पुणे जिल्ह्याती नसरापूरमध्येे घडलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनेने सारा महाराष्ट्र हादरून गेला आहे. अकोला जिल्ह्यातील पाचूर येथेही नऊ वर्षाच्या मुलीवर शेजारच्या व्यक्तीकडून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती येथे तर सख्ख्या आजोबांकडून आपल्या नातीवर अत्याचाराचे प्रकरण उघड झाले आहे. समाजात वाढत चाललेल्या या विकृतींमुळे पुन्हा एकदा आया-बहिणींच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. त्यांना केवळ कायदे …
Read More »विरोधकांपुढे आव्हान
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे भारतीय राजकारणातील एका मोठ्या वैचारिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. भारतीय जनता पक्षासाठी पूर्व भारताचे प्रवेशद्वार मानले जाणारे हे राज्य आता त्यांच्या ताब्यात आले आहे. या विजयाने हे स्पष्ट केले आहे की, जिथे जिथे भाजपसाठी यशाची नवीन द्वारे उघडत आहेत, तिथे तिथे विरोधकांसाठी राजकीय रस्ते कायमचे बंद होत आहेत. सद्यस्थितीत भारतीय राजकारणात ’सत्ताविरोधी’ लाटेपेक्षा ’सत्तासमर्थक’ राजकारणाचे …
Read More »‘गोलमाल 5’ च्या चित्रीकरणाला उटीमध्ये सुरुवात
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी विनोदी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘गोलमाल’चा पाचवा भाग सध्या चर्चेत आहे. अभिनेता अजय देवगणने उटी येथील चित्रीकरणाचा एक रंजक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये चित्रपटातील ‘द बॉईज’ आणि या मालिकेची ओळख असलेली ’पाच आसनी दुचाकी’ पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अजय देवगणने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘गोलमाल’चे सिग्नेचर म्युझिक वापरण्यात आले आहे. यावेळेस सवारी मोठी …
Read More »रामायण, राम, रणबीर आणि वाद
सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, त्याची सिनेकारकिर्द आणि कलाकृतींमधील त्याचा अभिनय याची सांगड घातली जाता कामा नये, असे संकेत आहेत. कारण सिनेमा-नाटक या कलाकृतीमधील व्यक्तिरेखेला कलाकार सार्थपणाने न्याय देतो का, तो ताकदीने साकारतो का इथवरच प्रेक्षकांचा संबंध असतो. पण आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांच्या निमित्ताने ही सांगड हमखास …
Read More »सुट्टी ‘फलदायी’ ठरण्यासाठी…
दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील दोन महत्त्वाचे टप्पे. परीक्षांचे दिव्य पार पाडल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी एका अर्थाने संभ्रमाचा आणि दुसऱ्या अर्थाने संधीचा असतो. अनेकदा परीक्षा संपली की आता फक्त मौजमजा करायची, असा विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र, स्पर्धात्मक युगाचा विचार करता या सुट्ट्यांचा काळ केवळ विश्र्ांतीसाठी न वापरता तो फलदायी कसा ठरेल, याकडे लक्ष …
Read More »जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू बाळाचा हा रंग बदलू लागतो आणि ते सावळे दिसू लागते. अशा वेळी नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या टोकण्यामुळे पालकांच्या मनात धडकी भरते. बाळ ’गोरे’ व्हावे यासाठी मग हळद, चंदन किंवा गव्हाच्या पिठाचे उटणे लावण्यासारखे प्रयोग केले जातात. मात्र, यामुळे बाळाची नाजूक त्वचा अधिक कोरडी आणि काळवंडलेली होऊ …
Read More »महाकाय ग्रहनिर्मितीबाबत नवा सिध्दांत
विज्ञानातील सिद्धांतही अनेक वेळा गृहितकेच असतात. कालौघात नवे संशोधन आधीच्या सिद्धांताला छेद देणारे व नवा सिद्धांत स्थापन करणारे असू शकते. यापूर्वी लहान मातृताऱ्याभोवती महाकाय ग्रहाची निर्मिती होऊ शकत नाही, असे मानले जात होते. मात्र, एका महाकाय ग्रहाच्या शोधाने या समजालाही असाच छेद गेला. या ग्रहाचे नाव आहे ‘एनजीटीएस-1बी’. वार्विक विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. डॅनियल बेल्लिस यांनी म्हटले होते की, या ग्रहाचा …
Read More »शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ’ऑटो बेस्ट एम्पेरिओ’चे संस्थापक अवनीत सिंह कोहली उर्फ सन्नी. दिल्लीतील एका सुखवस्तू व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या सन्नी यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. 1996 मध्ये ते जेव्हा आठवीत होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचा भीषण अपघात झाला आणि पुढील तीन वर्षे ते अंथरुणाला …
Read More »बंदी स्वागतार्ह; पण पुरेशी नाही
ऑनलाईन गेमिंगचे वाढते जाळे आणि त्यातून निर्माण होणारी मुलांमधील व्यसनाधीनता हा आज केवळ कौटुंबिक नव्हे, तर एक गंभीर राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. केंद्र सरकारने या संदर्भात नियम निश्चित करून ऑनलाईन जुगारावर आणि सट्टेबाजीवर जी बंदी घातली आहे, ती स्वागतार्ह असली तरी मूळ समस्येचे निराकरण करण्यासाठी ती पुरेशी नाही. तांत्रिक प्रगती आणि सामाजिक स्वास्थ्य यांच्यातील सीमारेषा पुसट होत असताना, या आव्हानाचा …
Read More »कर्मचारी कपातीची लाट
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यपद्धतीत आणि मनुष्यबळ नियोजनात एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक वळण घेतले आहे. तब्बल 51 वर्षांचा यशस्वी प्रवास करणाऱ्या या कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना म्हणजेच ‘व्हीआरएस’ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या स्थापनेपासून अशा प्रकारचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयाने केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे, तर …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र