लेख-समिक्षण
  • 21 jun 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4209

TimeLine Layout

December, 2024

  • 22 December

    मलायका पुन्हा प्रेमात?

    अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. अलीकडेच मलायकाने पंजाबी गायक एपी ढिल्लोनंच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. तिच्यासोबत राहुल विजयनेही या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती स्टेजवर थिरकताना दिसली. स्वत: एपी ढिल्लोननं या त्याच्या कॉन्सर्टमधील …

    Read More »
  • 22 December

    बालपटांची उपेक्षा

    बॉलिवूडच्या आजवरच्या प्रवासामध्ये बालचित्रपटांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. चित्रपटातील नायकांचे बालपण प्रभावीपणे रेखाटले जाते, मात्र एकप्रकारे नायकाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लहान मुलांच्या पात्रांचा उपयोग केला जातो. कृष्णधवलपासून ते आतापर्यंतच्या काळात असंख्य बालचित्रपट येऊन गेले. किंबहुना मोठ्या कलाकारांचा समावेश असलेल्या बाल चित्रपटांनी काहीवेळा यशही मिळवले, परंतु ते मर्यादित राहिले. काहींची गाणी गाजली तर काहींवेळा व्यक्तिरेखा. पण त्याची व्याप्ती वाढली नाही. …

    Read More »
  • 22 December

    फेसबुकवरुन व्यवहार करताना…

    फेसबुकवरून आपण खरेदी विक्री देखील करू शकतो. परंतु आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता पाहणे अगोदरच गरजेचे आहे. सहज विश्वास ठेवू नका: फेसबुक आणि तत्सम सोशल मिडिया संकेतस्थळे ही व्हर्चऊल फ्रेंडशिपसाठी आदर्श मानले जातात. परंतु या आधारावरच या सोशल मिडियावर विश्वास ठेवणे धोक्याचे ठरते. संपूर्णपणे ऑनलाईनवर विश्वास न ठेवता डोळसपणे व्यवहार करावा. तोंडओळखीवर व्यवहार करणे टाळावे. कधी कधी फेसबुक अकाऊंट फेक असू …

    Read More »
  • 22 December

    व्यंकटगिरी साडीची क्रेझ

    आध्र प्रदेशाचे वैशिष्ट्य असणारी स्टायलिश, ट्रेंडी तितकीच साधी आणि सुंदर दिसणारी व्यंकटगिरी साडी आपले वेगळेपण राखून आहे. वजनाला हलक्या, मुलायम असणार्‍या या साड्या महिला वर्गात वेगळा ठसा उमटवून आहेत. या साड्यांमध्ये भरपूर वैविध्य असून त्या प्रामुख्याने कॉटन आणि सिल्कच्या धाग्यांपासून हातमागावर विणल्या जातात. या साड्या आंध्र प्रदेशातील नेल्लोरे जिल्ह्यातील व्यंकटगिरी या छोट्याशा गावात विणल्या जातात म्हणून, या गावाच्याच नावाने या …

    Read More »
  • 22 December

    वार्धक्य रोखायचंय?

    वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …

    Read More »
  • 22 December

    समर्पितपणाची यशोगाथा

    भारताचा निष्णात फिरकीपटू आर. अश्विन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे अश्विनने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी करायचा. आर अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नईच्या दक्षिणेस असलेल्या मैलापूर शहरात झाला. त्याचे वडील रविचंद्रन हे क्लब क्रिकेटर होते …

    Read More »
  • 22 December

    मानाचा तुरा

    मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबर्‍या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांना मान्यता देण्यात आली आहे. एक …

    Read More »
  • 22 December

    अदृश्य धोका

    त्रासदायक, दुःखद, भयावह घटना लवकरात लवकर विसरून जाण्याची आणि सुखद घटना दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची नैसर्गिक शक्ती आपल्याला मिळाली आहे. अतोनात नुकसान करणार्‍या आणि दीर्घकालीन प्रभाव असणार्‍या गोष्टीही काळाच्या ओघात आपण विसरून जातो. कारण अशा घटन घडल्या म्हणून आयुष्य थांबत नसतं. त्या घटना विसरून नव्या आव्हानांना सामोरं जावंच लागतं. सुखद घटना आपल्याला त्यासाठी शक्ती देतात, म्हणून आपण त्या आपल्या स्मृतीत जपतो. …

    Read More »
  • 22 December

    डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलून अमित शहा वादात

    डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलणे एक फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…..एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता, असे केंद्रीय मंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले. हे बोलल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरला झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्या समर्थनार्थ सहा ट्विट केले. तर स्वत: गृहमंत्री शहा यांनी पत्रपरिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यांच्या विधानाचे …

    Read More »
  • 22 December

    मुद्यांपासून भरकटलेले अधिवेशन

    नव्या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात आतापर्यंत जे काही पाहायला मिळाले त्यावरुन जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याविरोधात विरोधकांनी दिलेली अविश्वास प्रस्तावाची नोटीस ही भारतीय संसदेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. या प्रस्तावाचा सरळसरळ अर्थ देशाच्या उपराष्ट्रपतींवर अविश्वास व्यक्त करणे आहे. संविधानावरील चर्चा असेल किंवा अदानींचा मुद्दा असेल, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी कामकाजाबाबत …

    Read More »