लेख-समिक्षण

पोटनिवडणूक निकालांचा सांगावा

राजकारणात विजयाचा अहंकार आणि पराभवाचा झटका दोन्ही सोबतच चालत असतात. स्थिती बदलण्यास फार वेळ लागत नाही. काही पराभव असे असतात जे केवळ एखाद्या पक्षाचे गणित बिघडवत नाहीत, तर त्यांच्या अहंकारालाच सुरूंग लावतात. तीन राज्यांतील तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल नेमके हेच सांगणारे आहेत. भाजपसाठी मांजलपूरचा (गुजरात) विजय ही अगदी कोरडी मलमपट्टी ठरली आहे, कारण बांकीपूर (बिहार) आणि दतिया (मध्य प्रदेश) …

Read More »

दुसरी बाजू

राजधानी नवी दिल्लीत जंतरमंतर येथे झालेल्या ‌’जेन झी‌’च्या आंदोलनाचे पडसाद आणि प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. संसदेचे सध्या सुरू असलेले अधिवेशनही याच विषयावरून गाजत आहे आणि या आंदोलनावेळी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, ही मागणीही जोर धरत आहे. अशा प्रकारे या आंदोलनाची पहिली एक बाजू समोर येत असतानाच आंदोलनाची दुसरी बाजूसुद्धा समोर आली. …

Read More »

विक्रांतने आटोपले ‌‘व्हाईट‌’चे डबिंग

अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेसस्सी सध्या त्याच्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‌‘प्रीतम अँड पेड्रो‌’ आणि ‌‘मुसाफिर कॅफे‌’ यांसारख्या प्रोजेक्टस्‌‍नंतर आता तो ‌‘व्हाईट‌’या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या डबिंगचे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाबाबत बोलताना निर्माते महावीर जैन म्हणाले की, आजच्या काळात जेव्हा जग युद्ध आणि संघर्षांवर उपाय शोधत …

Read More »

रुपेरी पडद्यावरची विद्यार्थी आंदोलने

भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर मतभिन्नता स्वीकारण्याच्या आणि शांततापूर्ण विरोधाला स्थान देण्याच्या संस्कृतीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आंदोलने ही केवळ शैक्षणिक परिसरातील घटना नसून समाजातील बदलाची चाहूल देणारी शक्ती मानली जाते. जेव्हा तरुण पिढी शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, भ्रष्टाचार किंवा सार्वजनिक धोरणांविषयी प्रश्न उपस्थित करते, तेव्हा त्या प्रश्नांचे प्रतिबिंब साहित्य, नाटक आणि चित्रपटांमध्येही उमटते. हिंदी चित्रपटसृष्टीनेही विविध काळात …

Read More »

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यशास्त्राचा संगम

महाराष्ट्रात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई, येथे बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधित आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधनाला विशेष महत्त्व दिले जाते. याशिवाय विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ, पुणे, भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ, पुणे आणि डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, अकोर्डी (पुणे) येथेही बायोमेडिकल इंजिनीअरिंगचे अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचे या स्रोतामध्ये नमूद करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यशास्त्राचा संगम काही वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या …

Read More »

‌‘शेरेटिंग‌’चा मोह टाळाच !

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आनंदाचे क्षण जगासोबत शेअर करणे ही आता एक सामान्य बाब बनली आहे. विशेषतः पालकांसाठी आपल्या मुलाचे पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस किंवा त्याचे गोड हसू फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे अभिमानास्पद वाटते. मात्र, या ‌‘शेरेटिंग‌’ (शेअरिंग + पेरेंटिंग) मुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या मुलाच्या सुरक्षिततेला आणि गोपनीयतेला धोक्यात आणत आहात. 1. खासगी माहिती आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोशल …

Read More »

लवंग खा झोपण्यापूर्वी

स्वयंपाकघरात असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात, तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत, जे अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात. गरम मसाल्यांमधील एक म्हणजे लवंग. गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगेमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्‌‍यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने लवंग खाण्याचे फायदे सांगितले …

Read More »

स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश

जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, हे राजस्थानमधील 22 वर्षीय जसपाल सिंह सिंधल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बारावीचा विद्यार्थी असलेल्या जसपालकडे महागडा कॅमेरा किंवा संगणक नव्हता. केवळ स्मार्टफोनच्या मदतीने त्यांनी प्रेरणादायी भाषणे, टेड टॉक्स आणि विविध नामवंत व्यक्तींच्या भाषणांतील महत्त्वाचे भाग निवडून लहान व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात …

Read More »

दिलासादायक निर्णय; पण…

सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च 2026 रोजी ‌‘हरिष राणा‌’ प्रकरणासंदर्भात दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक संवेदनशील पाऊल उचलले आहे. आतापर्यंत केवळ शासकीय व निमशासकीय रुग्णालयांपुरती मर्यादित असलेली ‌‘पॅसिव्ह युथेनेशिया‌’ म्हणजेच निष्क्रीय इच्छामरणाची कायदेशीर प्रक्रिया आता खासगी रुग्णालयांमध्येही राबविण्यास राज्य सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि द्वितीय वैद्यकीय मंडळ स्थापन …

Read More »

नवीन टास्क फोर्सने काय साधणार?

भारतातील शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्था सध्या एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. देशातील लाखो होतकरू तरुणांचे भविष्य ज्या परीक्षांवर अवलंबून असते, त्या परीक्षांच्या विश्वासार्हतेवर गेल्या काही वर्षांत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार घडणारे पेपरफुटीचे प्रकार (पेपर लीक), परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, गैरप्रकार आणि यंत्रणेची दिरंगाई यामुळे तरुण पिढीच्या मनात तीव्र नैराश्य आणि संताप पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षा व्यवस्थेत …

Read More »