दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण एकमेकांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून तसेच समाज माध्यमांवरून शुभेच्छा देत असतो. गेल्या वर्षीही म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी अशाच शुभेच्छा एकमेकांना दिल्या होत्या. हे वर्ष कसे गेले सर्वांनीच पाहिले आणि अनुभवले. 2024 हे वर्ष महिला अत्याचार, गुन्हेगारी, राजकीय कुरघोडी आदी कारणांसाठीच जास्त चर्चेत राहिले. त्यातही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा हंगामही पाहिला. दोन्ही निवडणुकांचे …
Read More »संपादकीय
उलटा प्रवास
नव्या वर्षाच्या प्रारंभीच एक विचित्र बातमी तुमच्या वाचनात आली असेल. एका आंतरराष्ट्रीय विमानाने 2025 मध्ये उड्डाण केलं आणि 2024 मध्ये लँडिंग केलं. ही उलटी गंगा कशी वाहिली? खरं तर ती रोजच वाहते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ती उठून दिसली, एवढंच! जगभरात वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे ‘टाइम झोन’ आहेत, हे तर सर्वांना ठाऊक आहेच. म्हणूनच हाँगकाँगहून एक जानेवारीला निघालेलं विमान जेव्हा लॉस एंजलिस …
Read More »नैतिक अधःपतन
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बालकांचे लैंगिक शोषण आणि त्यातून होणार्या हत्या या समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि व्यवस्थेच्या अपयशाचे भीषण दर्शन आहे. राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर झालेल्या अत्याचाराने आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह ड्रममध्ये लपवण्यात आल्याच्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. वासना भागवण्यासाठी लहान बालिकांची अतिशय अमानुष हत्या करणारा नराधम व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून मोकाट फिरतोच कसा? त्याच्या काही दिवस …
Read More »जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं जगतेच आहेस; आम्हाला जन्माला घालतेच आहेस. खरंच, कमाल आहे तुझी! पण स्वतःसारखी जननी जन्माला घालण्याची परवानगी तुला कुणी दिली? पहिल्यांदा… दुसर्यांदा… आता तिसर्यांदाही मुलगीच झाली? मग तू जगून काय उपयोग? काय अर्थ तुझ्या जगण्याला? वंश चालवणारा, प्रॉपर्टी सांभाळणारा किंवा मोडून खाणारा नर तुला जन्माला घालता …
Read More »खातेवाटपाचे उणे-अधिक
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजित पवार गिरीश महाजनांना …
Read More »खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे अभ्यासाचं कारण असतं. कधीतरी घराबाहेर असलेल्या छोट्या-मोठ्या धोक्यांचं निमित्त असतं. कधी पाऊस तर कधी कडाक्याचं ऊन पडलेलं असतं. मुलांचं आरोग्य बिघडेल, अशी काळजी आईवडिलांना वाटत असते. नैसर्गिक धोक्यांबरोबरच मानवनिर्मित धोकेही असतात. या व्यतिरिक्तही कारणं असू शकतात. परंतु पोरांना ‘खेळू नका’ म्हणण्याचं एक अजब कारण पुढे …
Read More »मानाचा तुरा
मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबर्या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांना मान्यता देण्यात आली आहे. एक …
Read More »अदृश्य धोका
त्रासदायक, दुःखद, भयावह घटना लवकरात लवकर विसरून जाण्याची आणि सुखद घटना दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची नैसर्गिक शक्ती आपल्याला मिळाली आहे. अतोनात नुकसान करणार्या आणि दीर्घकालीन प्रभाव असणार्या गोष्टीही काळाच्या ओघात आपण विसरून जातो. कारण अशा घटन घडल्या म्हणून आयुष्य थांबत नसतं. त्या घटना विसरून नव्या आव्हानांना सामोरं जावंच लागतं. सुखद घटना आपल्याला त्यासाठी शक्ती देतात, म्हणून आपण त्या आपल्या स्मृतीत जपतो. …
Read More »पवारांचे फसते डावपेच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीचे खर्या अर्थाने जनक. 2019 च्या विधानसभा निवडणुकात गलितगात्र झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी एकहाती ऊर्जित अवस्थेत आणला आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाराष्ट्रात ही लाट एकहाती थोपवून धरली ती देखील शरद पवार यांनी. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अपेक्षा असलेला नेता आणि …
Read More »करुन पाहू!
ज्ञानादी विषय प्रात्यक्षिकातून शिकावे लागतात. प्रयोग करावे लागतात आणि शाळापातळीपासूनच त्यासाठी प्रयोगशाळा असतात. अनेक शाळांमध्ये आजही प्रयोगशाळा नाहीत, हा भाग वेगळा. रसायनशास्त्रातलं एखादं संयुग किंवा भौतिकशास्त्रातलं एखादं सूत्र समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. भाषा विषय, इतिहास आदी विषयांच्या अभ्यासासाठी प्रयोग करून पाहण्याची गरज नसते. भूगोलातील काही भाग प्रयोगशील असतो आणि ऐतिहासिक स्थळी सहली काढून इतिहास अधिक …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र