लेख-समिक्षण

संपादकीय

औरंगजेबाचं राजकारण

संभाजीनगरपासून काही अंतरावर खुलताबाद येथे असणार्‍या औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटानंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम शासक होता, असे विधान केल्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. भाजपचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका, …

Read More »

‘फुंकर’जखमेवर

तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्या किंवा फाटलेले रबर-प्लॅस्टिकचे बूट दुरुस्त करणारे लोक अगदी परवा-परवापर्यंत दिसत होते. रस्त्याकडेला बसून हे लोक प्लास्टिकच्या वस्तूला पडलेल्या भेगांमध्ये गरम प्लॅस्टिक भरून देत असत. अगदीच वाया जाण्याऐवजी ती वस्तू आणखी काही दिवस उपयोगाला येत असे. लोखंडी हत्यारं शेगडीत गरम करून प्लॅस्टिकचे तुकडे तापवले जात असत आणि त्या रसायनाने वस्तूच्या ‘जखमा’ भरल्या जात असत. कल्पना करा, हेच टेक्निक …

Read More »

मेलेली मने

ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारकांमुळे सोलापूरने स्वातंत्र्य प्राप्त केल्याचा इतिहास आजही जिवंत आहे. क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या या शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. वस्त्रोद्योगामुळे सोलापूर हे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही ज्वलंत विषयावर पेटून उठण्याची येथील मानसिकता त्यावेळच्या लोकांमध्ये होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे वैभव आणखी वाढण्याऐवजी आता उतरतीला लागले आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर आणि परिसरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. काही …

Read More »

चर्चेत ‘हंता’

एकाच दिवसात किंवा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या काही दुर्मिळ, मोजक्या घटना आपल्या पाहण्यात असतात. काहीजण या घटना दुर्दैवी मानतात तर काहीजण अशा घटनांमध्ये पती-पत्नीमधील घट्ट बंध शोधतात. अपघातात पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक असतात; परंतु आजारपणामुळं किंवा कधी-कधी तर कोणताही आजार नसताना अशा घटना घडतात. पतीवर अंत्यसंस्कार करून लोक परत येईपर्यंत पत्नीचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं पाहायला मिळतात. …

Read More »

विरोधकांचे दमन

लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधक हे जनतेचा आवाज असतात. सत्ताधार्‍यांना वठणीवर आणून जनतेची कामे मार्गी लावण्यामध्ये विरोधकांचे योगदान महत्त्वाचे असते. अलीकडे निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय योजनांची घोषणा केली जाते. आश्वासनांना भुलून मतदार एका पक्षाला सत्तेवर आणतात. परंतु, सत्तेवर आले की निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधारी पक्षांना विसर पडतो. निवडणूक प्रचारात आश्वासने देण्यासाठी असतात ती पाळण्यासाठी नसतात, असे भाजपच्या आमदारांनीच केलेले विधान चर्चेत राहिले होते. …

Read More »

अनाकलनीय यंत्रभाषा

अखेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …

Read More »

थरुर यांची खदखद

केंद्रात आणि बहुतांश राज्यांतील सत्ता हातातून गेल्यानंतर गांधी कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातूनच आव्हान देणार्‍यांची संख्या वाढली आहे. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी आजारी असताना कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ व सक्षम अध्यक्ष मिळावा म्हणून उठाव केला होता. त्यावेळी हा विषय काँग्रेस पक्षामध्ये फारच गाजला होता. उठाव केलेल्या नेत्यांना नोटिसा पाठविल्या गेल्या. परंतु, त्यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल …

Read More »

तंत्रज्ञान गुद्द्यांवर!

खेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …

Read More »

आव्हाने नव्या प्रदेशाध्यक्षांपुढील

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा निवडून आल्यानंतर हवेत असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जोरदार आपटले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नाना पटोले यांनी आपल्याला अध्यक्षपदावरुन मुक्त करावे, असे काँग्रेस नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या भेटी घेऊन सांगितले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे लांबणीवर टाकले. दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. …

Read More »

शिणवठ्याचं चक्र

माणसाचं काम हलकं करण्यासाठी, त्याला अधिक सुख देण्यासाठी मशीन रोज ‘अपडेट’ होत राहिलं. आता तर मशीन माणसासारखंच जगू लागलंय. तरीसुद्धा माणसाला माणसासारखं का जगता येत नाहीये? मशीनचा माणूस होत असताना माणूस मशीनसारखा का होत चाललाय? अनेक माणसांचं काम एकच मशीन करतंय, तर माणसाचं काम डिप्रेशन येण्याइतकं का वाढतंय? त्याच्याकडून कधी आठवड्याला सत्तर तास तर कधी नव्वद तास कामाची अपेक्षा का …

Read More »