आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …
Read More »उधारी आली गळ्याशी….
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामध्ये मध्यस्थ बनून जागतिक पटलावर कॉलर ताठ करून फिरू पाहणाऱ्या पाकिस्तानला अलीकडेच संयुक्त अरब आमिरातीने एक मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानला दिलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज युएईने आता परत मागितले आहे. ही रक्कम सुमारे 3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात साधारण 32,500 कोटी रुपये इतकी असून यातील 450 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज 1996-97 मध्ये घेण्यात आले होते. …
Read More »ईश्वरदर्शनात भेदाभेद कशाला?
आपल्या आध्यात्मिक समृद्धीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांवरील प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केलेली टिप्पणी अत्यंत समयोचित आणि डोळस आहे. एकविसाव्या शतकात, जिथे आपण विज्ञानाच्या जोरावर चंद्रावर पाऊल ठेवले आहे, तिथे लिंग किंवा वर्गाच्या आधारावर मानवी भेदभाव करणे ही खरोखरच मोठी विसंगत बाब आहे. केरळमधील शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यांच्या घटनापीठाने मांडलेली भूमिका हिंदू …
Read More »पराभव… तरीही महिलांना आरक्षण
दक्षिणेकडील राज्यांमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेबाबत नाराजी आहे, तर महिलांच्या अर्धवट राजकीय आरक्षणालाही विरोध आहे. त्यानंतरही गुरुवारी संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करण्यात आले. लोकसभा आणि राज्य विधानसभांमधील जागा वाढवण्यासाठीच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रस्तावामुळे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संघर्ष अटळ होता. तीन दिवसांच्या चर्चेनंतर, विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विजय झाला. सरकार एकतृतीयांश बहुमत निर्माण करू शकले. …
Read More »‘एल निनो’ चा ताप
भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे सांगत सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडेल असे अनुमान व्यक्त केल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.गेल्या 100 वर्षांतील बहुतांश भीषण दुष्काळ हे अल निनोच्या वर्षांतच पडले आहेत. 2002 मध्ये तर अल निनोमुळे पावसाचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक घटल्यामुळे देशातील 13 राज्यांमध्ये भीषण दुष्काळ जाहीर करावा लागला होता. हे लक्षात घेता मान्सूनच्या अंदाजांचा …
Read More »नोएडातील उद्रेकाच्या मुळाशी…
देशातील विविध औद्योगिक शहरांमध्ये सध्या कामगारांच्या असंतोषाचा ज्वालामुखी धुमसत असून नोएडातील हिंसक आंदोलनाने या गंभीर समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच विविध राज्यांतील औद्योगिक केंद्रांमध्ये कामगारांची निदर्शने सुरू होती, परंतु नोएडामध्ये झालेली दगडफेक, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेली झटापट याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा असंतोष केवळ स्थानिक कारणांपुरता मर्यादित नसून, त्यामागे वाढती महागाई, इंधन संकट …
Read More »‘चांद मेरा दिल’चे पोस्टर रिलीज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आपल्या आगामी ’चांद मेरा दिल’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले असून, या माध्यमातून एका नव्या कोऱ्या जोडीची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. अनन्या पांडे आणि अभिनेता लक्ष्य यांची ही जोडी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी करत …
Read More »सिनेशीर्षकांच्या बदलांमागे…
विलियम शेक्सपिअरने त्याच्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या जगप्रसिद्ध नाटकात ‘नावात काय आहे?’ असा प्रश्न विचारला होता. त्या नाटकाच्या संदर्भात त्याचे हे विधान कदाचित योग्यही असेल, परंतु चित्रपटसृष्टीच्या बाबतीत हे विधान अनेकदा चुकीचे ठरले आहे. कदाचित म्हणूनच निर्माते चित्रपटाच्या नावात जराही अशुभ संकेत दिसल्यास, ते नाव बदलण्यास भाग पाडतात. त्यामुळे निर्मितीपूर्वी चित्रपटाच्या नावावर मोठी कसरत केली जाते.- सोनम परब, अलीकडेच सलमान …
Read More »अझीम प्रेमजींच्या जीवनप्रवासातून काय शिकावे?
भारतीय उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे अझीम प्रेमजी हे यशस्वी उद्योजक आणि तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ओळखले जातात. यापलीकडे जाऊन ते महादानशूर म्हणूनही जगाला ते सुपरचित आहेत.आजच्या स्पर्धात्मक, वेगवान आणि अनेकदा गोंधळलेल्या जगात तरुणांनी नेमकी कोणती दिशा घ्यावी, याचे सूक्ष्म पण प्रभावी उत्तर त्यांच्या विचारांत सापडते. यशाची व्याख्या आज बहुधा पैशात, पदात किंवा प्रसिद्धीत मोजली जाते; मात्र प्रेमजी यांचा …
Read More »मुलांना क्रीम बिस्किट देताय ?
आपल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणीत हमखास असणारी क्रीम बिस्किट ही त्याकाळाप्रमाणे कधी तरी खावयाची गोष्ट न राहता आजच्या पिढीतील कित्येक मुलांसाठी तो रोजचा आहारघटक बनला आहे. पण ज्या क्रीमवर इतकं प्रेम केलं जातं ते खरोखरीच दुधापासून बनवलेले असते का, याची खातरजमा किती जण करतात? सध्या सोशल मिडियावर एक व्हायरल व्हिडिओ फिरत असून त्यामध्ये या तथाकथित ‘क्रीम’ विषयी आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी समोर …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र