इजिप्तच्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आजही पिरॅमिड, मकबरे व प्राचीन कलाकृतींच्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक कलाकृती म्हणजे 3,370 वर्षांपूर्वीच्या राणी नेफरतितीचा पुतळा. या पुतळ्याचा शोध लागल्यापासून तो जर्मनीतच आहे. एका इजिप्शियन पुरातत्त्वज्ञाने बर्लिनमध्ये असलेला हा राणी नेफरतितीचा अर्धपुतळा परत करण्याची मागणी केली आहे; तर जर्मनीने तसे करण्यास नकार दिला आहे. नेफरतिती प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि …
Read More »आयआयटी पासआऊट चिकन व्यवसायातून कोट्याधीश
तेलंगणाचा रहिवासी असलेल्या सैकेश गौडने आयआयटी वाराणसीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक 28 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगतात उत्तम भवितव्य असतानाही सैकेशच्या मनात स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याचे विचार घोळत होते. याच काळात त्याची भेट हेमाम्बर रेड्डी आणि मोहम्मद सामी उद्दीन यांच्याशी झाली. हेमाम्बर हे त्यावेळी भारतातील मांस उद्योगाचा अभ्यास करत …
Read More »रेल्वे दुर्घटनांची न संपणारी कहाणी
भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानले जाते. दररोज कोट्यवधी नागरिक या यंत्रणेवर विश्वास ठेवून प्रवास करतात. केंद्र सरकारकडून सध्या भारतीय रेल्वेला जागतिक दर्जाचे बनवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्याचे मोठे दावे केले जात आहेत. वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या रुळांवर धावत आहेत. मात्र, या चकचकाटाच्या मागे प्रवाशांच्या मूलभूत सुरक्षेचा प्रश्न कमालीचा गंभीर बनत चालला आहे. नुकत्याच देशाच्या विविध भागांत घडलेल्या रेल्वे दुर्घटना …
Read More »कहाणी ‘केंट’ काराची
केंट कंपनीचे प्रमुख डॉ. महेश गुप्ता यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात एका घरगुती समस्येतून झाली. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात दूषित पाणी प्यायल्यामुळे त्यांच्या मुलांना कावीळ झाली. स्वतः आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतलेले असल्याने, डॉ. गुप्ता यांनी या आजारपणाच्या मूळ कारणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्रांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, विरघळलेले हानिकारक घटक आणि जड धातू …
Read More »नीट पेपरफुटी प्रकरणाचे विदर्भात पडसाद
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता विदर्भातही वेगाने पोहोचला असून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील तपासाची व्याप्ती वाढविली आहे. नांदेड, लातूर, नाशिक आणि पुणे येथील कारवाईनंतर आता नागपूर आणि चंद्रपूर येथे छापे टाकण्यात आल्याने अमरावतीतही खळबळ उडाली आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशी समर्थक असलेले आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा कट पुण्यातील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी …
Read More »बोलबाला झुरळ पार्टीचा
होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. इंधनाचे दर फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल 40 ते 45 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे देशातील तेल कंपन्यांना दररोज 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. रुपयाचे मूल्य 96 पर्यंत घसरल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे. सरकारने अद्याप या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकलेला नाही, परंतु …
Read More »नीट,झोप आणि झुरळं…
देशात शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांचे जग आज इतके अस्थिर झाले आहे की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून झोप, स्थैर्य आणि भविष्यावरील विश्वास हळूहळू नाहीसा होत चालला आहे. नीट प्रश्नपत्रिका गळतीच्या घटनेने केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटीच उघड केल्या नाहीत, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि संधी यांच्यातील नातेसंबंध किती कमकुवत होत चालले आहेत, हेही स्पष्ट केले. सततच्या स्पर्धा, अपूर्ण झोप, मानसिक थकवा आणि व्यवस्थेवरील कमी …
Read More »आमिषाबाईंचे टीकास्र
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याच्या पिढीतील अभिनेत्रींवर आणि त्यांच्या प्रसिद्धी मिळवण्याच्या पद्धतींवर सडकून टीका केली आहे. अमिषाच्या मते, वर्षाला केवळ दोन साधारण चित्रपट केल्याने कोणीही सुपरस्टार होत नाही. तिने नमूद केले की, अनेक अभिनेत्री स्वतःकडे एकही एकल ब्लॉकबस्टर चित्रपट नसताना केवळ प्रसिद्धी माध्यमांचा (पीआर) वापर करून स्वतःला मोठे स्टार म्हणून मिरवत आहेत. अमिषाने ‘एक्स’वर पोस्ट करत स्पष्ट …
Read More »सिनेमा ते राजकारण
दक्षिण भारताच्या राजकारणात सिनेमा आणि सत्तेचे नाते अनेक वर्षांपासून आहे. लोकप्रियतेपलीकडे जात ते सामाजिक भावनांशी, प्रादेशिक अस्मितेशी आणि जनमानसाच्या मानसिकतेशी घट्ट जोडलेले राहिले आहे. पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा नायक, गरीबांचा तारणहार किंवा जनतेसाठी जीव धोक्यात घालणारा नेता ही प्रतिमा दक्षिणेतील प्रेक्षकांनी कमालीची उचलून धरताना अनेकदा त्या प्रतिमेलाच त्यांनी वास्तवातील नेतृत्व मानले. त्यामुळेच दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीतून थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचणाऱ्या नेत्यांची परंपरा …
Read More »दहावीनंतरचा मार्ग निवडताना…
दहावीचा टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचे वळण येते. हा काळ केवळ शालेय शिक्षण संपल्याचा नसून, भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीची पायाभरणी करण्याचा असतो. अनेकदा विद्यार्थी आणि पालक केवळ गुणांच्या आधारावर किंवा मित्रमैत्रिणींच्या प्रभावाखाली यूेन शाखेची निवड करतात, परंतु ही पद्धत भविष्यात अडचणीची ठरू शकते. त्यामुळे दहावीनंतरचा मार्ग निवडताना अत्यंत सजग राहणे आणि सर्व उपलब्ध पर्यायांचा सखोल विचार करणे आवश्यक …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र