बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याच्या पिढीतील अभिनेत्रींवर आणि त्यांच्या प्रसिद्धी मिळवण्याच्या पद्धतींवर सडकून टीका केली आहे. अमिषाच्या मते, वर्षाला केवळ दोन साधारण चित्रपट केल्याने कोणीही सुपरस्टार होत नाही. तिने नमूद केले की, अनेक अभिनेत्री स्वतःकडे एकही एकल ब्लॉकबस्टर चित्रपट नसताना केवळ प्रसिद्धी माध्यमांचा (पीआर) वापर करून स्वतःला मोठे स्टार म्हणून मिरवत आहेत. अमिषाने ‘एक्स’वर पोस्ट करत स्पष्ट …
Read More »सिनेमा ते राजकारण
दक्षिण भारताच्या राजकारणात सिनेमा आणि सत्तेचे नाते अनेक वर्षांपासून आहे. लोकप्रियतेपलीकडे जात ते सामाजिक भावनांशी, प्रादेशिक अस्मितेशी आणि जनमानसाच्या मानसिकतेशी घट्ट जोडलेले राहिले आहे. पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा नायक, गरीबांचा तारणहार किंवा जनतेसाठी जीव धोक्यात घालणारा नेता ही प्रतिमा दक्षिणेतील प्रेक्षकांनी कमालीची उचलून धरताना अनेकदा त्या प्रतिमेलाच त्यांनी वास्तवातील नेतृत्व मानले. त्यामुळेच दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीतून थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचणाऱ्या नेत्यांची परंपरा …
Read More »दहावीनंतरचा मार्ग निवडताना…
दहावीचा टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचे वळण येते. हा काळ केवळ शालेय शिक्षण संपल्याचा नसून, भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीची पायाभरणी करण्याचा असतो. अनेकदा विद्यार्थी आणि पालक केवळ गुणांच्या आधारावर किंवा मित्रमैत्रिणींच्या प्रभावाखाली यूेन शाखेची निवड करतात, परंतु ही पद्धत भविष्यात अडचणीची ठरू शकते. त्यामुळे दहावीनंतरचा मार्ग निवडताना अत्यंत सजग राहणे आणि सर्व उपलब्ध पर्यायांचा सखोल विचार करणे आवश्यक …
Read More »सौंदर्याचा सुवर्णकाळ आणि विज्ञानाचे निकष
माणूस नेमका कोणत्या वयात सर्वाधिक सुंदर दिसतो, विशीतले भरले तारुण्य अधिक आकर्षक असते की तिशीतली प्रगल्भता, हा प्रश्न पिढ्यानपिढ्या चर्चिला जात आहे. अनेकांना असे वाटते की विशीतील वय हे सौंदर्याचे शिखर आहे, मात्र त्वचातज्ज्ञांनी आता यावर विज्ञानाच्या आधारे एक वेगळाच प्रकाश टाकला आहे. वाढत्या वयासोबत व्यक्ती अधिक सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण कशी दिसू शकते, याचे गुपित उलगडताना तज्ज्ञ सांगतात की, विशीपेक्षाही …
Read More »मंगळ का पडला कोरडा ?
आपल्या शेजारचा लाल ग्रह ‘मंगळ’ नेहमीच खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा बनून राहिलेला आहे. या ग्रहावर एकेकाळी वाहते पाणी होते, नद्या-सरोवरे होती, हे आता सिद्ध झालेले आहे. मग हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न पडतो. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे तेथील खडकांनी स्पंजाप्रमाणे हे पाणी शोषून घेतले, हे असल्याचाही दावा काही संशोधकांनी केलेला आहे. मंगळाची सध्याची भूमी ओसाड, गोठलेली आणि …
Read More »गरिबीवर मात करत ऐतिहासिक कामगिरी
आंध्रमधील विझियानगरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी जागतिक क्रीडा नकाशावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एका शेतमजूर पित्याच्या या मुलींनी सामोआ येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांवर नाव कोरून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. बेलना हारिका आणि बेलना भार्गवी अशी या दोन सुवर्णकन्यांची नावे असून, त्यांच्या यशाने प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात …
Read More »महिला सुरक्षिततेपुढील गंभीर आव्हाने
नवी दिल्लीतील नबी करीम परिसरातून नुकतीच एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे अक्षता पडल्याला अद्याप आठवडाही पूर्ण झाला नव्हता, तोच एका नवविवाहितेची हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह पलंगाच्या पेटीत लपवून आरोपी पती फरार झाला. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून ती आपल्या समाजातील प्रगत मानसिकतेच्या दाव्यांवर पडलेली एक मोठी चपराक आहे. या …
Read More »चीनी धोरणाबाबत लवचिकपणा का?
एकीकडे पंतप्रधान भारतीयांना आयात कमी करण्याबाबत आवाहन करत असताना त्यांच्याच सरकारने चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीबाबत अलीकडे घेतलेला निर्णय धक्कादायक ठरणारा आहे. सरकारने चीनसह भू-सीमा असलेल्या शेजारी देशांकडून येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजेच एफडीआयला निवडक 40 उत्पादन उपक्षेत्रांमध्ये 60 दिवसांच्या आत मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘प्रेस नोट 3’नंतर चीनमधील गुंतवणुकीवर कडक निर्बंध आले होते. गलवान संघर्षानंतर …
Read More »मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांच्या ताफ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्याचा आकार मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन …
Read More »विपर्यास नको, सहभाग हवा!
होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. इंधनाचे दर फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल 40 ते 45 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे देशातील तेल कंपन्यांना दररोज 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. रुपयाचे मूल्य 96 पर्यंत घसरल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे. सरकारने अद्याप या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकलेला नाही, परंतु …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र