लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधक हे जनतेचा आवाज असतात. सत्ताधार्यांना वठणीवर आणून जनतेची कामे मार्गी लावण्यामध्ये विरोधकांचे योगदान महत्त्वाचे असते. अलीकडे निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय योजनांची घोषणा केली जाते. आश्वासनांना भुलून मतदार एका पक्षाला सत्तेवर आणतात. परंतु, सत्तेवर आले की निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधारी पक्षांना विसर पडतो. निवडणूक प्रचारात आश्वासने देण्यासाठी असतात ती पाळण्यासाठी नसतात, असे भाजपच्या आमदारांनीच केलेले विधान चर्चेत राहिले होते. …
Read More »संपादकीय
अनाकलनीय यंत्रभाषा
अखेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …
Read More »थरुर यांची खदखद
केंद्रात आणि बहुतांश राज्यांतील सत्ता हातातून गेल्यानंतर गांधी कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातूनच आव्हान देणार्यांची संख्या वाढली आहे. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी आजारी असताना कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ व सक्षम अध्यक्ष मिळावा म्हणून उठाव केला होता. त्यावेळी हा विषय काँग्रेस पक्षामध्ये फारच गाजला होता. उठाव केलेल्या नेत्यांना नोटिसा पाठविल्या गेल्या. परंतु, त्यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल …
Read More »तंत्रज्ञान गुद्द्यांवर!
खेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …
Read More »आव्हाने नव्या प्रदेशाध्यक्षांपुढील
लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा निवडून आल्यानंतर हवेत असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जोरदार आपटले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नाना पटोले यांनी आपल्याला अध्यक्षपदावरुन मुक्त करावे, असे काँग्रेस नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या भेटी घेऊन सांगितले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे लांबणीवर टाकले. दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. …
Read More »शिणवठ्याचं चक्र
माणसाचं काम हलकं करण्यासाठी, त्याला अधिक सुख देण्यासाठी मशीन रोज ‘अपडेट’ होत राहिलं. आता तर मशीन माणसासारखंच जगू लागलंय. तरीसुद्धा माणसाला माणसासारखं का जगता येत नाहीये? मशीनचा माणूस होत असताना माणूस मशीनसारखा का होत चाललाय? अनेक माणसांचं काम एकच मशीन करतंय, तर माणसाचं काम डिप्रेशन येण्याइतकं का वाढतंय? त्याच्याकडून कधी आठवड्याला सत्तर तास तर कधी नव्वद तास कामाची अपेक्षा का …
Read More »स्वागतार्ह पाऊल
राजकीय गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीचे होत असलेले वस्त्रहरण थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला यासंदर्भात जाब विचारुन लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद आणि विधानसभांच्या स्वच्छतेसाठीचे स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. देशातील खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी प्रकरणे तातडीने निकाली निघावी आणि दोषी नेत्यांवर आयुष्यभर निर्बंध लादण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली …
Read More »अमरपट्ट्याची विक्री
सर्वांत प्रगत आणि किफायतशीर चॅटबॉट कुणाचा, यावरून ओपन एआय आणि चीनचे डीपसीक यांच्यात संघर्ष सुरू असण्याच्या काळातसुद्धा मानवजातीच्या इतिहासातलं सर्वांत जुनं वास्तव बदललेलं नाही. ते म्हणजे, पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात गुंतागुंतीचं, आश्चर्यजनक आणि अमूल्य यंत्र म्हणजे मानवी शरीर. मानवी जीवनात प्रत्येक वस्तूला पर्याय देता येईल; पण मानवी शरीराला पर्याय नाही. हे यंत्र बिघडलं तर दुरुस्त होऊ शकतं; पण संपलं की त्याचं …
Read More »झोपडपट्टयांची मुंबई
मुंबई कोणाला कधीच उपाशी झोपू देत नाही, असे म्हणतात. अनेक स्वप्ने उराशी बाळगलेले बेरोजगारांचे लोंढे देशाच्या कानाकोपर्यातून मुंबईत येतात. ग्रामीण भागातून मुंबईत येण्याचा ओघ वाढल्याने मुंबईची बजबजपुरी झाली आहे. अनधिकृत झोपड्यांमुळे मुंबई समस्यांचे आगर बनले आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांसाठी मुंबईतल्या झोपडपट्ट्या म्हणजे बेकायदा वसुलींचे ‘एटीएम’च बनले आहे. कधीही जा आणि मनमानी वसुली करा, असा अधिकार्यांचा दृष्टिकोन इथल्या …
Read More »अर्धा हिस्सा
नातीगोती वगैरे खरोखर अस्तित्वात असतात, की गरज ठरवून त्यानुसार जोडली जातात? एकत्र कुटुंबपद्धतीपासून ‘सेल्फ मॅरेज’ म्हणजे स्वतःशीच लग्न करण्याच्या अजब निर्णयापर्यंत बरीच स्थित्यंतरं आपण पाहिली. या प्रवासात माणसाला अधिकाधिक एकटं आणि आत्मकेंद्री होताना आपण पाहिलं. शहरांकडे होणार्या स्थलांतरांमुळं सुरुवातीच्या काळात या विभक्तपणाचा आपण ‘अपरिहार्यता’ म्हणून स्वीकार केला. मग जास्तीत जास्त आमदनी आणि कमीत कमी जबाबदारी असणार्या नवश्रीमंतांची नवी जीवनशैली म्हणून …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र