लेख-समिक्षण

संपादकीय

स्वागतार्ह पाऊल

राजकीय गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीचे होत असलेले वस्त्रहरण थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला यासंदर्भात जाब विचारुन लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद आणि विधानसभांच्या स्वच्छतेसाठीचे स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. देशातील खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी प्रकरणे तातडीने निकाली निघावी आणि दोषी नेत्यांवर आयुष्यभर निर्बंध लादण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली …

Read More »

अमरपट्ट्याची विक्री

सर्वांत प्रगत आणि किफायतशीर चॅटबॉट कुणाचा, यावरून ओपन एआय आणि चीनचे डीपसीक यांच्यात संघर्ष सुरू असण्याच्या काळातसुद्धा मानवजातीच्या इतिहासातलं सर्वांत जुनं वास्तव बदललेलं नाही. ते म्हणजे, पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात गुंतागुंतीचं, आश्चर्यजनक आणि अमूल्य यंत्र म्हणजे मानवी शरीर. मानवी जीवनात प्रत्येक वस्तूला पर्याय देता येईल; पण मानवी शरीराला पर्याय नाही. हे यंत्र बिघडलं तर दुरुस्त होऊ शकतं; पण संपलं की त्याचं …

Read More »

झोपडपट्टयांची मुंबई

मुंबई कोणाला कधीच उपाशी झोपू देत नाही, असे म्हणतात. अनेक स्वप्ने उराशी बाळगलेले बेरोजगारांचे लोंढे देशाच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत येतात. ग्रामीण भागातून मुंबईत येण्याचा ओघ वाढल्याने मुंबईची बजबजपुरी झाली आहे. अनधिकृत झोपड्यांमुळे मुंबई समस्यांचे आगर बनले आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी मुंबईतल्या झोपडपट्ट्या म्हणजे बेकायदा वसुलींचे ‘एटीएम’च बनले आहे. कधीही जा आणि मनमानी वसुली करा, असा अधिकार्‍यांचा दृष्टिकोन इथल्या …

Read More »

अर्धा हिस्सा

नातीगोती वगैरे खरोखर अस्तित्वात असतात, की गरज ठरवून त्यानुसार जोडली जातात? एकत्र कुटुंबपद्धतीपासून ‘सेल्फ मॅरेज’ म्हणजे स्वतःशीच लग्न करण्याच्या अजब निर्णयापर्यंत बरीच स्थित्यंतरं आपण पाहिली. या प्रवासात माणसाला अधिकाधिक एकटं आणि आत्मकेंद्री होताना आपण पाहिलं. शहरांकडे होणार्‍या स्थलांतरांमुळं सुरुवातीच्या काळात या विभक्तपणाचा आपण ‘अपरिहार्यता’ म्हणून स्वीकार केला. मग जास्तीत जास्त आमदनी आणि कमीत कमी जबाबदारी असणार्‍या नवश्रीमंतांची नवी जीवनशैली म्हणून …

Read More »

सुरक्षेवर लक्ष कधी ?

प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभ 144 वर्षांनी आला. या महाकुंभात मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत स्नान होणार होते. त्यापूर्वी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर सकाळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. साधू, महंत आणि भाविक गंगा स्नान करत आहेत. भाविकांना काही अडचण होऊ नये म्हणून आखाड्यांनी त्यांच्या स्नानावर स्वतःहून बंदी आणली आहे. परंतु, ही चेंगराचेंगरी नेमकी …

Read More »

खेळता-खेळता

लहान मुलं बर्‍याच वेळा दारामागं लपून मोठ्यानं ‘भॉ’ करतात आणि आपल्याला किंवा एकमेकांना घाबरवतात. आपल्याला माहीत असलं, तरी आपण घाबरल्याचं सोंग करतो. जेव्हा मुलं एकमेकांना घाबरवण्याचा खेळ खेळतात, तेव्हा बर्‍याचदा ही अनपेक्षित घटना असते. त्यामुळे पोरं खरोखर दचकतात. दचकणारा एखाद्या वेळी चिडतोही. परंतु या दचकण्याचा जास्तीत जास्त परिणाम काय? भांडणं, अबोला वगैरे. परंतु या अत्यंत साध्या खेळाचा शेवट एखाद्या लहानग्याच्या …

Read More »

ट्रम्प आणि फडणवीस

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी यांचे पाच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदी पुनरागमन झाले. तसेच पुनरागमन अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे चार वर्षांनंतर झाले आहे. महाराष्ट्रात फडणवीस यांनी जाणीवपूर्वक नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारले आहे. तिकडे अमेरिकेत ट्रम्प यांनी पदग्रहणाआधीच कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य करण्याचा, ग्रीनलँड व पनामा कालव्यावर नियंत्रण मिळविण्याचा आणि मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात करण्याचा मनोदय जाहीरपणे त्यांनी …

Read More »

भेदाभेद भ्रम

र्धेचा जमाना आहे. जोरात धावायचं आहे. पहिला येईल त्याला मोठी संधी आहे. मागे राहील त्याची बरबादी निश्चित आहे. शहरातला असो वा खेड्यातला, श्रीमंत असो वा गरीब, इंटरनॅशनल स्कूलमधला असो वा जिल्हा परिषदेच्या शाळेतला… स्पर्धा सर्वांसाठी एकच आहे. माध्यमिक शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करायचं आणि उच्च शिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा द्यायची. चांगल्या गुणांनी पदवी संपादन करायची आणि लगेच स्पर्धा परीक्षा द्यायच्या. …

Read More »

पंतप्रधानांचा कानमंत्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर महायुतीच्या रथाचे घोडे चौखूर उधळणे स्वाभाविक होते. महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अतिउत्साहात येणे साहजिकच होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर गोपनीय संवाद कार्यक्रमात महायुतीच्या आमदारांना निमंत्रित केले होते. मोदी यांनी या नवनिर्वाचित आमदारांना आणि राज्यातील ज्येष्ठांनाही गोपनीय मंत्र देण्याचे ठरविले होते. स्वत: मोदी यांनी …

Read More »

आजारावर पाळत

नव्वद तास काम करण्याची अपेक्षा व्यक्त झाल्यानंतर कार्यसंस्कृतीवर बरीच चर्चा सुरू आहे. विनोदही चाललेत. मीम्स बनतायत. कर्पोरेट कल्चर तारक की मारक याविषयी उद्बोधक आणि गंभीर संवादही सुरू आहेत. खरंच आपण दिवसाकाठी किती तास काम केलं पाहिजे? आठवड्यातून एक दिवस सुट्टी गरजेची आहे का? गरजेची नसेल तर साप्ताहिक सुट्टीची कल्पना पुढे कशी आली? वर्षानुवर्षेअंगवळणी पडल्यानंतर रविवारची सुट्टी अचानक रद्दच झाली तर..? …

Read More »