लेख-समिक्षण

संपादकीय

दिलासा देणारा निकाल

वक्फ (सुधारणा) कायदा-२०२५च्या घटनात्मक वैधतेवर अखेर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांनंतर अंतरिम निकाल दिला. या कायद्यात करण्यात आलेल्या दोन वादग्रस्त सुधारणा न्यायालयाने स्थगित केल्या. तसेच वफ बोर्डावर मुस्लिमांचेच वर्चस्व राहील असा निर्णय दिला. वफ बोर्डात गेली किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचे पालन केलेल्या व्यक्तीच्या नियुक्ती संदर्भातील तरतुदीचा समावेश आहे. घटनात्मकतेची रूपरेषा सांगणारा संपूर्ण कायदा स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला. वफ …

Read More »

साक्षरतेतील भरारी

भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये साक्षरतेचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक धोरणाशी निगडित मुद्दा नसून तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आयामांशी जोडलेला आहे. अलीकडेच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत साजर्‍या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या कार्यक्रमाने या प्रश्नाला पुन्हा एकदा अधोरेखित केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या वेळी जाहीर केलेली आकडेवारी देशासाठी अत्यंत …

Read More »

अधिकारी संवेदनशील का नसतात?

कोणत्याही बांधकाम स्थळी सुरक्षेची खात्री करणे ही सर्वात मूलभूत जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात तिथे उपस्थित अधिकारी किंवा कर्मचारी या जबाबदारीबाबत सजग आणि संवेदनशील का नसतात, हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला उघडे ठेवलेले गटार, खड्डे किंवा मॅनहोल यात जर एखादा व्यक्ती चुकून पडला तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात असे खड्डे वा गटार पाण्याने भरून जातात आणि त्यांचा …

Read More »

दिलासा कर्करोगावरील लसीचा

र्करोगाविरोधातील लढाईत जगाला आता एका महत्त्वाच्या शोधाची आशा दिसू लागली आहे. रशियातील शास्त्रज्ञांनी कर्करोगासाठी लस तयार केल्याचा दावा केला असून तिचा पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. या नव्या घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. रशियाने तयार केलेल्या या नव्या लसीचे नाव एंटरॉमिस असे असून ती एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्राथमिक …

Read More »

औद्योगिक क्षेत्रात भरारी घ्यायची तर…

भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्या दिशेने खर्‍या अर्थाने वाटचाल करायची असेल, तर केवळ वाढीचे टक्केवारी दाखवणारे आकडे किंवा अल्पकालीन उद्दिष्टे पुरेशी ठरणार नाहीत. औद्योगिक उत्पादनात शाश्वत गती निर्माण करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील आणि नव्या शयता उघडाव्या लागतील. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन ३.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे गेल्या चार …

Read More »

सेमीकंडक्टर क्रांतीचे अवकाश

भारताने सेमीकंडटर क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. इस्रोच्या सेमीकंडटर लॅबमध्ये भारताचा पहिला पूर्णतः स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर विकसित करण्यात यश आले आहे. ‘मेड इन इंडिया’ या पहिल्या चिपचे उत्पादन गुजरातमधील साणंद येथील पायलट प्लांटमध्ये सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत तब्बल १८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या दहा सेमीकंडटर प्रकल्पांवर देशात काम सुरू आहे. त्यापैकी एक प्रकल्प पंजाबमधील मोहाली येथे …

Read More »

ग्राहकहितैषी निर्णय

शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये हॉटेल-रेस्तराँमध्ये जाऊन जेवणे हा आजकालच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. कुटुंबीय वा मित्रांसोबत बाहेर खाणे ही केवळ सामाजिक सवय नसून प्रतिष्ठेची बाब मानली जाते. परंतु या प्रवृत्तीचा फायदा घेत अनेक महागडे रेस्तराँ आपल्या मनमानी पद्धतीने दर ठरवतात. जेवणातील पदार्थांच्या मूळ किंमतीपेक्षा बरेच जास्त पैसे आकारणे ही आधीच ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारी बाब आहे. त्यातही एकूण खर्चावर आणखी वेगळा …

Read More »

‘टिकटॉक’ परतणार?

टिकटॉकची भारतात पुन्हा एंट्री होणार का, याबाबतच्या चर्चा अलीकडेच जोर धरू लागल्या आहेत. असा दावा केला जात आहे की, भारतात या अ‍ॅपवरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते. मात्र, चीनी अ‍ॅपवरील बंदी इतया सहजपणे उठणार नाही. यात अनेक आव्हाने आहेत. टिकटॉक पुन्हा चर्चेत का आले? : खरं तर, टिकटॉकची वेबसाइट भारतात पुन्हा सुरू होऊ लागली. यानंतर सोशल मीडियावर ही अफवा पसरली …

Read More »

जलतांडवाच्या झळा

हवामानाची स्वतःची एक गती असते आणि सामान्य परिस्थितींमध्ये तो परिसंस्थेच्या चक्राला टिकवून ठेवण्याचा एक आवश्यक भाग असतो. पण गेल्या काही काळापासून हवामानाच्या चक्रात झपाट्याने बदल नोंदवला जात आहे. विशेषतः पावसामुळे होणार्‍या तडाख्यांमुळे स्थिती चित्र अधिकच बिघडत चालली आहे. प्रत्येक वर्षी संपूर्ण मान्सूनच्या हंगामात पावसामुळे देशाचे बहुतेक भाग कमीअधिक प्रमाणात प्रभावित होतात, पण आता आपत्तींची एक अखंड मालिकाच सुरू झाल्यासारखी स्थिती …

Read More »

जिनोम सिक्वेन्सिंग मिशनच्या अंतरंगात..

भारतामध्ये लाखो लोक दुर्लभ आजारांनी त्रस्त आहेत. हे आजार बहुतांश वेळा अनुवंशिक म्हणजे आपल्या जनुकांमधील बदलांमुळे होतात. डॉटर आणि वैज्ञानिक सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या जनुकामध्ये बदल झाला (त्याला म्युटेशन म्हणतात) तर त्याचा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो. आपल्या देशात बहुतेक ठिकाणी लोक आपल्याच जात, धर्म किंवा समुदायामध्ये विवाह करतात. यामुळे नवीन रक्तसंबंध येत नाहीत आणि त्या समुदायामध्ये काही ठराविक …

Read More »