माणूस नेमका कोणत्या वयात सर्वाधिक सुंदर दिसतो, विशीतले भरले तारुण्य अधिक आकर्षक असते की तिशीतली प्रगल्भता, हा प्रश्न पिढ्यानपिढ्या चर्चिला जात आहे. अनेकांना असे वाटते की विशीतील वय हे सौंदर्याचे शिखर आहे, मात्र त्वचातज्ज्ञांनी आता यावर विज्ञानाच्या आधारे एक वेगळाच प्रकाश टाकला आहे. वाढत्या वयासोबत व्यक्ती अधिक सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण कशी दिसू शकते, याचे गुपित उलगडताना तज्ज्ञ सांगतात की, विशीपेक्षाही …
Read More »मंगळ का पडला कोरडा ?
आपल्या शेजारचा लाल ग्रह ‘मंगळ’ नेहमीच खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा बनून राहिलेला आहे. या ग्रहावर एकेकाळी वाहते पाणी होते, नद्या-सरोवरे होती, हे आता सिद्ध झालेले आहे. मग हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न पडतो. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे तेथील खडकांनी स्पंजाप्रमाणे हे पाणी शोषून घेतले, हे असल्याचाही दावा काही संशोधकांनी केलेला आहे. मंगळाची सध्याची भूमी ओसाड, गोठलेली आणि …
Read More »गरिबीवर मात करत ऐतिहासिक कामगिरी
आंध्रमधील विझियानगरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी जागतिक क्रीडा नकाशावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एका शेतमजूर पित्याच्या या मुलींनी सामोआ येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांवर नाव कोरून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. बेलना हारिका आणि बेलना भार्गवी अशी या दोन सुवर्णकन्यांची नावे असून, त्यांच्या यशाने प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात …
Read More »महिला सुरक्षिततेपुढील गंभीर आव्हाने
नवी दिल्लीतील नबी करीम परिसरातून नुकतीच एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे अक्षता पडल्याला अद्याप आठवडाही पूर्ण झाला नव्हता, तोच एका नवविवाहितेची हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह पलंगाच्या पेटीत लपवून आरोपी पती फरार झाला. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून ती आपल्या समाजातील प्रगत मानसिकतेच्या दाव्यांवर पडलेली एक मोठी चपराक आहे. या …
Read More »चीनी धोरणाबाबत लवचिकपणा का?
एकीकडे पंतप्रधान भारतीयांना आयात कमी करण्याबाबत आवाहन करत असताना त्यांच्याच सरकारने चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीबाबत अलीकडे घेतलेला निर्णय धक्कादायक ठरणारा आहे. सरकारने चीनसह भू-सीमा असलेल्या शेजारी देशांकडून येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजेच एफडीआयला निवडक 40 उत्पादन उपक्षेत्रांमध्ये 60 दिवसांच्या आत मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘प्रेस नोट 3’नंतर चीनमधील गुंतवणुकीवर कडक निर्बंध आले होते. गलवान संघर्षानंतर …
Read More »मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांच्या ताफ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्याचा आकार मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन …
Read More »विपर्यास नको, सहभाग हवा!
होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. इंधनाचे दर फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल 40 ते 45 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे देशातील तेल कंपन्यांना दररोज 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. रुपयाचे मूल्य 96 पर्यंत घसरल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे. सरकारने अद्याप या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकलेला नाही, परंतु …
Read More »आर्थिक दरी आणि भविष्याची चिंता
दुरावत चाललेल्या समाजात आशेचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. आपल्या आजूबाजूला इतक्या विरोधाभासी गोष्टी एकाच वेळी घडताना दिसतात की समाज नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, हा प्रश्न सतत पडत राहतो. एका बाजूला विकासाचे दावे, वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी आणि आधुनिकतेच्या चमकदार कथा आहेत; तर दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यासाठी झगडणारा सामान्य माणूस, नोकरीची असुरक्षितता, वाढती आर्थिक दरी आणि भविष्याबद्दलची …
Read More »तापसी बनली ब्रँड ॲम्बसेडर
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूची आता ‘इनॅमर’ या नामांकित ब्रँडच्या नवीन मोहिमेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. महिलांच्या फॅशन आणि अंतर्वस्त्र निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीने तापसीसोबतच्या या नव्या सहकार्याची घोषणा केली आहे. या मोहिमेद्वारे महिलांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि आधुनिकतेचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तापसी पन्नू तिच्या धाडसी आणि हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘इनॅमर’च्या मते, तापसीचे …
Read More »‘प्रौढपटांचे’ सुवर्णयुग
भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात काही काळापूर्वीपर्यंत ’ए’ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी असलेले प्रमाणपत्र लाभलेला चित्रपट म्हणजे एक संकुचित, वादग्रस्त आणि मुख्य प्रवाहापासून तुटलेला विषय मानला जायचा. अशा चित्रपटांच्या नावाभोवती अलीलता किंवा टोकाच्या हिंसेचे वलय असायचे, ज्यामुळे सामान्य प्रेक्षक चित्रपटगृहात जाण्यास कचरत असे. कुटुंबासोबत बसून असे चित्रपट पाहणे तर दूरची गोष्ट, पण अशा चित्रपटांचे नाव काढणेही टाळले जाई. मात्र, काळाच्या ओघात समाजमनाची संवेदनशीलता …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र