोविडच्या प्रसारावर ठळक प्रभाव पडतो. २०२० आणि २१ मध्ये जागतिक तज्ज्ञांनी खात्रीशीररित्या सांगितले होते की, आपल्याला कोविडबरोबरच जगायचे आहे. म्हणजेच कोविडचा विषाणू हा सतत आपल्या वातावरणात राहणारच असून त्याचे नवीन उपप्रकार …
Read More » -
8 June
मिमांसा मान्सूनच्या लहरीपणाची
भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली असतानाच मे महिन्याच्या उत्तरार्धातच वरुणराजाने आगमन करत धुवाँधार बरसात केली खरी; पण त्यानंतर मान्सूनने दडी मारल्यामुळे पेरण्यांसाठी खोळंबलेला शेतकरी संभ्रमात पडला आहे. भारतात आजही शेती ही अर्थव्यवस्थेची कणा आहे. शेतकर्यांना मान्सून एक विशिष्ट वेळेला येईल अशी अपेक्षा असते. पण हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागराचे तापमान वाढत आहे. …
Read More » -
1 June
मी कृतघ्न नाही
‘एखाद दिवशी माझे ट्विटर खाते आणि व्हॉटस् अॅप खाते उघडून दाखविन. मला दोन्ही देशातले नागरिक शिव्याशाप देतात. मी काही कृतघ्न मनुष्य नाही. त्यामुळे तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की, काही जणांना माझे बोलणे आवडते. ते कौतुक करतात. आत्मविश्वास वाढवतात. पण हेसुध्दा तितकेच खरे की दोन्ही बाजुचे कट्टर नागरिक मला शिव्या देतात. आणि खरे तर हे योग्यच आहे. आता या पैकी कुठल्या …
Read More » -
1 June
नायकांचा बदलता दृष्टिकोन
काळानुसार बदलणे हा मानवी स्वभाव असला आणि हा बदल अपरिहार्य असला तरी त्याला नैतिकतेची, नीतीनियमांची चौकट असावीच लागते. ही चौकट अप्रत्यक्ष असते; पण तिचे परिणाम प्रत्यक्ष असतात. बॉलीवूडमधील नायकांबाबत या विषयाच्या अनुषंगाने विचार केल्यास पूर्वीच्या नायकांमध्ये आणि आजच्या नायकांमध्ये एक मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे आज पैसा मिळवण्यासाठी नायकांनी आपल्या स्टारडमचा समाजमनावर होणारा परिणाम हा मुद्दाच विचारात घेणे सोडून दिले …
Read More » -
1 June
खर्या व्यक्तिमत्त्वाचा शोध
आजचा तरुण झपाट्याने बदलणार्या जगाशी स्पर्धा करत आहे. सोशल मीडियावर चमक, करिअरची धावपळ, सतत तुलना… अशा गोंधळात एक गोष्ट हरवतेय ती म्हणजे खरं व्यक्तिमत्त्व. खर्या यशाची सुरुवात बाहेरच्या जगावर नाही, तर स्वतःवर विजय मिळवण्यात असते. काहींना वाटतं की चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्टायलिश दिसणं, इंग्रजीत फटाफट बोलणं किंवा लोकांच्या समोर आत्मविश्वासानं वावरणं. खरं पाहिलं, तर व्यक्तिमत्त्व म्हणजे र्तनातली प्रामाणिकता, मनातली शिस्त, …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







