लेख-समिक्षण

नियमित अभ्यासच गरजेचा!

सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये ‌‘एक्झाम फीव्हर‌’ची चर्चा रंगू लागली आहे. कारण परीक्षा आता जवळ येत आहेत. खरे पाहता परीक्षा ही भीती नसून केवळ स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन करण्याची पद्धत आहे. पण बहुतेक विद्यार्थी वर्षभर आजचा अभ्यास उद्यावर ढकलतात. परिणामी, परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाचा डोंगर उभा राहतो. चांगली तयारी करण्यासाठी रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेळापत्रक बनवून सर्व विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्या …

Read More »

कमी उंचीच्या तरुणींसाठी स्टाईलमंत्रा

आजही अनेक मुली कमी उंचीमुळे स्टाईलच्या बाबतीत काहीशा बावचळलेल्या दिसतात. त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो. वास्तविक, उंची कमी असली तरीही योग्य कपडे, रंगसंगती आणि फॅशन ट्रिक्समुळे तुम्ही अधिक उंच, स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बनू शकता. कंबरेच्या वर असणारे बॉटम्स घाला ः हाय-वेस्ट जीन्स, पँट किंवा स्कर्ट अशा प्रकारचे कपडे कंबरेच्या थोड्या वरपासून सुरू होतात. त्यामुळे पाय लांब दिसतात आणि शरीराचा खालचा भाग …

Read More »

हरणाच्या बेंबीपासून परफ्यूम

गलात एक कस्तुरी मृग राहतो, ज्याच्या बेंबीचा सुगंध हा जगातील सर्वात आकर्षक असा सुगंध आहे, हे कविता आणि निबंधांमध्ये वाचत आलो आहोत. तर या सुगंधाची इच्छा इतकी प्रबळ आहे की तो सुगंध मिळविण्यासाठी मानवाने मोठ्या प्रमाणावर हरणांची शिकार केली आहे. अनेक लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. याला केवळ एक गैरसमज मानतात. पण, खास मृग (हरीण) ‌‘कस्तुरी‌‘ आणि त्यातून येणाऱ्या अप्रतिम …

Read More »

बालपणीच्या धक्क्यातून जन्मले ‌‘द मार्ग इनिशिएटिव्ह‌’

बेंगळुरू येथील 14 वर्षीय सूर्य उत्कर्ष याने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी एका मोठ्या रस्ते अपघाताचा अनुभव घेतला होता. या अपघाताने सूर्याला भारतात रस्ते सुरक्षेबाबत पुरेशी जागरूकता आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. कालांतराने इतर अपघातग्रस्तांच्या संपर्कात आल्यावर त्याला याबाबत काहीतरी ठोस करावे असे वाटू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी, वयाच्या 12 व्या वर्षी त्याने ‌‘द मार्ग इनिशिएटिव्ह‌’ ही …

Read More »

इराणची पाठराखण: भारताचे धोरणात्मक पाऊल

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये इराणविरुद्ध मांडण्यात आलेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रस्तावाविरोधात मतदान करून भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची आणि इराणसोबतच्या धोरणात्मक संबंधांची प्रचिती पुन्हा एकदा जगाला दिली आहे. पाश्चात्य देशांनी आणलेला हा प्रस्ताव प्रामुख्याने इराणमध्ये गेल्या वर्षाच्या शेवटी सुरू झालेल्या देशव्यापी निदर्शनांशी संबंधित होता, ज्यामध्ये मानवी हक्कांच्या पायमल्लीचा आरोप करण्यात आला होता. या प्रस्तावात इराण सरकारने आंदोलकांवर केलेल्या अमानुष बलप्रयोगाचा आणि …

Read More »

स्वच्छ इंधनासाठी हवी भरीव गुंतवणूक

जीवाश्म इंधनाच्या (फॉसिल फ्युएल) बेसुमार वापरामुळे निर्माण झालेल्या हवामान संकटामुळे आज संपूर्ण जगाला स्वच्छ इंधनाची निकड भासू लागली आहे. मात्र, या दिशेने होणारे प्रयत्न अत्यंत अपुरे असल्याचे दिसून येते. स्वच्छ इंधन आणि अक्षय ऊर्जेबाबत (रिन्यूएबल एनर्जी) कागदावर अनेक योजना आखल्या जात असल्या तरी, त्यांच्या अंमलबजावणीचा वेग कमालीचा संथ आहे. आजही जगाचा कल जीवाश्म इंधनावरच अधिक असल्याने, हवामान बदलाबाबत जागतिक स्तरावर …

Read More »

अजित पवार यांना अखेरचा निरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात गुरुवारी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह …

Read More »

अर्थपूर्ण ठरो अर्थसंकल्प

गेल्या काही दिवसांपासून देशाचेच नव्हे तर सबंध जगाचे लक्ष संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कडे लागले आहे. सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर यंदा केवळ देशांतर्गत अपेक्षांचेच नव्हे, तर जागतिक अस्थिरतेचेही मोठे आव्हान आहे. महागाई, बेरोजगारी आणि बदलत्या जागतिक व्यापार समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, हा अर्थसंकल्प भारताच्या भविष्यातील आर्थिक दिशेचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार …

Read More »

लिव्ह इन ची कोंडी

अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपच्या वाढत्या प्रस्थवरून चिंता व्यक्त केली. अशा संबंधामध्ये असलेल्या महिलांना जोडीदाराने पत्नीचा दर्जा देऊन सुरक्षा प्रदान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तरुण मुले-मुली स्वत:ला आधुनिक विचारसरणीचे पाईक मानतात आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. मात्र कालांतरांने या संबंधातून विवाहासंस्थेसारखी सुरक्षा मिळत नसल्याचे लक्षात येते. पश्चिमेकडील संस्कृतीचा अंगीकार करणे म्हणजे पुढारलेपण असा …

Read More »

स्वतःची ओळख असणे महत्त्वाचे ः सुनीता आहुजा

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा ही आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीतांनी आपल्या वैयक्तिक ओळखीबद्दल भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी आपण केवळ गोविंदाची पत्नी म्हणून नव्हे, तर सुनीता आहुजा म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. यावेळी त्यांनी राज्यसभेतील जया बच्चन यांच्या गाजलेल्या …

Read More »