भारतातील आरोग्य व्यवस्था ही अनेक आव्हानांनी ग्रासलेली आहे. त्यात सर्वाधिक गंभीर आणि धोकादायक बाब म्हणजे बनावट डॉक्टरांचे वाढते प्रमाण. ग्रामीण भागांपासून ते शहरांतील झोपडपट्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणी वैद्यकीय शिक्षण, परवाना किंवा पात्रता नसलेले लोक ‘डॉक्टर’ म्हणून रुग्णांवर उपचार करताना आढळतात. या प्रकारामुळे रुग्णांचे आरोग्य, जीवन आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था धोक्यात येते आहे. बनावट डॉक्टरांविषयी अनेकदा चिंता व्यक्त केली गेली आहे. मात्र …
Read More »संपादकीय
तपासाची ‘दशा ’
एखादी व्यक्ती बेपत्ता होते. बरीच वर्षं तिचा शोध लागत नाही. अखेर ती या जगात नाही, असं सगळे मानू लागतात… आणि अनेक वर्षांनंतर ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येतं. नाटक-सिनेमासाठी ही कथा ठीक आहे; पण प्रत्यक्षातही अशा काही घटना घडल्या आहेत. अर्थात, ज्याकाळी संपर्कमाध्यमं अत्यल्प होती, त्या काळात अशा घटना पाहायला मिळतात. विशेषतः युद्धावर गेलेला एखादा सैनिक बेपत्ता झाल्यास तो मरण …
Read More »कर्जमाफीला ठेंगा
शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात वर केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारवासारवीचे प्रयत्न चालू झाले आहेत. यंदा आणि पुढच्या वर्षी देखील शेतकर्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे आता अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. महायुतीच्या नेत्यांनी ठिकठिकाणी जाहीर सभा घेताना देखील …
Read More »संयम बेपत्ता
आपल्या आईसमोरच नवर्याला बदडणार्या बायकोचा व्हिडिओ पाहिलात? ‘मी अजमल कसाबचा भाऊ बोलतोय,’ असं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देणार्या मद्यपी सुरक्षा रक्षकाची बातमी वाचलीत? हैदराबादजवळच्या अमीनपूरमध्ये स्वतःच्या तीन मुलांचा गळा दाबून खून करणार्या आईबद्दल तुम्हाला कळलंय? पत्नी मुलांना भेटू देत नाही, फोनवर बोलूही देत नाही म्हणून पाळण्याच्या दोरीनेच फास लावून घेणारा यवतमाळचा संदीप आडे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही दिवशीचं वर्तमानपत्र उघडा. …
Read More »कोण बनणार पक्षाध्यक्ष?
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उत्तराधिकार्याचा शोध जवळपास एक वर्षापासून चालू आहे. 2023 मध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर नड्डा यांना लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने मुदतवाढ मिळाली होती. नड्डा यांची जागा कोण घेणार, याचा शोध चालू असतानाच त्यांना 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिपदही देण्यात आले. साहजिकच ‘एक व्यक्ती एक पद’ हे सूत्रदेखील बासनात गुंडाळून ठेवण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार …
Read More »ऑपरेशन ‘आत्मघात ’
सिनेमात अनेक अतार्किक प्रसंग पाहायला मिळतात. किंबहुना तर्कसंगत नसल्यामुळंच ते अधिक मनोरंजक बनतात. अशा तर्कशून्यतेविषयी व. पु. काळे एका कथेत म्हणतात, ‘हिरोने आरशात बघून स्वतःच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन केलं, असं जरी दाखवलं असतं तरी मी विश्वास ठेवला असता.’ आधीच वास्तवापासून दूर असलेल्या प्रसंगावर केलेली ही अतिशयोक्ती. म्हणजे वास्तवापासून आणखी दूर! परंतु आरशात बघून नव्हे, तर चक्क यू-ट्यूबवर बघून माणसं स्वतःचं …
Read More »औरंगजेबाचं राजकारण
संभाजीनगरपासून काही अंतरावर खुलताबाद येथे असणार्या औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटानंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम शासक होता, असे विधान केल्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. भाजपचे सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका, …
Read More »‘फुंकर’जखमेवर
तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्या किंवा फाटलेले रबर-प्लॅस्टिकचे बूट दुरुस्त करणारे लोक अगदी परवा-परवापर्यंत दिसत होते. रस्त्याकडेला बसून हे लोक प्लास्टिकच्या वस्तूला पडलेल्या भेगांमध्ये गरम प्लॅस्टिक भरून देत असत. अगदीच वाया जाण्याऐवजी ती वस्तू आणखी काही दिवस उपयोगाला येत असे. लोखंडी हत्यारं शेगडीत गरम करून प्लॅस्टिकचे तुकडे तापवले जात असत आणि त्या रसायनाने वस्तूच्या ‘जखमा’ भरल्या जात असत. कल्पना करा, हेच टेक्निक …
Read More »मेलेली मने
ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारकांमुळे सोलापूरने स्वातंत्र्य प्राप्त केल्याचा इतिहास आजही जिवंत आहे. क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या या शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. वस्त्रोद्योगामुळे सोलापूर हे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही ज्वलंत विषयावर पेटून उठण्याची येथील मानसिकता त्यावेळच्या लोकांमध्ये होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे वैभव आणखी वाढण्याऐवजी आता उतरतीला लागले आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर आणि परिसरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. काही …
Read More »चर्चेत ‘हंता’
एकाच दिवसात किंवा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या काही दुर्मिळ, मोजक्या घटना आपल्या पाहण्यात असतात. काहीजण या घटना दुर्दैवी मानतात तर काहीजण अशा घटनांमध्ये पती-पत्नीमधील घट्ट बंध शोधतात. अपघातात पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक असतात; परंतु आजारपणामुळं किंवा कधी-कधी तर कोणताही आजार नसताना अशा घटना घडतात. पतीवर अंत्यसंस्कार करून लोक परत येईपर्यंत पत्नीचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं पाहायला मिळतात. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र