लेख-समिक्षण

संपादकीय

‘टीम इंडिया’ गरजेचीच

जून महिन्यामध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय क्रिकेट संघाची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर करत असतानाच राजधानी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाची बैठक होऊन या बैठकीत पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यांनी आणि केंद्र सरकारने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्व राज्यांना केंद्र सरकारच्या साथीने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करण्याचे आवाहन केले असले, तरी …

Read More »

बाटलीतलं भूत

भस्मासुराला वर देणं आत्मघातकी ठरतं, हे आपल्याला पुराणकथेमधून समजलेलं आहे. परंतु तरीही आधुनिक काळात आपण असंख्य भस्मासुर जन्माला घातले; पोसले. नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणं म्हणजे मानवजातीच्या कल्याणाला विरोध करणं, ही आधुनिक अंधश्रद्धा थोडा वेळ दूर ठेवून विचार करून काही प्रश्न आता आपल्याला पडायलाच हवेत. त्यातील महत्त्वाचा प्रश्न असा, की आधुनिक तंत्रज्ञानाने खरोखर अखिल मानवजातीचं कल्याण होतंय की मूठभरांचं उखळ पांढरं …

Read More »

विज्ञानयुगातील दीपस्तंभ

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असून खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे कार्य कायम स्मरणात राहील. डॉ. नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे एक थोर भौतिकशास्त्रज्ञ …

Read More »

दंड झाले उदंड

वाहतुकीचा एकही नियम कधीच मोडला नाही, अशी व्यक्ती शोधून सापडेल का? जाणूनबुजून नसेल; पण नकळत का होईना आपल्या हातून कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या नियमाचं उल्लंघन होतंच. आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, असा विवेकी विचार प्रत्येकानं केला असता तर नियम आणि कायद्यांची गरजच उरली नसती. रस्त्यांवरच्या अपघातांत दरवर्षी किती …

Read More »

उपहासमर्यादेची आठवण

हास्य हा उत्स्फूर्त मानवी भावनाविष्कार आहे. मानवी जगणे आनंददायी बनण्यासाठी हास्य ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. पण आपल्याला किंवा इतरांना हसू यावे यासाठी एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा, परिस्थितीचा समाजघटकाचा किंवा ओळखीचा उपमर्द करणे, अवहेलना करणे किंवा अश्लील शेरेबाजी करणे याचा अधिकार कोणालाही दिलेला नाहीये. ही बाब आपल्या कुटुंबाच्या आणि भवतालातल्या संस्कारांमधून मनावर आपोआपच रुजलेली असते. सुसंस्कृत समाजात लोकांमध्ये याबाबतची जाण महत्त्वाची असते. …

Read More »

अंतरिक्षातील पहारेकरी

‘घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी,’ हे संत जनाबाईंचे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. आधुनिक काळात या शब्दांची आठवण करून देतात ते आपण अवकाशात सोडलेले उपग्रह. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, भूस्थिर कक्षेत काम करणारे हे उपग्रह आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं खूप मोलाची जबाबदारी पार पाडतात. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव आपण सध्या अनुभवतो आहोत. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने अचूक हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. शत्रूची …

Read More »

ऑपरेशन सिंदूरचे वैशिष्ट्य

‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कारवाईबाबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच माहितीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे. या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, हवाई दलातील अधिकारी व्योमिका सिंह आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी उपस्थित राहून जनतेसमोर अधिकृत माहिती मांडली. हे तिघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी अधिकारी असून, त्यांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत …

Read More »

‘झुकानेवाला’ आहेच!

झुकेगा नही…’ असं म्हणणार्‍या भल्याभल्यांना झुकवणारा कुणी ना कुणी असतोच. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ असा बाणा असलेल्यांचा कणा कुणासमोर तरी लवचिक होतोच. सध्या आपापली बाजू त्वेषानं लावून धरण्याचे, त्यासाठी प्रसंगी एकमेकांना बोचकारण्याचे आणि मुख्यत्वे, हार न मानण्याचे दिवस आहेत. त्यामुळं कुणी कुणासमोर सहजासहजी झुकत नाही. ‘तुझं थोडं, माझं थोडं’ असं म्हणून हातात हात घालून पुढं जाण्याचं शहाणपण आपल्यातून नामशेष होईल …

Read More »

चतुरस्र विज्ञानयात्री

भारताच्या अवकाश विज्ञान क्षेत्राला आंतरराष्ट्रीय उंचीवर नेणार्‍या डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन या विज्ञानयात्रीची प्राणज्योत नुकतीच मालवली. 1994 ते 2003 या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष म्हणून काम करताना डॉ. कस्तुरीरंगन यांनी भारताचा अंतराळ कार्यक्रम आत्मनिर्भरतेकडे गेला. पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल चं यशस्वी प्रक्षेपण आणि जीसॅट मालिका उपग्रहांच्या माध्यमातून कम्युनिकेशन क्षेत्रातील क्रांती, ही याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आयआरएस …

Read More »

बाळ एक,जन्म दोनदा!

एकाच जन्मात पुन्हा जन्माला येण्याची इच्छा कुणाला नसते? मुठीतून वाळू घसरत जावी, तसं आयुष्य हातातून निसटून जात असतं आणि योजलेल्या अनेक गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत. अनेक गोष्टी थोडक्यात हुकतात. कर्तृत्व असूनही यश हुलकावणी देत राहतं. अशा वेळी प्रत्येकाला वाटतं, आयुष्य पुन्हा पहिल्यापासून सुरू करता आलं तर..! परंतु आपण निसर्गनियमाच्या विरोधात जाऊ शकत नाही. मागे वळू शकत नाही आणि आहे …

Read More »