लेख-समिक्षण

कारकिर्दीच्या उत्कर्षात नवसंशोधनाचं महत्त्व

आधुनिक व्यावसायिक जगताचा वेग प्रचंड आहे. तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि वाढती जागतिक स्पर्धा यांमुळे नोकरीच्या बाजारपेठेचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. अशा काळात केवळ पदवी असणे किंवा साचेबद्ध पद्धतीने काम करत राहणे दीर्घकालीन यशाची हमी देऊ शकत नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आणि कारकिर्दीत सातत्याने प्रगती करण्यासाठी ‌‘नवसंशोधन‌’ (इनोव्हेशन) आणि कल्पकता ही सर्वात …

Read More »

गर्भारकाळात प्रवास करताय ?

गर्भारपणात प्रवास करावा की नाही, हा प्रश्न प्रत्येक होणाऱ्या मातेच्या मनात असतो. जुन्या काळी गर्भवती स्त्रियांना घराबाहेर पडण्यास मनाई केली जात असे, मात्र आजच्या आधुनिक जीवनशैलीत आणि प्रगत वाहतूक व्यवस्थेमुळे गर्भारपणातील प्रवास पूर्वीपेक्षा सुलभ झाला आहे. तरीही, प्रवासाचे नियोजन करताना स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची सुरक्षितता लक्षात घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रवासासाठी वाहनाची निवड करणे हा सुरक्षिततेचा पहिला टप्पा आहे. स्वतःची …

Read More »

प्राणीही होतात ‌‘टल्ली‌’

मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे; पण तरीही अनेक जण त्याच्या आहारी जातात. पण, एका संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, माणूसच नाही, तर प्राणीदेखील नशा करतात. आफ्रिकेच्या जंगलातील याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आफ्रिकेच्या जंगलातून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये जंगलातील प्राणी धुंद अवस्थेत पाहायला मिळाले. जंगलातील एका खास झाडाची फळे खाल्ल्यानंतर हे सर्व प्राणी नशेत टल्ली होतात, असे …

Read More »

वयाहून मोठे यश

शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इंदूरच्या सुषमा प्रदीप मोघे यांनी हे वाक्य प्रत्यक्षात उतरवत नकारात्मक विचार करणाऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी संपादित केलेले यश देशभरातील तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेने आपल्या जिद्दीच्या जोरावर एम. ए. मराठी साहित्य या पदव्युत्तर अभ्यासक्रमात थेट विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले …

Read More »

पारदर्शकतेला खिंडार

अयोध्येतील श्र्ीराम मंदिरातील दानपेट्यांमधील देणग्यांच्या रकमेत झालेल्या कथित अपहाराच्या प्रकरणाने देशभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर आणि अनेक पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर उभे राहिलेले श्रीराम मंदिर हे हिंदू समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराशी संबंधित कोणतीही अनियमितता ही केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून पाहता येत नाही. ती थेट भाविकांच्या विश्वासाशी जोडलेली बाब ठरते. म्हणूनच …

Read More »

सशस्त्र दलांतील महिलाराज

अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद घटना घडली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) पहिल्या महिला तुकडीतील 14 कॅडेटस्‌‍नी कठोर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्कर आणि हवाई दलात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवला. महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय सैन्य व्यवस्थेतील हा बदल केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून देशातील सामाजिक परिवर्तनाचेही …

Read More »

शिवसेनेत तिसरी फूट

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात षडयंत्र पूर्णत्वास नेण्यात आले, त्याला आठवडाही होत नाही, तोच महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‌‘ऑपरेशन टायगर‌’ अखेर यशस्वी करण्यात आले. पॅटर्न तोच होता. आधी पक्षातून फुटायचे, मग बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी करायची आणि लोकसभा …

Read More »

अन्वयार्थ फुटीचा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ‌’ऑपरेशन टायगर‌’ची चर्चा ही अफवा नव्हती तर, एक वास्तव होते हे बुधवारी सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेमध्ये स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसांच्या कालावधीत म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी होतील …

Read More »

चिरंतन सौंदर्याचा ध्यास

मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच कायम तरुण आणि देखणे दिसण्याची इच्छा माणसाच्या मनात राहिली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राचीन काळातील नैसर्गिक उपचारांपासून ते आधुनिक काळातील विज्ञान, औषधोपचार आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता सौंदर्याचा एखादा कायमस्वरूपी तोडगा लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 19 व्या शतकापासूनच विज्ञान या प्रश्नाचे …

Read More »

‌‘बंटवारा‌’साठी आमीरचा पुढाकार

आमिर खान, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या बहुप्रतीक्षित ‌‘लाहोर 1947‌’ या चित्रपटाच्या शीर्षकात (टायटल) मोठा बदल करण्यात आला असून, आता हा चित्रपट ‌‘बंटवारा‌’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शीर्षकाचे हक्क मिळवण्यासाठी स्वतः निर्माता आमिर खानने घेतलेल्या पुढाकारामुळे हा महत्त्वपूर्ण बदल शक्य झाला आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‌‘लाहोर 1947‌’ असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, एका …

Read More »