विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेसेनेत विलीनीकरण करण्यास सहमती दिली आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याशिवाय विलीनीकरण शक्य नाही. मात्र शिवसेना ही आपल्या मातीतील संघटना आहे. भविष्यात प्रहारचे विलीनीकरण झाले तरी हरकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले. एक लढाऊ संघटनेची निर्मिती सत्तेसाठी करण्यात आली होती आणि ती संघटना …
Read More »निकालांची महाप्रतीक्षा
अनेक आठवड्यांच्या वादळी प्रचारानंतर आणि राजकीय चढाओढीनंतर देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील यंदाच्या निवडणुका भारतीय राजकारणाच्या बदलत्या प्रवाहांचे प्रतीक ठरल्या आहेत. या पाचही राज्यांमधील राजकीय संस्कृती, समाजकारण, अर्थकारण आणि मतदारांची मानसिकता भिन्न असली, तरी लोकशाहीप्रती असलेली त्यांची निष्ठा विक्रमी मतदानाच्या रूपाने पुन्हा …
Read More »तापमानाची काहिली
जगात सर्वाधिक उष्ण असणाऱ्या वीस ठिकाणांत भारतातील 19 ठिकाणांचा समावेश झाला आहे. या ठिकाणचे तापमान 44 ते 46.9 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले गेले. वाढते तापमान ही केवळ हवामानाची नोंद नसून तो एक चिंताजनक विषय आहे. पूर्वी मे आणि जून महिन्यांत तापमानाचा उच्चांक नोंदला जात असताना आता एप्रिलमध्येच या तापमानाने नागरिकांना त्रस्त केले आहे. कमाल तापमानात विक्रमी वाढ होण्यामागे पर्यावरण, मानवी …
Read More »‘रामायण’चा विश्वप्रकाश
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ’रामायण’ हा चित्रपट सध्या जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. लास वेगास येथे पार पडलेल्या ’सिनेमाकॉन’ या जागतिक चित्रपट परिषदेत या चित्रपटाचे सुमारे 20 मिनिटांचे न पाहिलेले फुटेज निवडक उपस्थितांना दाखवण्यात आले. या फुटेजला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड दाद मिळाली असून, चित्रपटाचा भव्य आवाका पाहून उपस्थित थक्क झाले आहेत. या विशेष प्रदर्शनानंतर असे समोर आले आहे की, …
Read More »महानायकाचा उदय आणि एका पर्वाचा अस्त
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी अलीकडेच सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल काही धक्कादायक आणि भावूक खुलासे केले आहेत. चित्रपटसृष्टीतील यशाच्या शिखरावर राहिलेल्या राजेश खन्ना यांना नंतरच्या काळातील अपयश पचवणं कसं जड गेलं, यावर प्रेम चोप्रा यांनी प्रकाश टाकला. एका संवादादरम्यान प्रेम चोप्रा यांनी सांगितले की, राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये जे स्थान आणि लोकप्रियता अनुभवली होती, ती कमी झाल्यावर ते …
Read More »टॅबलेट खरेदी करताना टेक्निकल गोष्टी कोणत्या पाहायच्या?
प्रगत तंत्रज्ञान युगात टॅबलेट खरेदी करणे म्हणजे केवळ स्क्रीनचा आकार किंवा रॅम तपासणे उरलेले नाही. आज आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत हार्डवेअर यांच्यातील सीमा धूसर होत आहेत. जर तुम्ही नवीन टॅब घेण्याचा विचार करत असाल, तर काही अशा तांत्रिक बाबी आहेत ज्या सामान्यतः दुकानात सांगितल्या जात नाहीत, पण त्या तुमच्या भविष्यातील वापरासाठी अत्यंत कळीच्या ठरतात. सर्वात …
Read More »डोळ्यांचा मेकअप करताना…
मेकअप हा चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारा भाग मानला जातो, परंतु अनेकदा मेकअप करताना केलेल्या चुका आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विशेषतः डोळ्यांच्या मेकअपमध्ये झालेल्या चुका गंभीर परिणाम घडवू शकतात. यामुळे त्याचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. डोळ्यांत जळजळ होणे, डोळे लालसर होणे, पाणी येणे, पापण्यांच्या मुळाशी कामट्या साचणे, आयलाइनर लावताच पाणी येणे किंवा आयशॅडोचे कण डोळ्यांत जाणे या समस्या चुकीच्या …
Read More »शतपावली का गरजेची?
केवळ उदरभरण करण्यासाठी किंवा चवीसाठी खाऊ नये, तर आरोग्याचा विचार करून पौष्टिक आहार घ्यावा, हे जसे गरजेचे आहे तसेच जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होऊ नये, हेही समजून घेणे गरजेचे ठरते. अनेकांना जेवल्यानंतर बसून राहण्याची किंवा पहुडण्याची सवय असते. त्याचे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जेवल्यानंतर अचानक कोणतेही काम करणे किंवा झोपणे टाळले तसेच जेवल्यानंतर फेरफटका मारण्याची सवय लावल्यास …
Read More »दहावीत शाळा सोडलेला अब्जाधिश
झिरेोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच थक्क करणारा आहे. अवघ्या 17 व्या वर्षी शाळा सोडलेला एक तरुण आज 23 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याचा अधिपती बनला आहे, ही किमया त्यांच्या जिद्दीच्या आणि वेगळ्या वाटेने जाण्याच्या वृत्तीमुळे साध्य झाली आहे. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1986 मध्ये जन्मलेल्या निखिल यांना शालेय शिक्षणात कधीच रस …
Read More »तप्त झाली वसुंधरा
जागतिक तापमानवाढीच्या भीषण वास्तवाचे चटके आता केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न राहता जनजीवनाला होरपळून काढू लागले आहेत. ‘एक्यूआय.इन’ या जागतिक संस्थेने प्रसिद्ध केलेली ताजी आकडेवारी अंगावर काटा आणणारी आहे. जगातील सर्वाधिक उष्ण 20 शहरांच्या यादीत 19 शहरे एकट्या भारतातील असावीत, ही बाब आपल्या देशासमोरील हवामान संकटाची भीषणता स्पष्ट करते. या परिस्थितीला प्रामुख्याने हवामान बदल जबाबदार असला, तरी निसर्गाप्रती असलेली मानवी उदासीनता …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र