रिचर्ड फाईनमन हे नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे तीव्र बुद्धिमत्ता, अनिश्चिततेची स्वीकारार्हता आणि बालसुलभ कुतूहल यांचं विलक्षण मिश्रण होतं. बालपणी ते उशिरा बोलायला शिकले. तरीही त्यांना ‘अतिशय बोलके वैज्ञानिक’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मोकळ्या वेळेत ते चित्रकला करत असत. त्यांनी पोर्तुगीज भाषाही फक्त ब्राझीलमधील सहकार्यांना प्रभावित करण्यासाठी शिकली होती! प्रत्येकाला जिंकायचं असतं, पण कोणी खेळ …
Read More »TimeLine Layout
June, 2025
-
15 June
पद पाकिस्तानला, धक्का भारताला
संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदावर पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याच वेळेस संयुक्त राष्ट्रांच्या तालिबान विरोधातील समितीचे प्रमुखपदही पाकिस्तानला देण्यात आले आहे. या दोन्ही बातम्या भारतासाठी धक्कादायक अशासाठी ठरल्या आहेत की, भारतीय खासदारांची सात शिष्टमंडळे जगभरातल्या विविध देशांमध्ये पाकिस्तान कसा दहशतवादाला आश्रय देतो हे त्यांना पटवून देण्यासाठी तिकडे गेली होती, त्यांचे हे दौरे सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद …
Read More » -
15 June
‘दहशतवादी’ बुरशी
मुदहशतवाद हा जगाचा सर्वांत मोठा शत्रू आहे असं भारतासह अनेक देश मानतात, कारण दहशतवादाची विविध रूपं या देशांनी पाहिली आहेत; भोगली आहेत. एखाद्या शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक गोळीबार सुरू होतो आणि अनेकांना रस्त्यातच अखेरचा श्वास घ्यावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी एखादा भरधाव ट्रक घुसतो आणि लोकांना चिरडून निघून जातो. ‘सायबर टेररिझम’ हा नवाच प्रकार सध्या जग अनुभवत आहे. …
Read More » -
15 June
विमान कोसळून २६१ जण ठार
गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी १.३८ वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवासी आणि तीन बी. जे. मेडिकल कॉलेजचे २० डॉटर व स्थानिक नागरिक असे २६१ जण ठार झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने रमेश विश्वकुमार नावाचा केवळ एक प्रवासी विमानातून …
Read More » -
15 June
का कोसळले विमान?
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच चिंताजनक आहे. वास्तविक, बोईंग ७८७ ड्रीमलाइनर ही विमाने सामान्यतः सुरक्षित मानली जातात. एअर इंडियाकडे आजघडीला २५ पेक्षा अधिक ड्रीमलायनर विमाने आहेत. याखेरीज कतार, एतिहाद, ब्रिटिश एअरवेज, चायना साउदर्न, एअर फ्रान्स, एअर कॅनडा यांच्याकडेही बोईंगची विमाने आहेत. हे त्याचे पहिलेच ‘फॅटल हुल-लॉस’ मानले जात आहे. सदर घटनेतील वैमानिकही अनुभवी आणि …
Read More » -
15 June
चीनचा कृषी दहशतवाद ः जगापुढे नवा धोका
पाच वर्षांपूर्वी जगाला कोरोना महामारीच्या गर्तेत ढकलणार्या चीनने पुन्हा एकदा जैविक युद्ध छेडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी थेट जागतिक महासत्ता असणार्या अमेरिकेला लक्ष्य केले असून तेथील तपास यंत्रणांच्या सजगतेमुळे भला मोठा अनर्थ होता होता टळला आहे. अमेरिकेतील न्यायालयात उघड झालेल्या माहितीनुसार, चीनमधून दोन नागरिकांनी एक अत्यंत घातक फंगस अमेरिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम’ नावाचा …
Read More » -
8 June
कपिलच्या पुनरागमनाची धमाल!
आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदी अभिनेता कपिल शर्मा बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘किस किसको प्यार करू २’साठी तयार आह़े ‘किस किसको प्यार करू’ या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वलचे शूटिंग अनुकल्प गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटात कपिल शर्मा मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट विनोद आणि गोंधळाचा डबल डोस देणार आहे. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन, गणेश जैन आणि …
Read More » -
8 June
मनोरंजनसृष्टीतली धोयाची घंटा
कधीकाळी ज्या रूपेरी पडद्यावर आयुष्यातील आनंदाचे, दु:खाचे, प्रेमाचे, बंडाचे रंग पाहायला मिळायचे, तोच पडदा आज गोंधळलेल्या कोलाहलांनी व्यापलेला आहे. एकेकाळी गल्लोगल्लीतील रसिकांच्या काळजाला स्पर्श करणार्या कथा असायच्या; गीतांमध्ये लोकभावना झिरपत असत, संवादांमध्ये आशयसंपन्नता आणि भावनात्मकता असायची; पण आज सिनेसृष्टीवर कार्पोरेट गणितांचं स्वामित्व आहे. आज भावनांपेक्षा बजेट जास्त बोलतं. परिणामी, सिनेमांमध्ये कथा नसते, फक्त ‘कंटेंट’ असतो. अभिव्यक्ती हरवते चालल्याने निखळ, निरलस …
Read More » -
8 June
पर्यावरणपूरक उद्योगभरारीचा आदर्श
दिल्लीतील विशाल सिंह यांनी २०२० मध्ये एक वेगळा मार्ग निवडला. पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि नैतिक व्यापाराचे स्वप्न घेऊन त्यांनी हेम्पलूम या ब्रँडची स्थापना केली. विशेष म्हणजे, त्यांनी ही सुरुवात फक्त ५०,००० रुपयांत केली. आज, अवघ्या चार वर्षांत, हेम्पलूम वर्षाला ७० ते ८० लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. हा ब्रँड भारतातला एकमेव असा ब्रँड आहे जो भांग या वनस्पतीपासून तयार होणार्या सूताचा …
Read More » -
8 June
रुक्ष केसांसाठी हेअरपॅक
केसांची योग्य देखभाल न केल्यास किंवा केसांमध्ये पुरेशी आर्द्रता नसेल तर केस खूप कोरडे होतात. कोरडे केस हे खूपच रुक्ष आणि राठ होत जातात तसेच ते केस आकर्षक दिसत नाहीत. अशा केसांची कोणतीही हेअरस्टाईल बनवणे देखील अवघड होते, आणि केसांची नैसर्गिक चमकसुद्धा कमी होतो. हे केस मऊ बनवण्यासाठी रासायनिक सौंदर्य उत्पादने अजिबात वापरू नका. त्याऐवजी घरगुती हेअर पॅक वापरल्यास केस …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







